शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

अमरनाथ हल्ल्याचा मुख्य सूत्रधार इस्माईलचं दोन वर्षांपासून भारतात वास्तव्य

By admin | Updated: July 12, 2017 11:43 IST

पाकिस्तानी नागरिक असणा-या अबू इस्माईलने दोन वर्षांपुर्वी सीमा ओलांडून भारतात घुसखोरी केली होती

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 12 - अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करुन सात जणांचा मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद अबू इस्माईलसाठी शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. लष्कर-ए-तोयबाने हा भीषण दहशतवादी हल्ला केला असून, अबू इस्माईल या हल्ल्याचा मास्टमाईंड असल्याचा संशय आहे. गेल्या 26 वर्षातील आतापर्यंतचा हा सर्वात भीषण हल्ला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी नागरिक असणा-या अबू इस्माईलने दोन वर्षांपुर्वी सीमा ओलांडून भारतात घुसखोरी केली होती. त्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये लष्कराचा स्थानिक कमांडर म्हणून काम करत होता. 
 
संबंधित बातम्या
दहशतवादी संदीपचा भाऊ म्हणतो "त्याला गोळ्या घाला"
अमरनाथ यात्रा हल्ला; बस चालक सलीमच्या प्रसंगावधानामुळे वाचले अनेकांचे प्राण
अबू इस्माईलच हल्ल्याचा सूत्रधार
 
अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याचा तपास सुरु करण्यात आला आहे. नुकतीच तपासाला सुरुवात केली गेली असल्याने ठोस असे काही पुरावे हाती आलेले नाहीत. मात्र सुरक्षा यंत्रणांनी जी माहिती गोळा केली आहे, त्यानुसार अबू इस्माईलने तीन ते पाच दहशतवाद्यांसोबत हा हल्ला केल्याचं सिद्ध होत आहे. 
 
दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली असतानाही बसला सेक्युरिटी चेक पोस्टवरुन जाण्याची परवानगी कशी काय देण्यात आली याबाबत अद्याप स्पष्टता नाही. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी सांगितलं आहे की, "खूप मोठी त्रुटी आहे. सुर्यास्तानंतर बसला परवानगी देण्यात आली...असं का करण्यात आलं याचा तपास केला जाईल". घटनास्थळी 100 हून जास्त मोकळी काडतूसं सापडली आहे. यावरुन दहशतवाद्यांनी हल्ल्याचा कट आधीच रचल्याचं सिद्ध होत आहे. 
 
मुख्य हल्लेखोर इस्माईल पाकिस्तानी नागरिक असून, तो व पाकिस्तानीच असलेला अबू दुजाना याआधीही काश्मीरमधील अनेक अतिरेकी हल्ल्यांमध्ये सहभागी झाले आहेत. अबू इस्माईलसोबत जे दोघे होते, त्यांची ओळख पटली असून, जे त्यांना हल्ल्याच्या ठिकाणी घेऊ न आले आणि ज्यांनी शस्त्रे आणून दिली, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. हल्ल्यानंतर दहशतवादी कोणत्या दिशेने गेले, हे समजले असून, त्यांना लवकरच अटक होईल, असे जम्मू-काश्मीरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
 
हल्ला करणाऱ्यांमध्ये अबू इस्माईल सहभागी होता, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी सांगितले. ते म्हणाले की, हा हल्ला तैयबानेच केला. त्याची जबाबदारी अबू इस्माईलवर होती. त्याला स्थानिक दहशतवाद्यांनीही मदत केली, असेही मुनीर खान यांनी स्पष्ट केले. तैयबाने मात्र हल्ल्याचा निषेध केला. हा हल्ला इस्लामविरोधी आहे, अन्य धर्मीयांवर हल्ला वा हिंसाचार हे इस्लामला मान्य नाही, असे तैयबाचा प्रवक्ता अब्दुल्ला गझनवीने म्हटले आहे. मात्र याआधी अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या पाच हल्ल्यांमध्ये तयबाचाच हात होता.
 
सध्या थंड पडलेल्या जैश-ए-महमद या संघटनेला सक्रिय करण्यासाठीही तयबा प्रयत्नशील आहे. तयबाने स्थानिकांना जाळ्यात खेचण्याचे प्रयत्न चालविले आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये ३0 स्थानिक जण तैयबामध्ये सहभागी झाले असून, उत्तर काश्मीरमध्ये ८0 पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय आहेत.