शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जेटली यांचा मनमोहनसिंगांवर पलटवार

By admin | Updated: February 14, 2016 03:40 IST

मोदी सरकारवर टीका करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी पलटवार केला. संपुआ ते रालोआ सरकारचा प्रवास म्हणजे

नवी दिल्ली : मोदी सरकारवर टीका करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी पलटवार केला. संपुआ ते रालोआ सरकारचा प्रवास म्हणजे धोरणात्मक पंगुतेपासून जागतिक स्तरावर अत्युच्च शिखर गाठण्याचा आहे, असे प्रतिपादन करतानाच वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) सारख्या महत्त्वाच्या विधेयकांवर काँग्रेसची भूमिका राजकारणाने प्रेरित आणि दुटप्पी असल्याचा आरोप जेटली यांनी केला.जेटली यांनी ‘डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्या पक्षाला काय सल्ला दिला पाहिजे’ या मथळ्याखाली फेसबुक पोस्ट टाकली आहे. त्यात ते म्हणतात, संपुआ सरकारच्या कार्यकाळात काँग्रेस मुख्यालय, २४ अकबर रोडवर धोरण निर्मिती होत असे. याउलट रालोआ सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय अंतिम असतो. माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान फार क्वचित बोलतात. परंतु जेव्हा ते आपले मनोगत मांडतात तेव्हा देश गांभीर्याने त्यांचे म्हणणे ऐकत असतो. ते देशाच्या समजूतदारपणाचे, विवेकाचे प्रतिनिधित्व करीत असतात याकडे लक्ष वेधताना माजी पंतप्रधानांनी निष्पक्ष राहून विधायक सल्ला दिला पाहिजे, असे मत जेटली यांनी मांडले. सोबतच कधीकधी त्यांनी आपल्या राजकीय पक्षालासुद्धा राष्ट्रहितासाठी ठोस काम करण्याचा संदेश दिला पाहिजे, अशी कोपरखळी मारली. आपण डॉ. सिंग यांचा आदर करीत असून त्यांच्याकडूनही आपल्याला अशाच आदराची अपेक्षा असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. सिंग यांनी एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीचा हवाला देऊन जेटली म्हणाले की, मनमोहनसिंग यांनी निष्पक्षपणे विद्यमान सरकारची मीमांसा केल्यास भारतात असे सरकार आहे ज्यात अंतिम निर्णय पंतप्रधानांचा असतो आणि नैसर्गिक स्रोतांचे वाटप कुठल्याही भ्रष्टाचाराशिवाय पारदर्शक प्रक्रियेद्वारे केले जाते याची जाणीव त्यांना निश्चित होईल. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. या सरकारची धोरणेही अस्पष्ट असल्याने अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. हे सरकार सर्वांत कमकुवत सरकार आहे, अशा शब्दांत मनमोहनसिंग यांनी मोदी सरकारवर तोफ डागली होती. त्याला जेटलींनी जोरदार प्रत्युत्तर दिले.(लोकमत न्यूज नेटवर्क)