शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
5
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
6
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
7
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
8
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
9
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
10
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
11
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
12
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
13
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
14
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
16
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
17
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
18
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
19
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
20
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

बिहारमध्ये जंगलराज पार्ट टू नकोच - नरेंद्र मोदी

By admin | Updated: August 9, 2015 15:05 IST

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव व नितीशकुमार यांचे जंगलराज पार्ट टू आले तर सर्व काही उध्वस्त होईल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

ऑनलाइन लोकमत 
गया, दि. ९ - बिहारमध्ये लालूप्रसाद यादव व नितीशकुमार यांचे जंगलराज पार्ट टू आले तर सर्व काही उध्वस्त होईल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. दिल्लीतून विकासाची गंगा वाहत आहे, पण बिहारमधील अहंकारी सत्ताधा-यांनी ही गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू दिली नाही असा आरोपही मोदींनी केला आहे. 
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतले. या सभेत मोदींनी लालूप्रसाद यादव नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली. तुरुंगात गेल्यावर कोणताही व्यक्ती चांगल्या गोष्टी शिकून बाहेर येत नाही, जंगलराज पार्टवनच्या वेळी तुरुंगाचा अनुभव नव्हता, पण आता  जंगलराज पार्ट टूमध्ये हा अनुभव जोडला गेला आहे अशा बोच-या शब्दात मोदींनी लालूप्रसाद यादव यांच्यावर टीकास्त्र सोडले. बिहारला जंगलराज, अहंकारी सरकारमधून मुक्त करण्याची गरज असून भाजपाच बिहारला आजारी राज्यातून बाहेर काढू शकेल असे त्यांनी सांगितले. राजद म्हणजे रोजाना जंगलराज का डर (रोज जंगलराजची भीती)  व जदयू म्हणजे जनता का दमन व उत्पीडन (जनतेची दडपशाही व शोषण) असा अर्थ सांगत त्यांनी दोन्ही पक्षांवर सडकून टिका केली.  बिहारपेक्षा छोट्या राज्यांमध्ये इंजिनिअरिंगच्या जास्त जागा आहेत, पण बिहारसारखी विशाल लोकसंख्या असलेल्या राज्यात इंजिनिअरिंगच्या फक्त २५ हजार जागा आहेत, यासाठी जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  राजकीय फायद्यासाठी बिहारमध्ये युती झाली खरी पण ही युती निवडणुकीनंतरही टीकेल का अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.