शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जीएसटीचे फायदे दिसू लागले आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:05 IST

१ जुलैपासून लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कराचे फायदे आता दिसू लागले असून, या ‘एक देश एक कर’ प्रणालीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन झाले आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली : १ जुलैपासून लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कराचे फायदे आता दिसू लागले असून, या ‘एक देश एक कर’ प्रणालीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन झाले आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. आकाशवाणीवरील आपल्या ३४व्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात ते बोलत होते.     मोदी म्हणाले की, कोट्यवधी लोकांच्या सहकार्याने हे मोठे परिवर्तन झाले आहे. एवढ्या विशाल देशात ते लागू करणे व यशस्वीपणे पुढे जाणे ही यशाची नवी उंची आहे. जगभरातील विद्यापीठांसाठी हे ‘केस स्टडी’ ठरू  शकते. जीएसटी लागू करताना सरकारची ही प्राथमिकता होती की, गरिबांवर याचे ओझे पडायला नको. या कार्यक्रमात मोदी यांनी देशाच्या विविध भागांत आलेल्या पुरांचा उल्लेख केला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाचा उल्लेख केला. सण-उत्सवाच्या काळात गरीब लोकांनी बनविलेल्या पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. महिला विश्वकप स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने केलेल्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले.ही सांस्कृतिक सुधारणेची मोहीम -ही केवळ सुधारणा नाही तर असे पाऊल आहे जे प्रामाणिकपणाच्या नव्या संस्कृतीला ताकद देणार आहे. एक प्रकारे ही सांस्कृतिक सुधारणेची मोहीम आहे. ग्राहकांचा व्यापा-यांबाबतचा विश्वास वाढत आहे. परिवहन क्षेत्रावरही याचा सकारात्मक परिणाम झाला आहे.१ जुलै रोजी देशात लागू करण्यात आलेल्या जीएसटी व्यवस्थेचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, एक देश एक कराचे मोठे स्वप्न साकार झाले आहे. जीएसटी लागू होऊन एक महिना झाला आहे. त्याचे फायदे आता दिसू लागले आहेत. हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे. एखादा गरीब व्यक्ती मला पत्र लिहून हे कळवितो की, जीएसटीमुळे एका गरिबाच्या जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी झाले आहेत तेव्हा अतिशय समाधान वाटते. जीएसटीला मी ‘गुड अ‍ॅण्ड सिंपल टॅक्स’ त्यामुळेच म्हणतो. आमच्या अर्थव्यवस्थेवर याचा कमी काळात सकारात्मक परिणाम झाला आहे. या परिवर्तनातून देशात नवा विश्वास निर्माण झाला आहे. सर्व निर्णय केंद्र आणि राज्य यांनी सर्व सहमतीने घेतले आहेत. संघराज्यीय सहकाराचे हे उदाहरण आहे, कारण या अप्रत्यक्ष करप्रणालीत सर्व निर्णयात राज्ये सहभागी आहेत.