शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

रघुराम राजन यांच्यावर टीका करणे योग्य नाही - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: June 27, 2016 19:01 IST

कोणत्याही राजकीय पक्षाने आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन यांच्यावर टीका करणे योग्य नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन यांच्यावर टीका करणे योग्य नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. ' टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर मत मांडले. 
भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना पदावरून तातडीने हटवावे अशी मागणी केली होती. दोन पानी पत्रात स्वामी यांनी रघुराम राजन यांच्यावर कठोर टीका करत राजन हे मनाने पूर्णपणे भारतीय नसल्याचा आरोप केला होता. त्यावरून मोठा वाद झाला होता. तर गेल्या आठवड्यात खुद्द रघुराम राजन यांनीच आरबीआय गव्हर्नर म्हणून आपण दुसरा कार्यकाळ भूषवणार नसल्याचे म्हटले होते. चार सप्टेंबरला कार्यकाळ संपल्यानंतर ते पुन्हा शैक्षणिक क्षेत्राकडे वळणार आहेत.
राजन यांच्यावर झालेली टीका अयोग्य असल्याचे सांगताना रघुराम राजन हे अन्य कुणाहीपेक्षा कमी देशभक्त नाहीत असे स्पष्ट उद्गार नरेंद्र मोदींनी काढले आणि सुब्रमण्यम स्वामींना उल्लेख न करता योग्य तो धडा दिला. प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य करणं देशाच्या हिताचं नसल्याचं मोदी म्हणाले.
रघुराम राजन यांच्याबरोबर मला काम करायचा अनुभव आहे. ते अत्यंत निष्ठावान आहेत, आणि ते जिथं कुठं असतिल तिथून भारतासाठीच काम करतिल असे प्रशंसोद्गारही मोदींनी काढले. सप्टेंबर पर्यंत म्हणजे मुदत संपेपर्यंत राजन आरबीआयचे गव्हर्नर राहतिल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
पाकिस्तानच्या बाबतीत आपल्याला नेहमी काळजीपूर्वक रहावे लागेल असं मोदी म्हणाले. पाकिस्तानशी वागताना लक्ष्मणरेखा काय असेल असा सवाल विचारत मोदींनी पाकिस्तान सरकारमधले व सरकारच्या बाहेरचे असे अनेक गट दहशतवादी कारवायामध्ये गुंतलेले असतात याकडे लक्ष वेधले.
 
आणखी बातम्या :
(रघुराम राजन यांचा अखेर रामराम!) 
( रघुराम राजन यांच्या फेरनियुक्तीमध्ये माध्यमांनी जास्त रस घेऊ नये - पंतप्रधान मोदी)
(माझ्या मुदतवाढीसंदर्भातल्या बातम्या देऊन पत्रकारांनी आनंद लुटावा - रघुराम राजन)

राजन यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करणे गैर असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबईमध्ये होणारा सुब्रमण्यम स्वामी यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राजन यांच्या मुद्यावर मौन सोडत ' कुठल्याही राजकीय पक्षाकडून राजन यांच्यावर टीका करणे योग्य नाही' असे म्हटले असून सुब्रमण्यम स्वामी यांना अप्रत्यक्षरित्या इशारा दिला आहे.

विदेशामधल्या काळ्या पैशांसदर्भात आम्ही प्रचंड काम केलं असल्याचं मोदी म्हणाले. 2011 ते 2014 या तीन वर्षात सुप्रीम कोर्टाने सांगूनही आधीच्या सरकारनं SIT नेमली नाही, जे काम आम्ही सरकार स्थापन केल्यावर लगेच केलं असं त्यांनी सांगितलं. आम्ही जगातल्या अनेक देशांशी काळ्या पैशांसदर्भात करार केले आहेत आणि स्वित्झर्लंड सारखा देश स्वत:हून आता आपल्याशी चर्चा करत आहे, असं त्यांनी सांगितलं.

GST बिल संमत होणं ही गरीब राज्यांची गरज आहे. उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल, ओरीसा अशा सगळ्या गरीब राज्यांना GST चा फायदा होणार आहे. मात्र, एका पक्षाने हे विधेयक अडवून ठेवलं आहे. मी हे विधेयक संमत होण्यासाठी प्रयत्न करत राहणार. त्यासाठी गरज पडली तर कुणाच्या घरी चहा प्यायलाही मी जायला तयार आहे असं मोदी म्हणाले.

उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना मोदी म्हणाले की, विकास हाच आमचा मंत्र आहे. कुठलीही भडकाऊ भाषणं देणं योग्य नसल्याचं सांगतना मोदींनी अशा लोकांना हीरो करू नका असा सल्ला मोदींनी दिला.