शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

...तर गंगेच्या स्वच्छतेसाठी २०० वर्ष लागतील - सुप्रीम कोर्टाने फटकारले

By admin | Updated: September 3, 2014 17:27 IST

गंगा स्वच्छतेसंदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या विकास आराखड्यावर नाराजी व्यक्त करत हा आराखडा बघता गंगा स्वच्छता करण्यास आणखी २०० वर्ष लागतील अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३ - गंगा स्वच्छतेसंदर्भात केंद्र सरकारने सादर केलेल्या विकास आराखड्यावर नाराजी व्यक्त करत हा आराखडा बघता गंगा स्वच्छता करण्यास आणखी २०० वर्ष लागतील अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले आहे. केंद्र सरकारने गंगा स्वच्छतेसंदर्भात ठोकळेबाज उत्तर न देता टप्पाटप्प्यात योजना कशी राबवली जाईल हे स्पष्ट करावे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. 
गंगा नदीच्या स्वच्छतेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला रोडमॅप सादर करण्याचे आदेश दिले होते. बुधवारी याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे न्या. टी.एस. ठाकूर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. गंगा नदीला राष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. आयआयटीतील तज्ज्ञ गंगा नदी प्राधिकरणाला अंतिम रुप देत असून हे प्राधिकरण आणखी प्रभावी व्हावे यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचे सॉलिसीटीर जनरल रंजीत कुमार यांनी कोर्टासमोर सांगितले.  केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रावर सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारने दिलेली आराख़डा बघता गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी आणखी २०० वर्ष लागतील असे खंडपीठाने सुनावले. २५ हजार किलोमीटर लांब असलेल्या गंगा नदीच्या स्वच्छतेसंदर्भात केंद्रसरकारने टप्पाटप्प्यात कशी मोहीम राबवता येईल यावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्यावे असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. यासाठी कोर्टाने केंद्रसरकारला तीन आठवड्यांचा कालावधी दिला आहे.