शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

इस्रोमुळे मिळणार भारतातील इंटरनेटला गती

By admin | Updated: May 21, 2017 17:46 IST

गेल्या काही वर्षात भारतातील इंटरनेटच्या वापरामध्ये लक्षणीय अशी वाढ झाली आहे. मात्र इंटरनेटचा स्पीड ही भारतातील मोठी समस्या आहे. मात्र आता ही परिस्थिती बदलण्यासाठी इस्रोने कंबर कसली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 -  गेल्या काही वर्षात भारतातील  इंटरनेटच्या वापरामध्ये लक्षणीय अशी वाढ झाली आहे. मात्र इंटरनेटचा स्पीड ही भारतातील मोठी समस्या आहे. मात्र आता ही परिस्थिती बदलण्यासाठी इस्रोने कंबर कसली आहे. देशातील इंटरनेटची गती वाढवण्यासाठी इस्त्रो तीन उपग्रह सोडणार आहे. हे उपग्रह कार्यान्वीत झाल्यावर भारतातही हायस्पीड इंटरनेट सेवा देणे शक्य होणार आहे. 
 
यासंदर्भात माहिती देताना इस्रोचे प्रमुख किरण कुमार म्हणाले, "आम्ही तीन दूरसंचार सॅटेलाइट्स प्रक्षेपित करणात आहोत. येत्या जून महिन्यात जीएसएटी - 19 चे प्रक्षेपण होईल. त्यानंतर जीएसएटी - 11 आणि जीएसएटी -20 यांचे प्रक्षेपण होईल. त्यापेकी जीएसएटी - 19 चे प्रक्षेपण इस्रोचा पुढील पिढीतील प्रक्षेपक जीएसएलव्ही एमके III याद्वारे केले जाईल. या उपग्रहांमध्ये मल्टिपल स्पॉट बीमचा वापर करण्यात येईल. ज्यामुळे इंटरनेट स्पीड आणि कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होईल. ही मल्टिपल स्पॉट बीम संपूर्ण देशाला आपल्या कक्षेत घेईल." 
हे उपग्रह कार्यान्वित झाल्याबरोबर उच्च दर्जाची इंटरनेट सेवा, फोन आणि व्हिडिओ सर्व्हिस देण्यास सुरुवात करतील. अशी माहिती अहमदाबाद स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे तपन मिश्रा यांनी सांगितले. 
 
सध्या  भारत हायस्पीड इंटरनेट सेवेच्या क्रमवारीत खूप पिछाडीवर आहे. वेगवान इंटरनेट सेवेच्या क्रमवारीत भारताला सध्या 105 वे स्थान प्राप्त झाले आहे. तर या क्रमवारीत दक्षिण कोरिया 26 एमबीपीएस वेगासह अव्वलस्तानी आहे. या क्रमवारीत श्रीलंका, व्हिएटनामसारखे देशही भारताच्या पुढे आहेत.