शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ISI व IM च्या मदतीने 'जैश-ए-मोहम्मद' करणार पठाणकोट हल्ल्याची पुनरावृत्ती?

By admin | Updated: May 25, 2016 08:30 IST

पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय (ISI) व इंडियन मुजाहिद्दीनच्या मदतीने 'जैश-ए-मुहम्मद' भारतात पुन्हा पठाणकोटसारखा हल्ला करण्याचा कट रचत आहे.

ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. २५ - नववर्षाच्या सुरूवातीलाच भारतातील पंजाबमधील पठाणकोट येथे हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'च्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात ७ हून अधिक जवान शहीद झाले. पुरेसे पुरावे मिळूनही पाकिस्तानने या हल्ल्यास जबाबादार असणा-या दहशतवादी संघटनेवर कोणतीही कारवाई केलेली नाही. या हल्ल्याची तीव्रता अद्याप कायम असतानाच भारतात पठाणकोट हल्ल्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जैश-ए-मोहम्मद' दशतवादी संघटनेच्या सूचनेवरून दहशतवादी स्लीपर सेल्सनी उत्तर भारतातील ठिकाणांची रेकी करण्यास सुरूवात केली असून भारतात पुन्हा पठाणकोट व गुरूदासपूरसारखे आत्मघाती हल्ले करण्याचा कट रचला जात आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय (ISI) व इंडियन मुजाहिद्दीनच्या काही दहशतवाद्यांच्या मदतीने हा हल्ला करण्यात येणार असल्याचे समजते.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, लष्कराच्या गुप्तचर विभागाने पंजाब सरकारला दिलेल्या अहवालात याप्रकरणी तपशीलवार माहिती नमूद करण्यात आली असून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या अहवालानुसार, ' जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अवैस मोहम्मद हा मलेशियाला जाणार असून, तेथे त्याला बनावट मलेशियन पासपोर्ट देण्यात येणार आहे. त्या आधारे तो भारतात प्रवेश करून हल्ले घडवून आणू शकेल. पाकिस्तानमधील ओकारा येथे राहणा-या अवैसवर भारतातील हल्ल्यांवर नजर ठेवण्याची कामगिरी सोपवण्यात आली आहे,' असेही अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते. 
दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानचे तपास पथक पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारतात येऊन गेले होते. त्यानंतर १८ मे रोजी पंजाब सरकारकडे लष्करी विभागाने हा अहवाल सुपूर्त करत पुन्हा हल्ला होण्याची शक्यता वर्तवल्याचे समजते. या नव्या हल्ल्यांच्या आखणीसाठी 'जैश-ए-मोहम्मद'ने (जेईएम) पाकिस्तानच्या पंजाब व खैबर पक्थुनख्वा येथे  तीन नवीन कार्यालये उघडली आहेत, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ' कोहत व हाजरा भागात जैश-ए-मोहम्मद आपली कार्यालये व नेटवर्क पुन्हा भारत असून, भरती प्रकियाही पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तसेच बालकोट येथे जैश-ए-मोहम्मद संघटनेतर्फे (अतिरेकी हल्ले व कारवायांसाठी) नवी प्रशिक्षण व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे' असेही अहवालात म्हटले आहे.