शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

जम्मू काश्मीरात घुसखोरी करु, चिडलेल्या चीनची भारताला धमकी

By admin | Updated: April 6, 2017 14:20 IST

चीन सरकारचं मुखपत्र समजल्या जाणा-या अनेक वृत्तपत्रांनी भारतावर निशाणा साधत संबंध बिघडण्याची चेतावणी दिली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - तिबेटियन धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल दौ-यामुळे चीन प्रचंड चिडला आहे. चीन सरकारचं मुखपत्र समजल्या जाणा-या अनेक वृत्तपत्रांनी भारतावर निशाणा साधत संबंध बिघडण्याची चेतावणी दिली आहे. चीनमधील सरकारी मीडिया चायना डेली आणि ग्लोबल टाईम्सने आपल्या संपादकीयमधून धमकी देत भारताने जर आपली भूमिका बदलली नाही तर हल्ल्याच्या उत्तर हल्ल्याने देण्यात येईल असं म्हटलं आहे. 
 
(दलाई लामांना अरुणाचलमध्ये प्रवेश देणं भारताची मोठी चूक - चीन)
(दलाई लामांच्या भारत भेटीवर चीनची आगपाखड)
 
दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश दौ-यावर चायना डेलीने संपादकीय छापलं आहे. त्यानुसार "जर भारताने आपला घाणेरडा खेळ असाच सुरु ठेवला तर पेइचिंगला याचं उत्तर देण्यासाठी कोणताही विलंब करण्याची गरज नाही". तर दुसरीकडे ग्लोबल टाईम्सने काश्मीरचा उल्लेख न करता चीन काश्मीरमध्ये दखल देऊ शकतो अशी चेतावणी दिली आहे. या संपादकीयमध्ये चीनचा जीडीपी आणि लष्कर सैन्य क्षमता भारतापेक्षा जास्त असल्याची बढाई मारण्यात आली आहे. सोबतच शेजारी राष्ट्रांशी आपले चांगलं संबंध असल्याची आठवण भारताला करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याशिवाय चीनला लागून असलेल्या भारतातील उत्तरेकडील राज्यांचा उल्लेख करत राजकारण करण्याचीही धमकी दिली आहे. 
 
(दलाई लामा हे भ्रामक अभिनेते- चीन)
 
जाणकारांचं म्हणणं आहे की दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-यात केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांची उपस्थिती आणि त्यांच्या वक्तव्यामुळे चीन नाराज आहे. किरेन रिजिजू यांनी " चीनला दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याचा विरोध आणि भारताच्या अतंर्गत व्यवहारांमध्ये दखल देण्याची गरज नाही", असं ठणकावून सांगितलं होतं. चायना डेली आणि ग्लोबल टाईम्सच्या या लेखांना भारताविरोधातील सरकारची नाराजी म्हणून पाहिलं जात आहे. 
 
"दलाई लामा याआधीदेखील या वादग्रस्त ठिकाणी गेले आहेत. मात्र यावेळी भारताचे ज्युनिअर गृहमंत्री किरेन रिजिजू यांनी फक्त त्यांचं स्वागतच केलं नाही, तर सतत त्यांच्यासोबत होते हा फरक आहे", असं ग्लोबल टाईम्सने म्हटलं आहे.  भारत दलाई लामांचा वापर चीनविरोधात जशास तसे म्हणून करत असल्याचा आरोपही ग्लोबल टाईम्सने केला आहे. न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपमधील भारताची सदस्यता आणि पाकिस्तानी दहशतवादी मसूद अजहरवरील बंदीला विरोध केल्याने भारत नाराज असून असं करत असल्याचं ग्लोबल टाईम्सने लिहिलं आहे.