शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

अच्छे दिन येण्यासाठी २५ वर्ष लागतील - अमित शहा

By admin | Updated: July 14, 2015 11:59 IST

निवडणूक प्रचारादरम्यान दाखवण्यात आलेले 'अच्छे दिनां'चे प्रत्यक्षात साकार होण्यासाठी ५ नव्हे २५ वर्ष लागतील असे विधान भाजपाध्यक्ष अमित शहांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

भोपाळ,दि. १४ -  निवडणूक प्रचारादरम्यान दाखवण्यात आलेले 'अच्छे दिनां'चे प्रत्यक्षात साकार होण्यासाठी ५ नव्हे २५ वर्ष लागतील असे विधान भाजपाध्यक्ष अमित शहांनी केले आहे.  'देशात ख-या अर्थानं अच्छे दिन येण्यासाठी ५ वर्ष पुरेशी नाहीत, त्यासाठी २५ वर्ष लागतील' असे अमित शहांनी म्हटले आहे. भोपाळमधील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला 'अच्छे दिन आनेवाले है' असे आश्वासन दिले होते. परिस्थिती बदल होण्याच्या अपेक्षेने जनतेने भाजपाला भरभरून मतदान करत सत्ता मिळवून दिली. मात्र शहा यांच्या विधानामुळे मतदारांचा अपेक्षाभंग होऊन भाजपाला जनतेचा रोष पत्करावा लागण्याची शक्यता आहे.

' ब्रिटीशांचे राज्य येण्याआधी जागतिक स्तरावर भारताचे जे स्थान होतं ते परत मिळवून देणं हे आमचे उद्दिष्ट आहे. येत्या पाच वर्षांत भाजपा सरकार महागाई, परराष्ट्र धोरण, आर्थिक विकास, सुरक्षा, रोजगारनिर्मिती, गरिबी यांच्या धोरणांच योग्य बदल घडवेल. पण जर भारताला जगात सर्वश्रेष्ठ बनवायचे असेल तर त्यासाठी २५ वर्षांचा कालावधी लागेल. तेव्हाच देश अव्वल पद गाठू शकेल', असे ते म्हणाले.