शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘भाजपसाठी विध्वंसक ठरणार जनता परिवार’

By admin | Updated: April 16, 2015 23:53 IST

भाजप आज जनता परिवाराच्या विलीनीकरणाची टर उडवत आहे. पण हाच जनता परिवार उद्या भाजपचा विध्वंस करणारा ठरेल, असे भाकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी वर्तवले.

पाटणा : भाजप आज जनता परिवाराच्या विलीनीकरणाची टर उडवत आहे. पण हाच जनता परिवार उद्या भाजपचा विध्वंस करणारा ठरेल, असे भाकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी वर्तवले.नवी दिल्लीवरून परतल्यानंतर पाटणा विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. जनता परिवाराच्या रूपात एका नव्या शक्तीच्या उदयामुळे भाजप नेत्यांना भयाने पछाडले आहे. ते जनता परिवाराची टर उडवत नसून आपल्या भयाचे दर्शन घडवत आहेत. या विलीनीकरणात अनेक अडचणी असल्याचे भाजप ओरडून सांगत आहे. प्रत्यक्षात अंतर्मनातून ते घाबरले आहेत, असे नितीश म्हणाले.सहा पक्षांच्या विलीनीकरणामुळे बिहार सरकारच्या कामकाजावर विपरीत परिणाम होईल, ही शक्यताही नितीश यांनी यावेळी धुडकावून लावली. बिहार सरकार पूर्वीसारखे काम करीत राहील. सुशासन, विकास व जनतेची सेवा यासाठी बिहार सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.मूळच्या जनता दलातून बाहेर पडून गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ स्वतंत्रपणे आणि प्रसंगी परस्परांविरुद्ध लढलेल्या ‘जनता परिवारा’च्या सहा पक्षांचे बुधवारी मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली एकत्रीकरण झाले होते. यात समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल, भारतीय राष्ट्रीय लोकदल, जनता दल (धर्मनिरपेक्ष) व समाजवादी जनता दल या पक्षांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)