शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

महाभियोगाचा वाद आणखी चिघळणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 05:37 IST

हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यास सरन्यायाधीशांची मोठी पंचाईत होईल व न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये असलेली दुफळी अधिक तीव्र होण्यास त्याने वाव मिळेल, असे जाणकारांना वाटते.

नवी दिल्ली : सरन्यायाधीश न्या. दिपक मिस्रा यांच्याविरुद्ध महाभियोगाची कारवाई सुरू करण्यास राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी नकार दिल्याने हा वाद मिटण्याऐवजी अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत. नायडू यांचा निर्णय जाहीर होताच महाभियोगासाठी पुढाकार घेणाऱ्या काँग्रेसने त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची घोषणा केली. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यास सरन्यायाधीशांची मोठी पंचाईत होईल व न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये असलेली दुफळी अधिक तीव्र होण्यास त्याने वाव मिळेल, असे जाणकारांना वाटते.शुक्रवारी काँग्रेससह सात विरोधी पक्षांच्या ६२ राज्यसभा सदस्यांनी महाभियोगाची नोटीस देताच त्यावरून आरोप-प्रत्यारोपांचे द्वंद्व सुरु झाले होते. नायडू यांच्या निकालानंतर दुसरा अध्याय सुरु झाला. जाहीर वादाने होणारी सरन्यायाधीशपदाची अप्रतिष्ठा थांबावी यासाठी नायडू यांनी हा (पान ९ वर)न्यायालयात नवा पेचसभापती नायडू यांनी चौकशी समिती नेमल्यास नैतिकतेची चाड ठेवून न्या. मिस्रा यांना पदावर राहूनही न्यायालयीन व प्रशासकीय कामापासून दूर राहावे लागेल, अशी नोटिस देणाºयांची व्यूहरचना होती. आता नायडू यांनी नोटिस फेटाळल्यावर त्याविरोधातील याचिकेच्या सुनावणीसाठी खंडपीठ ठरविण्यापासून ते सरन्यायाधीशांच्या बाजूने वा विरोधात निकाल देईपर्यंतच्या सर्वच बाबी सर्वोच्च न्यायालयात नवा पेच निर्माण करू शकतील.

 

चुकीचा निर्णयसभापतींचा निर्णय चुकीचा आहे. त्यांनी अधिकार नसूनही आरोपांच्या खरेपणाची तपासणी केली. सूडाने नोटिस दिल्याचे ते म्हणाले. सभापतींचा निर्णयही सूडाचा म्हणावा का?- रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते, काँग्रेस

घराण्याची भलामणकेवळ एका घराण्याची भलामण करण्यासाठी लोकशाही संस्था पायदळी तुडविण्याची काँग्रेसला सवयच आहे. आताचा महाभियोग हाही त्याचाच भाग आहे.-मीनाक्षी लेखी, प्रवक्त्या, भाजपा

घाईघाईने निर्णय सभापती नायडू यांनी प्रस्थापित प्रक्रियांचे नीट पालन न करता घाईने निर्णय देऊन चूक केली.-सोमनाथ चटर्जी,माजी अध्यक्ष, लोकसभा

 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू