शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

कंदाहार विमान अपहरणात ISI चा हात, डोवाल यांचा खुलासा

By admin | Updated: January 15, 2017 16:46 IST

"आम्ही जेव्हा विमानाजवळ पोहोचलो त्यावेळी विमानाच्या आजू-बाजूला खूप तालिबानी दहशतवादी होते आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्रं होती"

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - 24 डिसेंबर 1999 रोजी पाच शस्त्रधारी दहशतवाद्यांनी 178 प्रवाशांसह इंडियन एअरलाइन्सचे आयसी-814 विमानाचे अपहरण केले होते. याप्रकरणी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा कंदाहार विमान अपहरणामध्ये सहभाग होता असा खुलासा त्यांनी केला आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सचे भारतातील माजी ब्‍यूरो चीफ मायरा मॅकडॉनल्‍ड यांनी कंदाहार प्रकरणावर 'डिफीट इज अ‍ॅन ऑर्फन: हाऊ पाकिस्‍तान लॉस्‍ट द ग्रेट साउथ एशियन वॉर' हे पुस्तक लिहिलं आहे. यामध्येच डोवाल यांनी आयएसआयच्या सहभागाबाबत माहिती दिली आहे. या अपहरणामध्ये ओलीस ठेवलेल्यांना सोडवण्यासाठी चर्चा करणा-यांमध्ये डोवाल यांचा समावेश होता. या पुस्तकात डोवाल यांचा एक इंटरव्यू छापण्यात आला आहे. 

या इंटरव्यूमध्ये डोवाल म्हणतात, ''अपहरणकर्त्यांना जर आयएसआयचं समर्थन नसतं तर हे संकट लवकर संपलं असतं . आम्ही जेव्हा विमानाजवळ पोहोचलो त्यावेळी विमानाच्या आजु-बाजूला खूप तालिबानी दहशतवादी होते आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्रं होती. दहशतवादयांशी चर्चा करण्यास टीम पोहोचली त्यावेळी या प्रकरणात आयएसआयचा सहभाग असल्याचं आमच्या लक्ष्यात आलं. विमानाजवळ आयएसआयचे दोन जणं उभे होते. त्यापैकी एक लेफ्टिनेंट कर्नल तर दूसरा मेजर होता. अपहरणकर्ते थेट आयएसआयच्या अधिका-यांशी चर्चा करत असल्याचं कळल्यावर परिस्थिती आणखी बिघडली. तेथे जे काही घडत होतं त्याची माहिती आयएसआयला मिळत होती. जर अपहरणकर्त्यांना आयएसआयने पाठिंबा दिला नसता तर ते संकट आम्ही लवकर संपवलं असतं. अपहरणकर्त्यांवर आम्ही जो काही दबाव निर्माण केला होता आयएसआयने तो दबाव संपवला''.

त्यावेळी 178 प्रवाशांच्या सुरक्षित सुटकेच्या बदल्यात दहशतवाद्यांनी मौलाना मसूद अझहरसह, अहमद उमर सईद शेख आणि मुस्‍ताक जरगार या 3 दहशतवाद्यांच्या सुटकेची अटक घातली होती. या दहशतवाद्यांना सोडवण्‍यासाठी भारतातून विशेष विमान पाठवले गेले होते.