शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

दहा राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण

By admin | Updated: July 9, 2017 00:28 IST

प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी आसिआन संघटनेच्या १0 सदस्य देशांच्या प्रमुखांना आमंत्रण देण्याचे भारताने ठरविले आहे. अ‍ॅक्ट ईस्ट धोरणानुसार

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी आसिआन संघटनेच्या १0 सदस्य देशांच्या प्रमुखांना आमंत्रण देण्याचे भारताने ठरविले आहे. अ‍ॅक्ट ईस्ट धोरणानुसार भारताने पूर्व आशियातील देशांशी दोस्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. प्रजासत्ताक दिनासाठी इतक्या मोठ्या संख्येने पाहुणे बोलावण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत प्रजासत्ताक दिनासाठी एका राष्ट्राच्या प्रमुखाला आमंत्रण दिले जाते. आसिआनमध्ये ब्रुनेई, काम्पुचिया (कंबोडिया), मलेशिया, इंडोनेशिया, लाओस, म्यानामार, फिलिपाइन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम हे देश सदस्य आहेत. चीन करत असलेल्या घुसखोरीमुळे वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने या दहा राष्ट्रांच्या प्रमुखांना एकाच वेळी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देणे महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदी सरकारने केवळ लूक ईस्ट नव्हे, तर अ‍ॅक्ट ईस्ट धोरण जाहीर केले होते. पूर्व आणि आग्नेय आशियातील देशांशी असलेले संबंध वृद्धिंगत करणे हा त्याचा उद्देश आहे. भारत आणि आसिआन यांच्यातील संबंधांना यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भारतात विविध परिषदा आणि कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येत आहे. भारत व आसिआन यांच्यात १९९२ साली संबंध प्रस्थापित झाले आणि १९९६ साली भारताला फुल डायलॉग पार्टनर असा दर्जा देण्यात आला. त्यानंतर भारत आसिआनच्या देशांशी आसिआन रिजनल फोरम, ईस्ट एशिया समिट, आसिआन डिफेन्स मिनिस्टर मीटिंग प्लस, एक्सपांडेड आसिआन मेरिटाइम फोरम अशा विविध समित्या, परिषदांमध्ये सहभागी होत आला आहे. एक तृतीयांश लोकसंख्यालोकसंख्येचा विचार करता, भारत आणि आसिआन यांची एकत्रित लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश आहे. भारत आणि आसिआन देशांमधील रिजनल कॉम्प्रहेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप अ‍ॅग्रिमेंट हा करार या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. आरसीईपी हा मुक्त व्यापाराचा करार आहे. भारत-म्यानमार-थायलंड असा तीन देशांमधून तयार होणारा महामार्ग कंबोडियापर्यंत वाढवण्याचाही विचार सुरू आहे.