शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

...तर हा पूर्वनियोजित खून ठरेल : भारत

By admin | Updated: April 11, 2017 04:41 IST

कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानमध्ये चालविलेला खटला हा निव्वळ ‘फार्स’ होता व अशा खटल्यात दिलेल्या शिक्षेची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली गेली तर त्यास पाकिस्तान

नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानमध्ये चालविलेला खटला हा निव्वळ ‘फार्स’ होता व अशा खटल्यात दिलेल्या शिक्षेची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली गेली तर त्यास पाकिस्तान सरकारने भारतीय नागरिकाचा पूर्वनियोजित पद्धतीने केलेला खून मानले जाईल, अशा तिखट शब्दांत भारताने आपली भूमिका पाकिस्तानला कळविली.परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून घेतले आणि भारताच्या तीव्र प्रतिक्रियेचा खलिता त्यांच्याकडे सापविला. बासित यांनी तो पाकिस्तान सरकारकडे पोहोचविणे अपेक्षित आहे.कायदा आणि न्यायाच्या मुलभूत तत्त्वांचे पालन न करता खटला चालवून दिलेल्या या शिक्षेनुसार जाधव यांना फाशी दिली गेली तर भारत सरकार आणि भारतीय जनता पाकिस्तानने भारतीय नागरिकाचा पूर्वनियोजित पद्धतीने केलेला खून मानेल, असेही बासित यांना स्पष्टपणे बजावण्यात आले.खटल्यात जाधव यांना बचावाची पूर्ण संधी देण्यात आली व बचावासाठी वकिलही देण्यात आला हा पाकिस्तानचा दावा धादान्त फसवा असल्याचे नमूद करता बासित यांना असेही सांगण्यात आले की, जाधव यांना राजनैतिक प्रतिनिधीमार्फत मदत देण्याची भारताने १३ वेळा केलेली विनंती पाकिस्तानने अमान्य केली. एवढेच नव्हे तर जाधव यांच्यावर खटला चालविला जात आहे, हे तेथील भारतीय उच्चायोगाला कळविण्याचे सौजन्यही पाकिस्तानने दाखविले नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)अपहरण करून पाकिस्तानात नेलेजाधव यांस बलुचिस्तानात ‘हेरगिरी’ करताना पकडण्यात आले हेही पाकिस्तानने रचलेले एक कुभांड आहे. मुळात कुलभूषण जाधव त्या देशात गेले कसे याचा कोणताही समाधानकारक खुलासा पाकिस्तानने कधीही केला नाही. प्रत्यक्षात जाधव यांचे इराणमधून अपहरण करून त्यांना पाकिस्तानात नेण्यात आले होते, असा आरोप भारताने केला आहे.