शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

जेटली यांचा मनमोहनसिंगांवर पलटवार

By admin | Updated: February 14, 2016 03:40 IST

मोदी सरकारवर टीका करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी पलटवार केला. संपुआ ते रालोआ सरकारचा प्रवास म्हणजे

नवी दिल्ली : मोदी सरकारवर टीका करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी पलटवार केला. संपुआ ते रालोआ सरकारचा प्रवास म्हणजे धोरणात्मक पंगुतेपासून जागतिक स्तरावर अत्युच्च शिखर गाठण्याचा आहे, असे प्रतिपादन करतानाच वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) सारख्या महत्त्वाच्या विधेयकांवर काँग्रेसची भूमिका राजकारणाने प्रेरित आणि दुटप्पी असल्याचा आरोप जेटली यांनी केला.जेटली यांनी ‘डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्या पक्षाला काय सल्ला दिला पाहिजे’ या मथळ्याखाली फेसबुक पोस्ट टाकली आहे. त्यात ते म्हणतात, संपुआ सरकारच्या कार्यकाळात काँग्रेस मुख्यालय, २४ अकबर रोडवर धोरण निर्मिती होत असे. याउलट रालोआ सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय अंतिम असतो. माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान फार क्वचित बोलतात. परंतु जेव्हा ते आपले मनोगत मांडतात तेव्हा देश गांभीर्याने त्यांचे म्हणणे ऐकत असतो. ते देशाच्या समजूतदारपणाचे, विवेकाचे प्रतिनिधित्व करीत असतात याकडे लक्ष वेधताना माजी पंतप्रधानांनी निष्पक्ष राहून विधायक सल्ला दिला पाहिजे, असे मत जेटली यांनी मांडले. सोबतच कधीकधी त्यांनी आपल्या राजकीय पक्षालासुद्धा राष्ट्रहितासाठी ठोस काम करण्याचा संदेश दिला पाहिजे, अशी कोपरखळी मारली. आपण डॉ. सिंग यांचा आदर करीत असून त्यांच्याकडूनही आपल्याला अशाच आदराची अपेक्षा असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. सिंग यांनी एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीचा हवाला देऊन जेटली म्हणाले की, मनमोहनसिंग यांनी निष्पक्षपणे विद्यमान सरकारची मीमांसा केल्यास भारतात असे सरकार आहे ज्यात अंतिम निर्णय पंतप्रधानांचा असतो आणि नैसर्गिक स्रोतांचे वाटप कुठल्याही भ्रष्टाचाराशिवाय पारदर्शक प्रक्रियेद्वारे केले जाते याची जाणीव त्यांना निश्चित होईल. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. या सरकारची धोरणेही अस्पष्ट असल्याने अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. हे सरकार सर्वांत कमकुवत सरकार आहे, अशा शब्दांत मनमोहनसिंग यांनी मोदी सरकारवर तोफ डागली होती. त्याला जेटलींनी जोरदार प्रत्युत्तर दिले.(लोकमत न्यूज नेटवर्क)