शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीरात घुसखोरी करु, चिडलेल्या चीनची भारताला धमकी

By admin | Updated: April 6, 2017 14:20 IST

चीन सरकारचं मुखपत्र समजल्या जाणा-या अनेक वृत्तपत्रांनी भारतावर निशाणा साधत संबंध बिघडण्याची चेतावणी दिली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - तिबेटियन धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल दौ-यामुळे चीन प्रचंड चिडला आहे. चीन सरकारचं मुखपत्र समजल्या जाणा-या अनेक वृत्तपत्रांनी भारतावर निशाणा साधत संबंध बिघडण्याची चेतावणी दिली आहे. चीनमधील सरकारी मीडिया चायना डेली आणि ग्लोबल टाईम्सने आपल्या संपादकीयमधून धमकी देत भारताने जर आपली भूमिका बदलली नाही तर हल्ल्याच्या उत्तर हल्ल्याने देण्यात येईल असं म्हटलं आहे. 
 
(दलाई लामांना अरुणाचलमध्ये प्रवेश देणं भारताची मोठी चूक - चीन)
(दलाई लामांच्या भारत भेटीवर चीनची आगपाखड)
 
दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश दौ-यावर चायना डेलीने संपादकीय छापलं आहे. त्यानुसार "जर भारताने आपला घाणेरडा खेळ असाच सुरु ठेवला तर पेइचिंगला याचं उत्तर देण्यासाठी कोणताही विलंब करण्याची गरज नाही". तर दुसरीकडे ग्लोबल टाईम्सने काश्मीरचा उल्लेख न करता चीन काश्मीरमध्ये दखल देऊ शकतो अशी चेतावणी दिली आहे. या संपादकीयमध्ये चीनचा जीडीपी आणि लष्कर सैन्य क्षमता भारतापेक्षा जास्त असल्याची बढाई मारण्यात आली आहे. सोबतच शेजारी राष्ट्रांशी आपले चांगलं संबंध असल्याची आठवण भारताला करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याशिवाय चीनला लागून असलेल्या भारतातील उत्तरेकडील राज्यांचा उल्लेख करत राजकारण करण्याचीही धमकी दिली आहे. 
 
(दलाई लामा हे भ्रामक अभिनेते- चीन)
 
जाणकारांचं म्हणणं आहे की दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-यात केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांची उपस्थिती आणि त्यांच्या वक्तव्यामुळे चीन नाराज आहे. किरेन रिजिजू यांनी " चीनला दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याचा विरोध आणि भारताच्या अतंर्गत व्यवहारांमध्ये दखल देण्याची गरज नाही", असं ठणकावून सांगितलं होतं. चायना डेली आणि ग्लोबल टाईम्सच्या या लेखांना भारताविरोधातील सरकारची नाराजी म्हणून पाहिलं जात आहे. 
 
"दलाई लामा याआधीदेखील या वादग्रस्त ठिकाणी गेले आहेत. मात्र यावेळी भारताचे ज्युनिअर गृहमंत्री किरेन रिजिजू यांनी फक्त त्यांचं स्वागतच केलं नाही, तर सतत त्यांच्यासोबत होते हा फरक आहे", असं ग्लोबल टाईम्सने म्हटलं आहे.  भारत दलाई लामांचा वापर चीनविरोधात जशास तसे म्हणून करत असल्याचा आरोपही ग्लोबल टाईम्सने केला आहे. न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपमधील भारताची सदस्यता आणि पाकिस्तानी दहशतवादी मसूद अजहरवरील बंदीला विरोध केल्याने भारत नाराज असून असं करत असल्याचं ग्लोबल टाईम्सने लिहिलं आहे.