शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

देशासाठी जगेन-मोदी

By admin | Updated: May 21, 2014 04:11 IST

आपण सोपवलेली जबाबदारी मी स्वीकारतो़ माझ्या सरकारमुळे आपल्याला कधीही शरमेने मान खाली घालावी लागणार नाही़ सामान्य लोकांमध्ये एक नवी आशा निर्माण झाली आहे़

आपण सोपवलेली जबाबदारी मी स्वीकारतो़ माझ्या सरकारमुळे आपल्याला कधीही शरमेने मान खाली घालावी लागणार नाही़ सामान्य लोकांमध्ये एक नवी आशा निर्माण झाली आहे़ देशाच्या मतदारांनी आशा आणि विश्वासापोटीच मतदान केल्याचे या निवडणुकीतून स्पष्ट झाले़ भाजपा सरकारच्या अखेरच्या दिवसापर्यंत हे सरकार कुणाचे असेल? ते फक्त गरिबांसाठीचे असेल़ कोट्यवधी युवा आणि माता आणि भगिनींच्या सुरक्षेसाठी असेल, ग्रामीण भागातील उपेक्षित आणि वंचितांसाठी असेल़ निवडणूक निकालांचे वेगळ्या प्रकारे मूल्यांकन होत आहे़ जनतेने त्रिशंकू वा विभाजित जनादेश दिला असता तर तो सरकारविरोधी संतापातून दिलेला जनादेश मानता आला असता़ पण भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे़ याचा अर्थ लोकांनी आशा आणि विश्वासाने मतदान केले. जनतेच्या या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यास आम्ही सर्वकाही करणाऱ इथे निराशेला कुठलेही स्थान नाही़ प्रत्येकासाठी आणि प्रत्येकाचा विकास हे नव्या सरकारचे ध्येय आहे़ माझे सरकार फक्त माझ्यासाठी असणार नाही, तर ते संपूर्ण देशासाठी असेल़ सरकार गरिबांसाठी आहे आणि आम्हाला त्यांच्यासाठी काही करायचे आहे़ आज अटलजी प्रकृती कारणास्तव बैठकीला येऊ शकले नाहीत. ते हजर असते तर सोन्याहून पिवळे झाले असते़ त्यांचा आशीर्वाद होता आणि यापुढे राहील़ जबाबदारीच्या एका युगाचा प्रारंभ झाला आहे कारण जनतेला माझ्याकडून अपार आशा आहेत़ मुलगा कधी आईवर कृपा करू शकतो का? तो केवळ आईची सेवा करतो़ भारत माझी आई आहे; तसेच भाजपा माझी आई आहे़ म्हणूनच मी कधीच भाजपावर ‘कृपा’ करू शकत नाही़ कृपा तर पक्षाने माझ्यावर केली व मला माउलीची सेवा करायची संधी दिली़ आपण आज लोकशाहीच्या मंदिरात आहोत़ आपण सर्व निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करू. पदासाठी नाही, तर देशातील जनतेच्या सेवेसाठी़ कार्य, जबाबदारी सर्वांत मोठी गोष्ट आहे़ गतवर्षी १३ सप्टेंबरला पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवून भाजपाने माझ्यावर जबाबदारी सोवपली़ ती पूर्ण करण्यास शरीराचा प्रत्येक कण आणि माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मी समर्पित केला होता़ १० मे रोजी निवडणूक प्रचार संपल्यावर पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांना मी माझे रिपोर्ट कार्ड सादर केले होते़ २०१९मध्ये माझ्या सरकारचे असेच रिपोर्ट कार्ड खासदार, पक्ष आणि देशाला सादर करेन.मी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनलो तेव्हाच मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्य विधानसभा बघितली़ तेच आज झाले़ मी प्रथमच हा सेंट्रल हॉल पाहिला. पूर्वीच्या सरकारांनी काहीच केले नाही, असे मी म्हणत नाही़ प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न केला़ त्या सगळ्या सरकारला त्यांच्या उपलब्धींसाठी मी शुभेच्छा देतो़ जे काही चांगले आहे ते पुढे नेल्याने देश सामर्थ्यवान होईल़ देशाजवळ अपार क्षमता आहे़ सर्व देशवासी एक पाऊल चालले तर हा देश १२५ कोटी पावले पुढे जाऊ शकतो़ मी आशावादी आहे़ सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जावे लागेल़ प्रत्येकात शक्ती आहे़ या प्रत्येकाला नव्या सरकारला संधी द्यायची आहे़ ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र घेऊन पुढे जायचे आहे़ मला चांगले सोबती-सहकारी लाभले आहेत़ त्यांच्याबाबत माझ्याकडे तक्रारी येतील असे मला वाटत नाही़ गेल्या काही महिन्यांपासून मोदी दिसत आहेत़ पण हा माझा मोठेपणा नाही, तर पक्षातील नेत्यांचा मोठेपणा आहे़ आज मिळालेला विजय हा पाच पिढ्यांच्या तपाचे फळ आहे़