शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

चीनचा दौरा अर्धवट सोडून जेटली भारतात

By admin | Updated: June 28, 2016 05:56 IST

चीनचा पाच दिवसांचा दौरा अर्धवट सोडून अर्थमंत्री अरुण जेटली रविवारी रात्री भारतात परतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नवी दिल्ली : चीनचा पाच दिवसांचा दौरा अर्धवट सोडून अर्थमंत्री अरुण जेटली रविवारी रात्री भारतात परतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि जेटली यांच्यावर केलेल्या टीकेमुळेच ते दौरा अर्धवट सोडून परत आल्याचे बोलले जात आहे. जेटली चीनच्या दौऱ्यावर असताना मंत्र्यांनी विदेशात टाय-सूट घालू नये. तशा पेहरावात ते वेटरसारखे दिसतात, असे स्वामी म्हणाले होते. त्यामुळे स्वामी यांच्यावर लगाम लावावा, अशी मागणी जेटली यांनी केली असल्याचे सांगितले जात आहे. जेटलींचा नियोजित दौरा अचानक का बदलला? याबाबत अधिकाऱ्यांनी भाष्य केले नाही, पण मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम आणि अर्थ विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांच्यावर सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलेल्या टीकेमुळे जेटली नाराज आहेत. २४ जून रोजी जेटली चीनच्या दौऱ्यावर रवाना झाले होते. एआयआयबीच्या (एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेन्ट बँक) बैठकीसाठी ते चीनला गेले होते. चीनचे अर्थमंत्री लोऊ जिवेई यांच्याशी ते सोमवारी चर्चा करणार होते, पण ही बैठक रविवारीच झाली. त्यांच्या अन्य कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाचे प्रमुख शू शाओशी आणि पीपल्स बँक आॅफ चायनाचे गव्हर्नर झू शियाओचियान यांच्याशी ते चर्चा करणार होते, पण तत्पूर्वीच अरुण जेटली देशात परत आल्याने तर्कवितर्क केले जात आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)