शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

अच्छे दिन येण्यासाठी २५ वर्ष लागतील - अमित शहा

By admin | Updated: July 14, 2015 11:59 IST

निवडणूक प्रचारादरम्यान दाखवण्यात आलेले 'अच्छे दिनां'चे प्रत्यक्षात साकार होण्यासाठी ५ नव्हे २५ वर्ष लागतील असे विधान भाजपाध्यक्ष अमित शहांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

भोपाळ,दि. १४ -  निवडणूक प्रचारादरम्यान दाखवण्यात आलेले 'अच्छे दिनां'चे प्रत्यक्षात साकार होण्यासाठी ५ नव्हे २५ वर्ष लागतील असे विधान भाजपाध्यक्ष अमित शहांनी केले आहे.  'देशात ख-या अर्थानं अच्छे दिन येण्यासाठी ५ वर्ष पुरेशी नाहीत, त्यासाठी २५ वर्ष लागतील' असे अमित शहांनी म्हटले आहे. भोपाळमधील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला 'अच्छे दिन आनेवाले है' असे आश्वासन दिले होते. परिस्थिती बदल होण्याच्या अपेक्षेने जनतेने भाजपाला भरभरून मतदान करत सत्ता मिळवून दिली. मात्र शहा यांच्या विधानामुळे मतदारांचा अपेक्षाभंग होऊन भाजपाला जनतेचा रोष पत्करावा लागण्याची शक्यता आहे.

' ब्रिटीशांचे राज्य येण्याआधी जागतिक स्तरावर भारताचे जे स्थान होतं ते परत मिळवून देणं हे आमचे उद्दिष्ट आहे. येत्या पाच वर्षांत भाजपा सरकार महागाई, परराष्ट्र धोरण, आर्थिक विकास, सुरक्षा, रोजगारनिर्मिती, गरिबी यांच्या धोरणांच योग्य बदल घडवेल. पण जर भारताला जगात सर्वश्रेष्ठ बनवायचे असेल तर त्यासाठी २५ वर्षांचा कालावधी लागेल. तेव्हाच देश अव्वल पद गाठू शकेल', असे ते म्हणाले.