शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

जम्मू काश्मीरात घुसखोरी करु, चिडलेल्या चीनची भारताला धमकी

By admin | Updated: April 6, 2017 14:20 IST

चीन सरकारचं मुखपत्र समजल्या जाणा-या अनेक वृत्तपत्रांनी भारतावर निशाणा साधत संबंध बिघडण्याची चेतावणी दिली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - तिबेटियन धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल दौ-यामुळे चीन प्रचंड चिडला आहे. चीन सरकारचं मुखपत्र समजल्या जाणा-या अनेक वृत्तपत्रांनी भारतावर निशाणा साधत संबंध बिघडण्याची चेतावणी दिली आहे. चीनमधील सरकारी मीडिया चायना डेली आणि ग्लोबल टाईम्सने आपल्या संपादकीयमधून धमकी देत भारताने जर आपली भूमिका बदलली नाही तर हल्ल्याच्या उत्तर हल्ल्याने देण्यात येईल असं म्हटलं आहे. 
 
(दलाई लामांना अरुणाचलमध्ये प्रवेश देणं भारताची मोठी चूक - चीन)
(दलाई लामांच्या भारत भेटीवर चीनची आगपाखड)
 
दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश दौ-यावर चायना डेलीने संपादकीय छापलं आहे. त्यानुसार "जर भारताने आपला घाणेरडा खेळ असाच सुरु ठेवला तर पेइचिंगला याचं उत्तर देण्यासाठी कोणताही विलंब करण्याची गरज नाही". तर दुसरीकडे ग्लोबल टाईम्सने काश्मीरचा उल्लेख न करता चीन काश्मीरमध्ये दखल देऊ शकतो अशी चेतावणी दिली आहे. या संपादकीयमध्ये चीनचा जीडीपी आणि लष्कर सैन्य क्षमता भारतापेक्षा जास्त असल्याची बढाई मारण्यात आली आहे. सोबतच शेजारी राष्ट्रांशी आपले चांगलं संबंध असल्याची आठवण भारताला करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याशिवाय चीनला लागून असलेल्या भारतातील उत्तरेकडील राज्यांचा उल्लेख करत राजकारण करण्याचीही धमकी दिली आहे. 
 
(दलाई लामा हे भ्रामक अभिनेते- चीन)
 
जाणकारांचं म्हणणं आहे की दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-यात केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांची उपस्थिती आणि त्यांच्या वक्तव्यामुळे चीन नाराज आहे. किरेन रिजिजू यांनी " चीनला दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याचा विरोध आणि भारताच्या अतंर्गत व्यवहारांमध्ये दखल देण्याची गरज नाही", असं ठणकावून सांगितलं होतं. चायना डेली आणि ग्लोबल टाईम्सच्या या लेखांना भारताविरोधातील सरकारची नाराजी म्हणून पाहिलं जात आहे. 
 
"दलाई लामा याआधीदेखील या वादग्रस्त ठिकाणी गेले आहेत. मात्र यावेळी भारताचे ज्युनिअर गृहमंत्री किरेन रिजिजू यांनी फक्त त्यांचं स्वागतच केलं नाही, तर सतत त्यांच्यासोबत होते हा फरक आहे", असं ग्लोबल टाईम्सने म्हटलं आहे.  भारत दलाई लामांचा वापर चीनविरोधात जशास तसे म्हणून करत असल्याचा आरोपही ग्लोबल टाईम्सने केला आहे. न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपमधील भारताची सदस्यता आणि पाकिस्तानी दहशतवादी मसूद अजहरवरील बंदीला विरोध केल्याने भारत नाराज असून असं करत असल्याचं ग्लोबल टाईम्सने लिहिलं आहे.