शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

जैन समाजाचा पद्म पुरस्कारांवर मोठा ठसा

By admin | Updated: April 12, 2015 01:42 IST

कोणाच्या चटकन लक्षात आले नसले तरी प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदा जाहीर झालेल्या विविध ‘पद्म’ पुरस्कारांवर जैन समाजाने मोठा ठसा उमटवला आहे.

नवी दिल्ली : कोणाच्या चटकन लक्षात आले नसले तरी प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदा जाहीर झालेल्या विविध ‘पद्म’ पुरस्कारांवर जैन समाजाने मोठा ठसा उमटवला आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येत अवघे ०.४ टक्के एवढे अल्प प्रमाण असलेल्या या समाजाने ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये मात्र त्याहून कितीतरी अधिक म्हणजे सात टक्क्यांचा वाटा पटकाविला आहे. यंदा ‘पद्म’ पुरस्कारांनी गौरविलेल्या एकूण १०४ मान्यवरांपैकी सातजण जैन समाजाचे आहेत.यंदाच्या मानकऱ्यांमध्ये एक ‘पद्मविभूषण’ आणि सहा ‘पद्मश्री’ जैन समाजातून निवडले गेले आहेत, हे लक्षणीय आहे. शिवाय परोपकारी सेवा, पारंपरिक आणि प्रायोगिक कला व प्रशासन यासह ज्या विविध क्षेत्रांसाठी या मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे त्यावरून जैन समाजाचे कार्य किती विविधांगी आहे, हेही स्पष्ट होते.जैन समाजातील ज्या महानुभावांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरविण्यात आले त्यांत डॉ. डी. वीरेंद्र हेग्गडे (पद्मविभूषण), राहुल जैन, रवींद्र जैन, संजय लीला भन्साळी, वीरेंद्र राज मेहता, तारक मेहता आणि मीठा लाल मेहता (सर्व पद्मश्री) यांचा समावेश आहे. यापैकी मिठा लाल मेहता यांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला.डॉ. हेगडे हे थोर परोपकारी लोकसेवक व दानशूर असून ते धर्मस्थळ मंदिराचे प्रमुख आहेत. त्यांच्या संस्थेतर्फे आयुर्वेद, निसर्गोपचार, दंतवैद्यक, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, कायदा व व्यवस्थापनशास्त्र यांचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांसह एकूण ४० विविध शिक्षणसंस्था चालविल्या जातात. याखेरीज ग्राणीण रोजगार, कौशल्य विकास, शाश्वत ऊर्जास्रोत, व्यवसमुक्ती व मंदिरांचा जीर्णोद्धार अशी कामेही डॉ. हेगडे यांच्या संस्थांतर्फे केली जातात. मिठा लाल मेहता व वीरेंद्र राज मेहता हे निवृत्त सनदी अधिकारी आहेत. संजय लीला भन्साळी व रवींद्र जैन हे अनुक्रमे लोकप्रिय चित्रपेच निर्माते व संगीत दिग्दर्शक आहेत. तारक मेहता हे गुजराती रंगभूमी व छोट्या पडद्यावरील प्रथितयश अभिनेते व दिग्दर्शक आहेत. राहुल जैन हे पारंपरिक वस्त्रविणकामतज्ज्ञ व आघाडीचे टेक्स्टाईल डिझायनर आहेत.शिक्षण, प्रबोधनात आघाडीजैन समाज शिक्षण व प्रबोधनात नेहमीच आघाडीवर राहिला आहे. जैन समाजातील साक्षरतेचे ९४.१ टक्के हे साक्षरतेचे प्रमाण ६४.८ टक्के या राष्ट्रीय सरासरीहून कितीतरी जास्त आहे. शिवाय पुरुष व महिलांच्या साक्षरतेमधील तफावत जैन समाजात सर्वात कमी आहे. देश पातळीवर हे प्रमाण सरासरी २१ टक्के आहे तर जैन समाजात ही तफावत जेमतेम ६.८ टक्के आहे. भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई व थोर कवी, विचारवंत आणि तत्वचिंतक बनारसीदास हेही याच समाजाचे होते.