शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

जैन समाजाचा पद्म पुरस्कारांवर मोठा ठसा

By admin | Updated: April 12, 2015 01:42 IST

कोणाच्या चटकन लक्षात आले नसले तरी प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदा जाहीर झालेल्या विविध ‘पद्म’ पुरस्कारांवर जैन समाजाने मोठा ठसा उमटवला आहे.

नवी दिल्ली : कोणाच्या चटकन लक्षात आले नसले तरी प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदा जाहीर झालेल्या विविध ‘पद्म’ पुरस्कारांवर जैन समाजाने मोठा ठसा उमटवला आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येत अवघे ०.४ टक्के एवढे अल्प प्रमाण असलेल्या या समाजाने ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये मात्र त्याहून कितीतरी अधिक म्हणजे सात टक्क्यांचा वाटा पटकाविला आहे. यंदा ‘पद्म’ पुरस्कारांनी गौरविलेल्या एकूण १०४ मान्यवरांपैकी सातजण जैन समाजाचे आहेत.यंदाच्या मानकऱ्यांमध्ये एक ‘पद्मविभूषण’ आणि सहा ‘पद्मश्री’ जैन समाजातून निवडले गेले आहेत, हे लक्षणीय आहे. शिवाय परोपकारी सेवा, पारंपरिक आणि प्रायोगिक कला व प्रशासन यासह ज्या विविध क्षेत्रांसाठी या मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे त्यावरून जैन समाजाचे कार्य किती विविधांगी आहे, हेही स्पष्ट होते.जैन समाजातील ज्या महानुभावांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरविण्यात आले त्यांत डॉ. डी. वीरेंद्र हेग्गडे (पद्मविभूषण), राहुल जैन, रवींद्र जैन, संजय लीला भन्साळी, वीरेंद्र राज मेहता, तारक मेहता आणि मीठा लाल मेहता (सर्व पद्मश्री) यांचा समावेश आहे. यापैकी मिठा लाल मेहता यांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला.डॉ. हेगडे हे थोर परोपकारी लोकसेवक व दानशूर असून ते धर्मस्थळ मंदिराचे प्रमुख आहेत. त्यांच्या संस्थेतर्फे आयुर्वेद, निसर्गोपचार, दंतवैद्यक, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, कायदा व व्यवस्थापनशास्त्र यांचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांसह एकूण ४० विविध शिक्षणसंस्था चालविल्या जातात. याखेरीज ग्राणीण रोजगार, कौशल्य विकास, शाश्वत ऊर्जास्रोत, व्यवसमुक्ती व मंदिरांचा जीर्णोद्धार अशी कामेही डॉ. हेगडे यांच्या संस्थांतर्फे केली जातात. मिठा लाल मेहता व वीरेंद्र राज मेहता हे निवृत्त सनदी अधिकारी आहेत. संजय लीला भन्साळी व रवींद्र जैन हे अनुक्रमे लोकप्रिय चित्रपेच निर्माते व संगीत दिग्दर्शक आहेत. तारक मेहता हे गुजराती रंगभूमी व छोट्या पडद्यावरील प्रथितयश अभिनेते व दिग्दर्शक आहेत. राहुल जैन हे पारंपरिक वस्त्रविणकामतज्ज्ञ व आघाडीचे टेक्स्टाईल डिझायनर आहेत.शिक्षण, प्रबोधनात आघाडीजैन समाज शिक्षण व प्रबोधनात नेहमीच आघाडीवर राहिला आहे. जैन समाजातील साक्षरतेचे ९४.१ टक्के हे साक्षरतेचे प्रमाण ६४.८ टक्के या राष्ट्रीय सरासरीहून कितीतरी जास्त आहे. शिवाय पुरुष व महिलांच्या साक्षरतेमधील तफावत जैन समाजात सर्वात कमी आहे. देश पातळीवर हे प्रमाण सरासरी २१ टक्के आहे तर जैन समाजात ही तफावत जेमतेम ६.८ टक्के आहे. भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई व थोर कवी, विचारवंत आणि तत्वचिंतक बनारसीदास हेही याच समाजाचे होते.