शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

मंदिरात ब्राह्मणेतर पुजारी नेमणे घटनाबाह्य नाही पण...

By admin | Updated: December 18, 2015 01:59 IST

हिंदू मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर पुजारी नेमण्याचा निर्णय एखाद्या सरकारने घेतला तर तो घटनाबाह्य ठरत नाही. मात्र एखादे मंदिर एका ठराविक धार्मिक

नवी दिल्ली : हिंदू मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर पुजारी नेमण्याचा निर्णय एखाद्या सरकारने घेतला तर तो घटनाबाह्य ठरत नाही. मात्र एखादे मंदिर एका ठराविक धार्मिक पंथाने स्थापन केलेले असेल व त्या मंदिरातील पूजाविधी एका विशिष्ट गोत्राच्या व्यक्तीने करण्याची परंपरा धर्मग्रंथांमध्ये नमूद केलेली असेल तर अशा मंदिरात त्याच गोत्राचा पुजारी नेमावा लागेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.न्यायालयाने म्हटले की, भारतीय राज्यघटनेने धर्म, वर्ण, जात इत्यादींच्या आधारे भेदभाव करणे निषिद्ध ठरविले आहे. पण त्याच बरोबर प्रत्येकाला आपल्या धर्माचे आचरण करण्याचेही स्वातंत्र्य दिलेले आहे. धर्माचरणाचे हे स्वातंत्र्य केवळ धर्मतत्वे आणि श्रद्धेपुरते मर्यादित नाही. तर त्यात त्या धर्मश्रद्धेनुसार केल्या जाणाऱ्या विधी व कर्मकांडांनाही लागू होते.न्यायालयाने म्हटले की, राज्यघटनेने समानता आणि समान संधीचे तत्व स्वीकारले आहे. तरीही मंदिर ज्या पंथाचे असेल त्या पंथाच्या रुढी-परंपरांनुसारच तेथील पूजा-अर्चा होणे हा त्या पंथाच्या लोकांच्या धर्माचरणाच्या मूलभूत अधिकाराचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे अशा मंदिरातील पुजाऱ्याची नेमणूक करताना काहींचा, धर्म, वर्ण अथवा जातीच्या आधारावर नव्हे, तर ती व्यक्ती त्या पंथाची नाही म्हणून विचार न केला जाणे समानता व समान संधीच्या तत्वाचे उल्लंघन ठरत नाही. थोडक्यात शैवपंथीय मंदिरात वैष्णव पंथाची व वैष्णव पंथीय मंदिरात शैव पंथीय व्यक्तीची पुजारी म्हणून नेमणूक केली जाऊ शकत नाही.तमिळनाडूतील मंदिरांमधील पुजाऱ्यांच्या नेमणुकांसंबंधीच्या एका प्रकरणात न्या. रंजन गोगोई व न्या. एन.व्ही. रमणा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. राज्यातील मंदिरांत, एरवी पात्रता निकषांत बसणाऱ्या व सुयोग्य प्रशिक्षण घेतलेल्या कोणाही हिंदू व्यक्तीची पुजारी म्हणून नेमणूक करण्याची तरतूद करणारा शासन निर्णय मे २००६ मध्ये जारी केला होता. मदुराई येथील श्री मीनाक्षी मंदिरातील काही पुजाऱ्यांनी (अर्चक) आणि पुजाऱ्यांच्या संघटनेने त्यास आव्हान दिले होते.न्यायालयाने धार्मिक स्वातंत्र्य व अन्य मुलभूत हक्कांसंबंधीच्या तरतुदी आणि त्यासंदर्भात पूर्वी दिल्या गेलेल्या अनेक न्यायनिर्णयांचे सविस्तर विवेचन केले व असे म्हटले की, सरकारचा निर्णय ठोबळमानाने घटनाबाह्य ठरत नाही. मात्र त्यानुसार केल्या जाणाऱ्या पुजाऱ्यांच्या नेमणुका मात्र धार्मिक स्वातंत्र्याच्या निकशावर तपासल्या जाऊ शकतील. (विशेष प्रतिनिधी)बडव्यांचे काय होणार?पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरातही बडव्यांचे पूर्वापार चालत आलेली मक्तेदारी मोडीत काढत मंदिर समितीने इतरांची पुजारी म्हणून नेमणूक केली आहे. बडव्यांना याविरुद्ध न्यायालयीन लढा देऊन तो जिंकायचा असेल तर त्यांनाही पंढरपूरचे मंदिर हे एका ठराविक धर्म पंथाचे मंदिर आहे आणि या मंदिरात ठराविक घराण्यांतील व्यक्तींचीच पुजारी म्हणून नेमणूक करण्याची पूर्वापार चालत आलेली शास्त्राधारित परंपरा आहे, हे सप्रमाण सिद्ध करावे लागेल.