शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरात ब्राह्मणेतर पुजारी नेमणे घटनाबाह्य नाही पण...

By admin | Updated: December 18, 2015 01:59 IST

हिंदू मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर पुजारी नेमण्याचा निर्णय एखाद्या सरकारने घेतला तर तो घटनाबाह्य ठरत नाही. मात्र एखादे मंदिर एका ठराविक धार्मिक

नवी दिल्ली : हिंदू मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर पुजारी नेमण्याचा निर्णय एखाद्या सरकारने घेतला तर तो घटनाबाह्य ठरत नाही. मात्र एखादे मंदिर एका ठराविक धार्मिक पंथाने स्थापन केलेले असेल व त्या मंदिरातील पूजाविधी एका विशिष्ट गोत्राच्या व्यक्तीने करण्याची परंपरा धर्मग्रंथांमध्ये नमूद केलेली असेल तर अशा मंदिरात त्याच गोत्राचा पुजारी नेमावा लागेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.न्यायालयाने म्हटले की, भारतीय राज्यघटनेने धर्म, वर्ण, जात इत्यादींच्या आधारे भेदभाव करणे निषिद्ध ठरविले आहे. पण त्याच बरोबर प्रत्येकाला आपल्या धर्माचे आचरण करण्याचेही स्वातंत्र्य दिलेले आहे. धर्माचरणाचे हे स्वातंत्र्य केवळ धर्मतत्वे आणि श्रद्धेपुरते मर्यादित नाही. तर त्यात त्या धर्मश्रद्धेनुसार केल्या जाणाऱ्या विधी व कर्मकांडांनाही लागू होते.न्यायालयाने म्हटले की, राज्यघटनेने समानता आणि समान संधीचे तत्व स्वीकारले आहे. तरीही मंदिर ज्या पंथाचे असेल त्या पंथाच्या रुढी-परंपरांनुसारच तेथील पूजा-अर्चा होणे हा त्या पंथाच्या लोकांच्या धर्माचरणाच्या मूलभूत अधिकाराचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे अशा मंदिरातील पुजाऱ्याची नेमणूक करताना काहींचा, धर्म, वर्ण अथवा जातीच्या आधारावर नव्हे, तर ती व्यक्ती त्या पंथाची नाही म्हणून विचार न केला जाणे समानता व समान संधीच्या तत्वाचे उल्लंघन ठरत नाही. थोडक्यात शैवपंथीय मंदिरात वैष्णव पंथाची व वैष्णव पंथीय मंदिरात शैव पंथीय व्यक्तीची पुजारी म्हणून नेमणूक केली जाऊ शकत नाही.तमिळनाडूतील मंदिरांमधील पुजाऱ्यांच्या नेमणुकांसंबंधीच्या एका प्रकरणात न्या. रंजन गोगोई व न्या. एन.व्ही. रमणा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. राज्यातील मंदिरांत, एरवी पात्रता निकषांत बसणाऱ्या व सुयोग्य प्रशिक्षण घेतलेल्या कोणाही हिंदू व्यक्तीची पुजारी म्हणून नेमणूक करण्याची तरतूद करणारा शासन निर्णय मे २००६ मध्ये जारी केला होता. मदुराई येथील श्री मीनाक्षी मंदिरातील काही पुजाऱ्यांनी (अर्चक) आणि पुजाऱ्यांच्या संघटनेने त्यास आव्हान दिले होते.न्यायालयाने धार्मिक स्वातंत्र्य व अन्य मुलभूत हक्कांसंबंधीच्या तरतुदी आणि त्यासंदर्भात पूर्वी दिल्या गेलेल्या अनेक न्यायनिर्णयांचे सविस्तर विवेचन केले व असे म्हटले की, सरकारचा निर्णय ठोबळमानाने घटनाबाह्य ठरत नाही. मात्र त्यानुसार केल्या जाणाऱ्या पुजाऱ्यांच्या नेमणुका मात्र धार्मिक स्वातंत्र्याच्या निकशावर तपासल्या जाऊ शकतील. (विशेष प्रतिनिधी)बडव्यांचे काय होणार?पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरातही बडव्यांचे पूर्वापार चालत आलेली मक्तेदारी मोडीत काढत मंदिर समितीने इतरांची पुजारी म्हणून नेमणूक केली आहे. बडव्यांना याविरुद्ध न्यायालयीन लढा देऊन तो जिंकायचा असेल तर त्यांनाही पंढरपूरचे मंदिर हे एका ठराविक धर्म पंथाचे मंदिर आहे आणि या मंदिरात ठराविक घराण्यांतील व्यक्तींचीच पुजारी म्हणून नेमणूक करण्याची पूर्वापार चालत आलेली शास्त्राधारित परंपरा आहे, हे सप्रमाण सिद्ध करावे लागेल.