शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बिहारमध्ये जंगलराज पार्ट टू नकोच - नरेंद्र मोदी

By admin | Updated: August 9, 2015 15:05 IST

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव व नितीशकुमार यांचे जंगलराज पार्ट टू आले तर सर्व काही उध्वस्त होईल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

ऑनलाइन लोकमत 
गया, दि. ९ - बिहारमध्ये लालूप्रसाद यादव व नितीशकुमार यांचे जंगलराज पार्ट टू आले तर सर्व काही उध्वस्त होईल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. दिल्लीतून विकासाची गंगा वाहत आहे, पण बिहारमधील अहंकारी सत्ताधा-यांनी ही गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू दिली नाही असा आरोपही मोदींनी केला आहे. 
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतले. या सभेत मोदींनी लालूप्रसाद यादव नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली. तुरुंगात गेल्यावर कोणताही व्यक्ती चांगल्या गोष्टी शिकून बाहेर येत नाही, जंगलराज पार्टवनच्या वेळी तुरुंगाचा अनुभव नव्हता, पण आता  जंगलराज पार्ट टूमध्ये हा अनुभव जोडला गेला आहे अशा बोच-या शब्दात मोदींनी लालूप्रसाद यादव यांच्यावर टीकास्त्र सोडले. बिहारला जंगलराज, अहंकारी सरकारमधून मुक्त करण्याची गरज असून भाजपाच बिहारला आजारी राज्यातून बाहेर काढू शकेल असे त्यांनी सांगितले. राजद म्हणजे रोजाना जंगलराज का डर (रोज जंगलराजची भीती)  व जदयू म्हणजे जनता का दमन व उत्पीडन (जनतेची दडपशाही व शोषण) असा अर्थ सांगत त्यांनी दोन्ही पक्षांवर सडकून टिका केली.  बिहारपेक्षा छोट्या राज्यांमध्ये इंजिनिअरिंगच्या जास्त जागा आहेत, पण बिहारसारखी विशाल लोकसंख्या असलेल्या राज्यात इंजिनिअरिंगच्या फक्त २५ हजार जागा आहेत, यासाठी जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  राजकीय फायद्यासाठी बिहारमध्ये युती झाली खरी पण ही युती निवडणुकीनंतरही टीकेल का अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.