शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

...तर हा पूर्वनियोजित खून ठरेल : भारत

By admin | Updated: April 11, 2017 04:41 IST

कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानमध्ये चालविलेला खटला हा निव्वळ ‘फार्स’ होता व अशा खटल्यात दिलेल्या शिक्षेची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली गेली तर त्यास पाकिस्तान

नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानमध्ये चालविलेला खटला हा निव्वळ ‘फार्स’ होता व अशा खटल्यात दिलेल्या शिक्षेची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली गेली तर त्यास पाकिस्तान सरकारने भारतीय नागरिकाचा पूर्वनियोजित पद्धतीने केलेला खून मानले जाईल, अशा तिखट शब्दांत भारताने आपली भूमिका पाकिस्तानला कळविली.परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून घेतले आणि भारताच्या तीव्र प्रतिक्रियेचा खलिता त्यांच्याकडे सापविला. बासित यांनी तो पाकिस्तान सरकारकडे पोहोचविणे अपेक्षित आहे.कायदा आणि न्यायाच्या मुलभूत तत्त्वांचे पालन न करता खटला चालवून दिलेल्या या शिक्षेनुसार जाधव यांना फाशी दिली गेली तर भारत सरकार आणि भारतीय जनता पाकिस्तानने भारतीय नागरिकाचा पूर्वनियोजित पद्धतीने केलेला खून मानेल, असेही बासित यांना स्पष्टपणे बजावण्यात आले.खटल्यात जाधव यांना बचावाची पूर्ण संधी देण्यात आली व बचावासाठी वकिलही देण्यात आला हा पाकिस्तानचा दावा धादान्त फसवा असल्याचे नमूद करता बासित यांना असेही सांगण्यात आले की, जाधव यांना राजनैतिक प्रतिनिधीमार्फत मदत देण्याची भारताने १३ वेळा केलेली विनंती पाकिस्तानने अमान्य केली. एवढेच नव्हे तर जाधव यांच्यावर खटला चालविला जात आहे, हे तेथील भारतीय उच्चायोगाला कळविण्याचे सौजन्यही पाकिस्तानने दाखविले नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)अपहरण करून पाकिस्तानात नेलेजाधव यांस बलुचिस्तानात ‘हेरगिरी’ करताना पकडण्यात आले हेही पाकिस्तानने रचलेले एक कुभांड आहे. मुळात कुलभूषण जाधव त्या देशात गेले कसे याचा कोणताही समाधानकारक खुलासा पाकिस्तानने कधीही केला नाही. प्रत्यक्षात जाधव यांचे इराणमधून अपहरण करून त्यांना पाकिस्तानात नेण्यात आले होते, असा आरोप भारताने केला आहे.