शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रघुराम राजन यांच्यावर टीका करणे योग्य नाही - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: June 27, 2016 19:01 IST

कोणत्याही राजकीय पक्षाने आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन यांच्यावर टीका करणे योग्य नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन यांच्यावर टीका करणे योग्य नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. ' टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर मत मांडले. 
भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना पदावरून तातडीने हटवावे अशी मागणी केली होती. दोन पानी पत्रात स्वामी यांनी रघुराम राजन यांच्यावर कठोर टीका करत राजन हे मनाने पूर्णपणे भारतीय नसल्याचा आरोप केला होता. त्यावरून मोठा वाद झाला होता. तर गेल्या आठवड्यात खुद्द रघुराम राजन यांनीच आरबीआय गव्हर्नर म्हणून आपण दुसरा कार्यकाळ भूषवणार नसल्याचे म्हटले होते. चार सप्टेंबरला कार्यकाळ संपल्यानंतर ते पुन्हा शैक्षणिक क्षेत्राकडे वळणार आहेत.
राजन यांच्यावर झालेली टीका अयोग्य असल्याचे सांगताना रघुराम राजन हे अन्य कुणाहीपेक्षा कमी देशभक्त नाहीत असे स्पष्ट उद्गार नरेंद्र मोदींनी काढले आणि सुब्रमण्यम स्वामींना उल्लेख न करता योग्य तो धडा दिला. प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य करणं देशाच्या हिताचं नसल्याचं मोदी म्हणाले.
रघुराम राजन यांच्याबरोबर मला काम करायचा अनुभव आहे. ते अत्यंत निष्ठावान आहेत, आणि ते जिथं कुठं असतिल तिथून भारतासाठीच काम करतिल असे प्रशंसोद्गारही मोदींनी काढले. सप्टेंबर पर्यंत म्हणजे मुदत संपेपर्यंत राजन आरबीआयचे गव्हर्नर राहतिल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
पाकिस्तानच्या बाबतीत आपल्याला नेहमी काळजीपूर्वक रहावे लागेल असं मोदी म्हणाले. पाकिस्तानशी वागताना लक्ष्मणरेखा काय असेल असा सवाल विचारत मोदींनी पाकिस्तान सरकारमधले व सरकारच्या बाहेरचे असे अनेक गट दहशतवादी कारवायामध्ये गुंतलेले असतात याकडे लक्ष वेधले.
 
आणखी बातम्या :
(रघुराम राजन यांचा अखेर रामराम!) 
( रघुराम राजन यांच्या फेरनियुक्तीमध्ये माध्यमांनी जास्त रस घेऊ नये - पंतप्रधान मोदी)
(माझ्या मुदतवाढीसंदर्भातल्या बातम्या देऊन पत्रकारांनी आनंद लुटावा - रघुराम राजन)

राजन यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करणे गैर असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबईमध्ये होणारा सुब्रमण्यम स्वामी यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राजन यांच्या मुद्यावर मौन सोडत ' कुठल्याही राजकीय पक्षाकडून राजन यांच्यावर टीका करणे योग्य नाही' असे म्हटले असून सुब्रमण्यम स्वामी यांना अप्रत्यक्षरित्या इशारा दिला आहे.

विदेशामधल्या काळ्या पैशांसदर्भात आम्ही प्रचंड काम केलं असल्याचं मोदी म्हणाले. 2011 ते 2014 या तीन वर्षात सुप्रीम कोर्टाने सांगूनही आधीच्या सरकारनं SIT नेमली नाही, जे काम आम्ही सरकार स्थापन केल्यावर लगेच केलं असं त्यांनी सांगितलं. आम्ही जगातल्या अनेक देशांशी काळ्या पैशांसदर्भात करार केले आहेत आणि स्वित्झर्लंड सारखा देश स्वत:हून आता आपल्याशी चर्चा करत आहे, असं त्यांनी सांगितलं.

GST बिल संमत होणं ही गरीब राज्यांची गरज आहे. उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल, ओरीसा अशा सगळ्या गरीब राज्यांना GST चा फायदा होणार आहे. मात्र, एका पक्षाने हे विधेयक अडवून ठेवलं आहे. मी हे विधेयक संमत होण्यासाठी प्रयत्न करत राहणार. त्यासाठी गरज पडली तर कुणाच्या घरी चहा प्यायलाही मी जायला तयार आहे असं मोदी म्हणाले.

उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना मोदी म्हणाले की, विकास हाच आमचा मंत्र आहे. कुठलीही भडकाऊ भाषणं देणं योग्य नसल्याचं सांगतना मोदींनी अशा लोकांना हीरो करू नका असा सल्ला मोदींनी दिला.