शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

उधमपूर हल्ल्याचा तपास एनआयएकडे

By admin | Updated: August 6, 2015 22:44 IST

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात बुधवारी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत गोपनीय सूचना मिळाली नव्हती

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात बुधवारी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत गोपनीय सूचना मिळाली नव्हती, अशी माहिती दलातर्फे गुरुवारी देण्यात आली. दरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या हल्ल्याच्या तपासाची सूत्रे स्वीकारली आहेत. या हल्ल्यात जिवंत हाती लागलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याने आपण लष्कर-ए-तोयबाकडे दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले असल्याचा दावा केला आहे.हल्ल्यानंतर घटनास्थळाचा दौरा करणारे बीएसएफ प्रमुख देवेंद्र के. पाठक यांनी सांगितले की, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाचा परिसर तुलनात्मकदृष्ट््या सुरक्षित असून या क्षेत्रात मागील दोन दशकात अशा प्रकारचा हल्ला झालेला नाही.जवानांना घेऊन जाणाऱ्या बसमधील एकमेव सशस्त्र जवान २५ वर्षीय रॉकी याने दाखविलेल्या धाडसाचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. दहशतवाद्यांचा मुकाबला करताना जीवाचे बलिदान देणाऱ्या रॉकीने प्रत्युत्तरात गोळीबार करून दहशतवाद्यांना बसमध्ये शिरण्यापासून रोखले. त्याने दुर्दम्य साहसाचा परिचय देत आपल्या ४४ नि:शस्त्र सहकारी जवानांचे प्राण वाचविले. कारण हल्ला झाला त्यावेळी बसमधून प्रवास करणारा इतर कुठलाही जवान शस्त्रसज्ज नव्हता,असे पाठक म्हणाले. एनआयएचे पथक जम्मूतएनआयएचे महानिरीक्षक संजीवकुमार सिंग यांच्या नेतृत्वात केंद्रीय तपास संस्थेचे पथक बुधवारीच जम्मूत डेरेदाखल झाले असून त्याने चकमक स्थळाचा दौराही केला. लष्करकडून घेतले प्रशिक्षणएनआयएच्या पथकाने रात्रभर नावेदची चौकशी केली. आपण लष्कर-ए-तोयबाच्या ‘दौर-ए-आम’ आणि ‘दौर-ए-खास’ या दोन प्रशिक्षण सत्रांमध्ये प्रशिक्षण घेतले असल्याचे त्याने सांगितले. पहिल्या सत्रात शारीरिक व्यायाम, उंच पहाडांवर चढण्याचे कौशल्य आणि छोटी शस्त्रे वापरण्याच्या पद्धती शिकविल्या जाते तर दुसऱ्या सत्रात रायफल चालविणे आणि लहान स्फोटके तयार करण्याचे तंत्र सांगितले जाते.नावेदच्या सांगण्यानुसार तो कुंपण कापून उत्तर काश्मीरच्या बारामुल्लामार्गे भारतात शिरला. सुरुवातीला तो तंगमार्ग आणि बाबा रेशीत थांबला. त्यानंतर त्याने अवंतीपुरा-पुलवामा क्षेत्रात मुक्काम केला. येथे तो पहाडांमधील गुफेत दडून बसला होता. या ठिकाणी दहशतवादी दोन गटात विभाजित झाले. नावेद आणि नोमान दक्षिण काश्मीरच्या कुलवामला गेले. तेथून ते जम्मूला जाणाऱ्या एका ट्रकमध्ये बसले. रात्री पाटनीटॉपला राहिल्यानंतर उधमपूरला उतरले. शहानिशा करण्याकरिता नावेदने सांगितलेल्या सर्व ठिकाणांवर त्याला नेण्यात येईल.(लोकमत न्यूज नेटवर्क)