शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

कोहीनूर परत आणणे कठीण, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 14:33 IST

कोहिनूर हिरा हा भारताचीच संपत्ती आहे,मात्र इंग्लंडकडून परत मिळवणं कठीण आहे अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.21-  कोहिनूर हिरा हा भारताचीच संपत्ती आहे मात्र तो इंग्लंडकडून परत मिळवणं खडतर आहे अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली. मंगळवारी केंद्र सरकारने  याबाबतचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले. आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांमुळे कोहिनूर भारतात परत आणण्यासाठी अनेक अडचणी आहेत. त्यामुळे कोहिनूर परत आणण्यासाठी जास्त मार्ग उपलब्ध नाहीत असं सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं.  

कोहिनूर हि-यासोबत भारतीयांच्या भावना जोडल्या आहेत हे आम्ही जाणतो मात्र, इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीला कोहिनूर भेट देण्यात आला होता याचा कोणताच सबळ पुरावा आपल्याकडे नाही. त्यामुळे इंग्लंडसोबत सामोपचाराने यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. 1972 चा पुरातन आणि कलात्मक वस्तू कायदा लागू होण्यापूर्वीच कोहिनूर दुसऱ्या देशात गेला असल्याने या कायद्याच्या अटीही लागू करता येत नाहीत, अशी माहिती सरकारने दिली. युनेस्कोनेही याप्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.  
 
कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकार काही पावलं उचलत आहे की नाही याबाबत विचारणा करण्यासाठी  न्यायमुर्ती टी एस ठाकूर यांच्या खंडपिठाने सरकारला नोटीस पाठवली होती, या नोटीसला केंद्र सरकारने उत्तर दिलं. कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासाठी जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.