शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये जंगलराज पार्ट टू नकोच - नरेंद्र मोदी

By admin | Updated: August 9, 2015 15:05 IST

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव व नितीशकुमार यांचे जंगलराज पार्ट टू आले तर सर्व काही उध्वस्त होईल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

ऑनलाइन लोकमत 
गया, दि. ९ - बिहारमध्ये लालूप्रसाद यादव व नितीशकुमार यांचे जंगलराज पार्ट टू आले तर सर्व काही उध्वस्त होईल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. दिल्लीतून विकासाची गंगा वाहत आहे, पण बिहारमधील अहंकारी सत्ताधा-यांनी ही गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू दिली नाही असा आरोपही मोदींनी केला आहे. 
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतले. या सभेत मोदींनी लालूप्रसाद यादव नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली. तुरुंगात गेल्यावर कोणताही व्यक्ती चांगल्या गोष्टी शिकून बाहेर येत नाही, जंगलराज पार्टवनच्या वेळी तुरुंगाचा अनुभव नव्हता, पण आता  जंगलराज पार्ट टूमध्ये हा अनुभव जोडला गेला आहे अशा बोच-या शब्दात मोदींनी लालूप्रसाद यादव यांच्यावर टीकास्त्र सोडले. बिहारला जंगलराज, अहंकारी सरकारमधून मुक्त करण्याची गरज असून भाजपाच बिहारला आजारी राज्यातून बाहेर काढू शकेल असे त्यांनी सांगितले. राजद म्हणजे रोजाना जंगलराज का डर (रोज जंगलराजची भीती)  व जदयू म्हणजे जनता का दमन व उत्पीडन (जनतेची दडपशाही व शोषण) असा अर्थ सांगत त्यांनी दोन्ही पक्षांवर सडकून टिका केली.  बिहारपेक्षा छोट्या राज्यांमध्ये इंजिनिअरिंगच्या जास्त जागा आहेत, पण बिहारसारखी विशाल लोकसंख्या असलेल्या राज्यात इंजिनिअरिंगच्या फक्त २५ हजार जागा आहेत, यासाठी जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  राजकीय फायद्यासाठी बिहारमध्ये युती झाली खरी पण ही युती निवडणुकीनंतरही टीकेल का अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.