शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
2
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
3
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
4
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
5
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
6
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
7
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
8
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
9
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
10
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
11
बिहारमध्ये २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती; नितीश कुमार अन् भाजपाने पुन्हा केली जबरदस्त कमाल
12
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
13
टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
14
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
15
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! ५ विकेट्सचा डाव साधत सेट केले अनेक विक्रम
16
भरला संसार विस्कटून टाकला! आधी पत्नी अन् तीन मुलांना संपवलं; नंतर स्वतःचाही जीव घेतला
17
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
18
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
19
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
20
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना दोष देणे अयोग्य

By admin | Updated: May 14, 2014 03:57 IST

जर पक्षाला अपेक्षेहून कमी जागा मिळाल्या तरी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही असे कमलनाथ यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या निकालाला अद्याप २ दिवसांचा अवधी असला तरी ‘एक्झिट पोल’च्या अंदाजांमुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत राजकारण ढवळून निघाले आहे. केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी डॉ.मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारला निरनिराळ्या योजना व चांगले काम जनतेपर्यंत पोहोचवता आले नाही असे मत व्यक्त केले आहे. जर पक्षाला अपेक्षेहून कमी जागा मिळाल्या तरी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. ‘एक्झिट पोल’नुसार खरोखरच कॉंग्रेसची कामगिरी खालावली तरी त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करण्याचे काहीच कारण नाही. निवडणूकांचे निकाल हे जनतेच्या मनात सरकाच्या कार्यप्रणालीविषयीच्या भावनेचे प्रतिबिंब असते. चांगल्या कामाला जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक होते. राहुल गांधी हे कधीही सरकारचा भाग नव्हते असे कमलनाथ म्हणाले. निकालांच्या बाबतीत कॉंग्रेस फार आशावादी देखील नाही व निराशावादीदेखील नाही. आमचा वास्तविकतेवर जास्त भर आहे. ‘एक्झिट पोल’वर विश्वास ठेवण्यापेक्षा १६ मे रोजी काय होते याकडे आमचे लक्ष आहे असे त्यांनी सांगितले. ‘संजद’ने फेटाळले आकडे बहुतांश ‘एक्झिट पोल’नुसार बिहारमध्ये ‘संजद’ला (संयुक्त जनता दल) चांगलाच फटका बसण्याची चिन्हे आहेत. ‘संजद’तर्फे मात्र हे आकडे फेटाळण्यात आले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निकालाचीच प्रतिक्षा करण्याची भुमिका घेतली असून ‘एक्झिट पोल’चे आकडे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. यासंदर्भात नितीश कुमार यांना प्रश्न विचारले असता ‘हे तुम्हीच लोक बोलत आहात’ असे उत्तर त्यांनी दिले. सोबतच निकालाची प्रतिक्षा करा असे म्हणत त्यांनी ‘संजद’ला चांगल्या जागा मिळण्याचे संकेत दिले.