शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

जेटली यांचा मनमोहनसिंगांवर पलटवार

By admin | Updated: February 14, 2016 03:40 IST

मोदी सरकारवर टीका करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी पलटवार केला. संपुआ ते रालोआ सरकारचा प्रवास म्हणजे

नवी दिल्ली : मोदी सरकारवर टीका करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी पलटवार केला. संपुआ ते रालोआ सरकारचा प्रवास म्हणजे धोरणात्मक पंगुतेपासून जागतिक स्तरावर अत्युच्च शिखर गाठण्याचा आहे, असे प्रतिपादन करतानाच वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) सारख्या महत्त्वाच्या विधेयकांवर काँग्रेसची भूमिका राजकारणाने प्रेरित आणि दुटप्पी असल्याचा आरोप जेटली यांनी केला.जेटली यांनी ‘डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्या पक्षाला काय सल्ला दिला पाहिजे’ या मथळ्याखाली फेसबुक पोस्ट टाकली आहे. त्यात ते म्हणतात, संपुआ सरकारच्या कार्यकाळात काँग्रेस मुख्यालय, २४ अकबर रोडवर धोरण निर्मिती होत असे. याउलट रालोआ सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय अंतिम असतो. माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान फार क्वचित बोलतात. परंतु जेव्हा ते आपले मनोगत मांडतात तेव्हा देश गांभीर्याने त्यांचे म्हणणे ऐकत असतो. ते देशाच्या समजूतदारपणाचे, विवेकाचे प्रतिनिधित्व करीत असतात याकडे लक्ष वेधताना माजी पंतप्रधानांनी निष्पक्ष राहून विधायक सल्ला दिला पाहिजे, असे मत जेटली यांनी मांडले. सोबतच कधीकधी त्यांनी आपल्या राजकीय पक्षालासुद्धा राष्ट्रहितासाठी ठोस काम करण्याचा संदेश दिला पाहिजे, अशी कोपरखळी मारली. आपण डॉ. सिंग यांचा आदर करीत असून त्यांच्याकडूनही आपल्याला अशाच आदराची अपेक्षा असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. सिंग यांनी एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीचा हवाला देऊन जेटली म्हणाले की, मनमोहनसिंग यांनी निष्पक्षपणे विद्यमान सरकारची मीमांसा केल्यास भारतात असे सरकार आहे ज्यात अंतिम निर्णय पंतप्रधानांचा असतो आणि नैसर्गिक स्रोतांचे वाटप कुठल्याही भ्रष्टाचाराशिवाय पारदर्शक प्रक्रियेद्वारे केले जाते याची जाणीव त्यांना निश्चित होईल. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. या सरकारची धोरणेही अस्पष्ट असल्याने अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. हे सरकार सर्वांत कमकुवत सरकार आहे, अशा शब्दांत मनमोहनसिंग यांनी मोदी सरकारवर तोफ डागली होती. त्याला जेटलींनी जोरदार प्रत्युत्तर दिले.(लोकमत न्यूज नेटवर्क)