शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

‘भाजपसाठी विध्वंसक ठरणार जनता परिवार’

By admin | Updated: April 16, 2015 23:53 IST

भाजप आज जनता परिवाराच्या विलीनीकरणाची टर उडवत आहे. पण हाच जनता परिवार उद्या भाजपचा विध्वंस करणारा ठरेल, असे भाकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी वर्तवले.

पाटणा : भाजप आज जनता परिवाराच्या विलीनीकरणाची टर उडवत आहे. पण हाच जनता परिवार उद्या भाजपचा विध्वंस करणारा ठरेल, असे भाकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी वर्तवले.नवी दिल्लीवरून परतल्यानंतर पाटणा विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. जनता परिवाराच्या रूपात एका नव्या शक्तीच्या उदयामुळे भाजप नेत्यांना भयाने पछाडले आहे. ते जनता परिवाराची टर उडवत नसून आपल्या भयाचे दर्शन घडवत आहेत. या विलीनीकरणात अनेक अडचणी असल्याचे भाजप ओरडून सांगत आहे. प्रत्यक्षात अंतर्मनातून ते घाबरले आहेत, असे नितीश म्हणाले.सहा पक्षांच्या विलीनीकरणामुळे बिहार सरकारच्या कामकाजावर विपरीत परिणाम होईल, ही शक्यताही नितीश यांनी यावेळी धुडकावून लावली. बिहार सरकार पूर्वीसारखे काम करीत राहील. सुशासन, विकास व जनतेची सेवा यासाठी बिहार सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.मूळच्या जनता दलातून बाहेर पडून गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ स्वतंत्रपणे आणि प्रसंगी परस्परांविरुद्ध लढलेल्या ‘जनता परिवारा’च्या सहा पक्षांचे बुधवारी मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली एकत्रीकरण झाले होते. यात समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल, भारतीय राष्ट्रीय लोकदल, जनता दल (धर्मनिरपेक्ष) व समाजवादी जनता दल या पक्षांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)