शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

जम्मू काश्मीरात घुसखोरी करु, चिडलेल्या चीनची भारताला धमकी

By admin | Updated: April 6, 2017 14:20 IST

चीन सरकारचं मुखपत्र समजल्या जाणा-या अनेक वृत्तपत्रांनी भारतावर निशाणा साधत संबंध बिघडण्याची चेतावणी दिली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - तिबेटियन धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल दौ-यामुळे चीन प्रचंड चिडला आहे. चीन सरकारचं मुखपत्र समजल्या जाणा-या अनेक वृत्तपत्रांनी भारतावर निशाणा साधत संबंध बिघडण्याची चेतावणी दिली आहे. चीनमधील सरकारी मीडिया चायना डेली आणि ग्लोबल टाईम्सने आपल्या संपादकीयमधून धमकी देत भारताने जर आपली भूमिका बदलली नाही तर हल्ल्याच्या उत्तर हल्ल्याने देण्यात येईल असं म्हटलं आहे. 
 
(दलाई लामांना अरुणाचलमध्ये प्रवेश देणं भारताची मोठी चूक - चीन)
(दलाई लामांच्या भारत भेटीवर चीनची आगपाखड)
 
दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश दौ-यावर चायना डेलीने संपादकीय छापलं आहे. त्यानुसार "जर भारताने आपला घाणेरडा खेळ असाच सुरु ठेवला तर पेइचिंगला याचं उत्तर देण्यासाठी कोणताही विलंब करण्याची गरज नाही". तर दुसरीकडे ग्लोबल टाईम्सने काश्मीरचा उल्लेख न करता चीन काश्मीरमध्ये दखल देऊ शकतो अशी चेतावणी दिली आहे. या संपादकीयमध्ये चीनचा जीडीपी आणि लष्कर सैन्य क्षमता भारतापेक्षा जास्त असल्याची बढाई मारण्यात आली आहे. सोबतच शेजारी राष्ट्रांशी आपले चांगलं संबंध असल्याची आठवण भारताला करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याशिवाय चीनला लागून असलेल्या भारतातील उत्तरेकडील राज्यांचा उल्लेख करत राजकारण करण्याचीही धमकी दिली आहे. 
 
(दलाई लामा हे भ्रामक अभिनेते- चीन)
 
जाणकारांचं म्हणणं आहे की दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-यात केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांची उपस्थिती आणि त्यांच्या वक्तव्यामुळे चीन नाराज आहे. किरेन रिजिजू यांनी " चीनला दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याचा विरोध आणि भारताच्या अतंर्गत व्यवहारांमध्ये दखल देण्याची गरज नाही", असं ठणकावून सांगितलं होतं. चायना डेली आणि ग्लोबल टाईम्सच्या या लेखांना भारताविरोधातील सरकारची नाराजी म्हणून पाहिलं जात आहे. 
 
"दलाई लामा याआधीदेखील या वादग्रस्त ठिकाणी गेले आहेत. मात्र यावेळी भारताचे ज्युनिअर गृहमंत्री किरेन रिजिजू यांनी फक्त त्यांचं स्वागतच केलं नाही, तर सतत त्यांच्यासोबत होते हा फरक आहे", असं ग्लोबल टाईम्सने म्हटलं आहे.  भारत दलाई लामांचा वापर चीनविरोधात जशास तसे म्हणून करत असल्याचा आरोपही ग्लोबल टाईम्सने केला आहे. न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपमधील भारताची सदस्यता आणि पाकिस्तानी दहशतवादी मसूद अजहरवरील बंदीला विरोध केल्याने भारत नाराज असून असं करत असल्याचं ग्लोबल टाईम्सने लिहिलं आहे.