शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

न्यायाधीशांच्या आत्मसंयमामुळेच ते टीकेचे लक्ष्य - एन.व्ही. रामणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 01:48 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती आर. भानुमती यांनी लिहिलेल्या ‘ज्युडिशियरी, जजेस अँड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आॅफ जस्टीस’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात एन.व्ही. रामणा बोलत होते.

नवी दिल्ली : न्यायाधीश आत्मसंयम राखत असल्यामुळे ते टीकेचे लक्ष्य सहजपणे ठरतात आणि मसालेदार गप्पा व चर्चेचा ते बळी ठरत आहेत, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती एन.व्ही. रामणा यांनी व्यक्त केले. ते शनिवारी येथे सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती आर. भानुमती यांनी लिहिलेल्या ‘ज्युडिशियरी, जजेस अँड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आॅफ जस्टीस’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.न्या. रामणा म्हणाले, सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनीसुद्धा सावधगिरीचा इशारा दिला. बोबडे म्हणाले होते की, ‘न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य हे अंमलबजावणीच्या स्वांतत्र्यापुरते मर्यादित नाही; परंतु इतर अनेक दबाब आणि कलुषित मते असतानाही न्यायव्यवस्था स्वातंत्र्य घेते.’स्वातंत्र्य टिकून राहण्यासाठी न्यायाधीशांना त्यांच्या सामाजिक आयुष्यात तोल सांभाळावा लागतो. ही पूर्ण जबाबदारी न्यायाधीशाने स्वत:वर लादून घेतलेल्या निर्बंधांतून पार पाडायची असते.न्यायाधीशांना त्यांच्या स्वत:च्या समर्थनासाठी बोलतानाही आत्मसंयम पाळावा लागतो; पण आता त्यांनाच टीका करण्यासाठीचे सहजसाध्य लक्ष्य समजले गेले आहे व हा विषय समाजमाध्यमांचा व तंत्रज्ञानाचा फारच विस्तार झाल्यामुळे आणखी गुंतागुंतीचा बनला आहे, असे रामणा म्हणाले.रामणा म्हणाले, ‘समाजमाध्यमांतून चालणाऱ्या मसालेदार गप्पा व बदनामीकारक सोशल मीडिया पोस्टस्चे न्यायाधीश हे त्यामुळेच बळी ठरत आहेत. माझा स्वत:चा अनुभव असा आहे की, न्यायाधीशाचे आयुष्य हे गुलाबफुलाच्या पाकळ्यांचा पलंग नाही. आजच्या काळातील न्यायाधीशाला इतर कोणत्याही व्यवसायात ज्याची बरोबरी होऊ शकणार नाही, अशा त्यागांची गरज आहे व हेच देशाचे भवितव्य कणखर व स्वतंत्र न्यायाधीशांवर उभे राहण्यासाठी आवश्यक आहे.’