शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

जनजागर

By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST

ताण कमी होईल

ताण कमी होईल
अकरावीची एटीकेटी परीक्षा आता जून मध्येच घेण्याचा निर्णय घेऊन गोवा शालान्त मंडळाने चांगले काम केले आहे; कारण ६ महिन्यांनी परीक्षा घेण्यापेक्षा विषयाचा अभ्यास ताजा असतानाच परीक्षा घेणे विद्यार्थ्यांसाठी कमी ताणाचे आहे. तसेच राहिलेले विषय जूनमधील परीक्षेत सुटू शकले नाहीत तर त्यावर्षी त्या विद्यार्थ्याने अकरावीचे शिक्षण चालू ठेवणे हे अधिक कटकटीचे ठरेल; कारण एकाच वेळी अकरावी आणि दहावीच्या विषयांचा अभ्यास त्यांना करावा लागेल. यामुळे कोणताही अभ्यास सारखा होत नसतो. त्यापेक्षा एक वर्ष गेले तरी चालेल; परंतु व्यवस्थित अभ्यास करून तो विषय ऑक्टोबरच्या परीक्षेत व्यवस्थित सोडविणे आणि पुढच्या वर्षी अकरावीचे शिक्षण घेणे हे अधिक सोयीस्कर ठरेल.
- भावार्थ मांद्रेकर, कोरगाव, पेडणे
(फोटो एडिट लोकमतवर पाठविला आहे)

एकच संधीचा फेरविचार करावा
एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा जूनमध्येच घेण्याचा निर्णय यापूर्वीच व्हायला हवा होता, असो. बारावीच्या बाबतीत ही पद्धत यापूर्वीच चालू होती. लवकर परीक्षा घेण्याच्या निर्णयासाठी शालान्त मंडळाचे कौतुक व्हावे; परंतु जूनच्या परीक्षेत विद्यार्थी विषय सोडवू शकला नाही तर त्याचे वर्ष फुकट जाणार, ही चिंतेची गोष्ट आहे; कारण तेच विद्यार्थी ऑक्टोबरची परीक्षा देऊन उत्तीर्ण होणार नाही असे आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे एकच संधी देण्याच्या निर्णयाबाबतीत शालान्त मंडळाने फेरविचार करावा.
पुरुषोत्तम लोलयेकर, लोलये, काणकोण
(फोटो सिस्टममध्ये सेव केला आहे)