शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

चीनचा दौरा अर्धवट सोडून जेटली भारतात

By admin | Updated: June 28, 2016 05:56 IST

चीनचा पाच दिवसांचा दौरा अर्धवट सोडून अर्थमंत्री अरुण जेटली रविवारी रात्री भारतात परतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नवी दिल्ली : चीनचा पाच दिवसांचा दौरा अर्धवट सोडून अर्थमंत्री अरुण जेटली रविवारी रात्री भारतात परतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि जेटली यांच्यावर केलेल्या टीकेमुळेच ते दौरा अर्धवट सोडून परत आल्याचे बोलले जात आहे. जेटली चीनच्या दौऱ्यावर असताना मंत्र्यांनी विदेशात टाय-सूट घालू नये. तशा पेहरावात ते वेटरसारखे दिसतात, असे स्वामी म्हणाले होते. त्यामुळे स्वामी यांच्यावर लगाम लावावा, अशी मागणी जेटली यांनी केली असल्याचे सांगितले जात आहे. जेटलींचा नियोजित दौरा अचानक का बदलला? याबाबत अधिकाऱ्यांनी भाष्य केले नाही, पण मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम आणि अर्थ विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांच्यावर सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलेल्या टीकेमुळे जेटली नाराज आहेत. २४ जून रोजी जेटली चीनच्या दौऱ्यावर रवाना झाले होते. एआयआयबीच्या (एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेन्ट बँक) बैठकीसाठी ते चीनला गेले होते. चीनचे अर्थमंत्री लोऊ जिवेई यांच्याशी ते सोमवारी चर्चा करणार होते, पण ही बैठक रविवारीच झाली. त्यांच्या अन्य कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाचे प्रमुख शू शाओशी आणि पीपल्स बँक आॅफ चायनाचे गव्हर्नर झू शियाओचियान यांच्याशी ते चर्चा करणार होते, पण तत्पूर्वीच अरुण जेटली देशात परत आल्याने तर्कवितर्क केले जात आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)