शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

जगद्गुरू स्वामी रामानंदाचार्य संशोधन केंद्रांची निर्मिती व्हावी

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेची मागणी

अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेची मागणी
नाशिक : कुंभमेळा तब्बल बारा वर्षानंतर भरतो, त्यामुळे तो एक मोठा संशोधनाचा विषय आहे. त्यासाठी जगद्गुरू स्वामी रामानंदाचार्य यांच्या नावाने तपोवनात संशोधन केंद्रांची निर्मिती व्हावी अशी मागणी अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आर.के. वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत केली.
तसेच कुंभमेळा वैष्णव समाजाचा असूनही कुंभमेळ्याच्या शासकीय समित्यांवर अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेच्या प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आली नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. वैष्णव समाज गृहस्थी, विरक्ती असा विभागला गेलेला आहे. ज्यांना या समित्यांवर स्थान दिले आहे, त्यांना बैरागी वैष्णव समाजाबाबत कोणतीही माहिती नाही. विधानमंडळातही आरक्षण मिळवून आमच्या बैरागी वैष्णव समाजाला प्रतिनिधित्वाची संधी मिळावी, महाराष्ट्रात तीन लाख इतका बैरागी समाज आहे. बैरागी वैष्णव समाजाची स्वतंत्र आकडेवारी शासनाकडून घोषित व्हावी, बैरागी समाज ही स्वतंत्र जात असून, शासनाच्या राजपत्रात गोसावी तत्सम बैरागी असा सोयीने उल्लेख करण्यात आला आहे. सरकारच्या सूचीमध्ये बैरागी वैष्णव समाजाच्या अभ्यासकांची मते घेऊन दुरुस्ती करण्यात यावी, मंदिराच्या इनामी जमिनी परंपरागत पुजारी वैष्णव बैरागी यांना मिळाव्यात, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आरक्षण मिळावे आदि मागण्या पत्रकार परिषदेत करण्यात आल्या. यावेळी परिषदेचे अध्यक्ष अशोकदास बैरागी, दीपक बैरागी, बाळासाहेब बैरागी, कल्पेश वैष्णव आदि उपस्थित होते. ( प्रतिनिधी)
इन्फो:
मंदिरांच्या शेजारी वैष्णव समाजाच्या बैरागींना राहण्यासाठी परंपरांगत जमिनी आहेत; मात्र या जागा जिल्हाभरात बहुतांश व्यापार्‍यांनी बळकावल्या आहेत. सदर व्यापार्‍यांनी बळकावलेल्या जमिनी परत मिळाव्यात.
दीपक वैष्णव, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषद