शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

‘पॅन’ला ‘आधार’ जोडणे आवश्यक

By admin | Updated: June 10, 2017 00:17 IST

पॅन कार्ड काढणे आणि आयकर विवरणपत्र दाखल करणे यासाठी आधार अनिवार्य करणाऱ्या प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीस

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पॅन कार्ड काढणे आणि आयकर विवरणपत्र दाखल करणे यासाठी आधार अनिवार्य करणाऱ्या प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीस सर्वोच्च न्यालयाने वैध ठरविले आहे. तथापि, आधारमुळे वैयक्तिक गोपनीयतेचा भंग होतो का, या मुद्द्याचा निर्णय घटनापीठाकडून येईपर्यंत त्याच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. न्या. ए. के. सिकरी आणि न्या. अशोक भूषण यांच्या न्यायपीठाने हा निर्णय दिला. आयकर कायद्यात कलम ‘१३९ अअ’ची तरतूद करण्याचा संसदेला हक्क असल्याचे मान्य करून ही तरतूद न्यायालयाने वैध ठरविली. त्याचबरोबर न्यायालयाने म्हटले की, आधार योजनेमुळे वैयक्तिक गोपनीयतेचा भंग होतो का, तसेच ही योजना मानवी सन्मानास हानी पोहोचवते का, या मुद्द्यांचा निर्णय घटनापीठ करील.आधार योजनेतील व्यक्तिगत माहिती फुटण्याच्या धोक्याबाबतही घटनापीठच निर्णय घेईल. आधारशी संबंधित लोकांची माहिती फुटू नये यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावीत, असे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.न्यायालयाने म्हटले की, वैयक्तिक गोपनीयतेच्या मुद्द्यावर घटनापीठाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत आधार क्रमांकाशिवाय दाखल करण्यात आलेली प्राप्तिकर विवरणपत्रे अवैध मानली जाणार नाहीत. नव्या कायद्याला आंशिक स्थगिती दिल्यामुळे आधीचे आर्थिक व्यवहारही अवैध ठरणार नाहीत. २0१७च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत करण्यात आलेल्या वित्त कायद्यान्वये प्राप्तिकर कायद्यात १३९ अअ या कलमाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार १ जुलैपासून प्राप्तिकर विवरणपत्र भरताना तसेच पॅन क्रमांक मिळविताना आधार क्रमांक जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. या तरतुदीला साम्यवादी नेते बिनय विश्वम यांच्यासह अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. २0१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय पीठाने आधार बंधनकारक नसून ऐच्छिक असल्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाचा सरकार अनादर करीत आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.स्टेट बँकेत नोकरीसाठी आधार बंधनकारक-स्टेट बँक आॅफ इंडियाने कर्मचारी भरतीच्या प्रक्रियेसाठी आधार कार्ड बंधनकारक करणार आहे. बँकेतील पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना आधार क्रमांक देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. बँकेने याची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, ती येत्या १ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेच्या एका परिपत्रकात याचा उल्लेख आहे. जम्मू-काश्मीर, मेघालय आणि आसाम या तीन राज्यांत मात्र याची अंमलबजावणी केली जाणार नाही. त्या राज्यांमधील उमेदवारांकडून अर्ज मागविताना बँकेतर्फे त्यांच्याकडून अन्य अटी घालण्यात येतील वा अन्य पुरावे मागण्यात येतील.भरती परीक्षेत हजारो उमेदवार बसतात. त्यांची ओळख पटवणे अवघड असते. अनेकदा अन्य पुरावे वा ओळखपत्रे बनावट असू शकतात. त्यामुळे अर्ज करताना त्यावर आधार कार्ड क्रमांक असणे आणि सोबत आधार कार्डाची छायाप्रत जोडणे सक्तीचे केले जाईल. स्टेट बँकेमध्ये प्रोबेशनरी आॅफिसर या पदासाठी सातत्याने भरती होत असते. मार्केटिंग व मॅनेजमेंट विभागात नियमितपणे भरती आणि त्यासाठी परीक्षा ही प्रक्रिया सुरू असते.