शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

महाभियोगाचा वाद आणखी चिघळणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 05:37 IST

हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यास सरन्यायाधीशांची मोठी पंचाईत होईल व न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये असलेली दुफळी अधिक तीव्र होण्यास त्याने वाव मिळेल, असे जाणकारांना वाटते.

नवी दिल्ली : सरन्यायाधीश न्या. दिपक मिस्रा यांच्याविरुद्ध महाभियोगाची कारवाई सुरू करण्यास राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी नकार दिल्याने हा वाद मिटण्याऐवजी अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत. नायडू यांचा निर्णय जाहीर होताच महाभियोगासाठी पुढाकार घेणाऱ्या काँग्रेसने त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची घोषणा केली. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यास सरन्यायाधीशांची मोठी पंचाईत होईल व न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये असलेली दुफळी अधिक तीव्र होण्यास त्याने वाव मिळेल, असे जाणकारांना वाटते.शुक्रवारी काँग्रेससह सात विरोधी पक्षांच्या ६२ राज्यसभा सदस्यांनी महाभियोगाची नोटीस देताच त्यावरून आरोप-प्रत्यारोपांचे द्वंद्व सुरु झाले होते. नायडू यांच्या निकालानंतर दुसरा अध्याय सुरु झाला. जाहीर वादाने होणारी सरन्यायाधीशपदाची अप्रतिष्ठा थांबावी यासाठी नायडू यांनी हा (पान ९ वर)न्यायालयात नवा पेचसभापती नायडू यांनी चौकशी समिती नेमल्यास नैतिकतेची चाड ठेवून न्या. मिस्रा यांना पदावर राहूनही न्यायालयीन व प्रशासकीय कामापासून दूर राहावे लागेल, अशी नोटिस देणाºयांची व्यूहरचना होती. आता नायडू यांनी नोटिस फेटाळल्यावर त्याविरोधातील याचिकेच्या सुनावणीसाठी खंडपीठ ठरविण्यापासून ते सरन्यायाधीशांच्या बाजूने वा विरोधात निकाल देईपर्यंतच्या सर्वच बाबी सर्वोच्च न्यायालयात नवा पेच निर्माण करू शकतील.

 

चुकीचा निर्णयसभापतींचा निर्णय चुकीचा आहे. त्यांनी अधिकार नसूनही आरोपांच्या खरेपणाची तपासणी केली. सूडाने नोटिस दिल्याचे ते म्हणाले. सभापतींचा निर्णयही सूडाचा म्हणावा का?- रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते, काँग्रेस

घराण्याची भलामणकेवळ एका घराण्याची भलामण करण्यासाठी लोकशाही संस्था पायदळी तुडविण्याची काँग्रेसला सवयच आहे. आताचा महाभियोग हाही त्याचाच भाग आहे.-मीनाक्षी लेखी, प्रवक्त्या, भाजपा

घाईघाईने निर्णय सभापती नायडू यांनी प्रस्थापित प्रक्रियांचे नीट पालन न करता घाईने निर्णय देऊन चूक केली.-सोमनाथ चटर्जी,माजी अध्यक्ष, लोकसभा

 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू