शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उधमपूर हल्ल्याचा तपास एनआयएकडे

By admin | Updated: August 6, 2015 22:44 IST

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात बुधवारी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत गोपनीय सूचना मिळाली नव्हती

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात बुधवारी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत गोपनीय सूचना मिळाली नव्हती, अशी माहिती दलातर्फे गुरुवारी देण्यात आली. दरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या हल्ल्याच्या तपासाची सूत्रे स्वीकारली आहेत. या हल्ल्यात जिवंत हाती लागलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याने आपण लष्कर-ए-तोयबाकडे दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले असल्याचा दावा केला आहे.हल्ल्यानंतर घटनास्थळाचा दौरा करणारे बीएसएफ प्रमुख देवेंद्र के. पाठक यांनी सांगितले की, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाचा परिसर तुलनात्मकदृष्ट््या सुरक्षित असून या क्षेत्रात मागील दोन दशकात अशा प्रकारचा हल्ला झालेला नाही.जवानांना घेऊन जाणाऱ्या बसमधील एकमेव सशस्त्र जवान २५ वर्षीय रॉकी याने दाखविलेल्या धाडसाचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. दहशतवाद्यांचा मुकाबला करताना जीवाचे बलिदान देणाऱ्या रॉकीने प्रत्युत्तरात गोळीबार करून दहशतवाद्यांना बसमध्ये शिरण्यापासून रोखले. त्याने दुर्दम्य साहसाचा परिचय देत आपल्या ४४ नि:शस्त्र सहकारी जवानांचे प्राण वाचविले. कारण हल्ला झाला त्यावेळी बसमधून प्रवास करणारा इतर कुठलाही जवान शस्त्रसज्ज नव्हता,असे पाठक म्हणाले. एनआयएचे पथक जम्मूतएनआयएचे महानिरीक्षक संजीवकुमार सिंग यांच्या नेतृत्वात केंद्रीय तपास संस्थेचे पथक बुधवारीच जम्मूत डेरेदाखल झाले असून त्याने चकमक स्थळाचा दौराही केला. लष्करकडून घेतले प्रशिक्षणएनआयएच्या पथकाने रात्रभर नावेदची चौकशी केली. आपण लष्कर-ए-तोयबाच्या ‘दौर-ए-आम’ आणि ‘दौर-ए-खास’ या दोन प्रशिक्षण सत्रांमध्ये प्रशिक्षण घेतले असल्याचे त्याने सांगितले. पहिल्या सत्रात शारीरिक व्यायाम, उंच पहाडांवर चढण्याचे कौशल्य आणि छोटी शस्त्रे वापरण्याच्या पद्धती शिकविल्या जाते तर दुसऱ्या सत्रात रायफल चालविणे आणि लहान स्फोटके तयार करण्याचे तंत्र सांगितले जाते.नावेदच्या सांगण्यानुसार तो कुंपण कापून उत्तर काश्मीरच्या बारामुल्लामार्गे भारतात शिरला. सुरुवातीला तो तंगमार्ग आणि बाबा रेशीत थांबला. त्यानंतर त्याने अवंतीपुरा-पुलवामा क्षेत्रात मुक्काम केला. येथे तो पहाडांमधील गुफेत दडून बसला होता. या ठिकाणी दहशतवादी दोन गटात विभाजित झाले. नावेद आणि नोमान दक्षिण काश्मीरच्या कुलवामला गेले. तेथून ते जम्मूला जाणाऱ्या एका ट्रकमध्ये बसले. रात्री पाटनीटॉपला राहिल्यानंतर उधमपूरला उतरले. शहानिशा करण्याकरिता नावेदने सांगितलेल्या सर्व ठिकाणांवर त्याला नेण्यात येईल.(लोकमत न्यूज नेटवर्क)