शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

सैैनिकांवर येणार स्वखर्चाने गणवेश खरेदी करण्याची पाळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:22 IST

दारूगोळा व इतर आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी केंद्राने अतिरिक्त निधी न दिल्याने लष्कराने दारूगोळा कारखान्यांमधून होणाऱ्या खरेदीला मोठी कात्री लावली आहे. त्याचा फटका सैैनिकांना देण्यात येणारे गणवेश, बुटांचे जोड, टोपी, कमरपट्टा आदी गोष्टींच्या पुरवठ्यावरही होणार आहे.

नवी दिल्ली : दारूगोळा व इतर आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी केंद्राने अतिरिक्त निधी न दिल्याने लष्कराने दारूगोळा कारखान्यांमधून होणाऱ्या खरेदीला मोठी कात्री लावली आहे. त्याचा फटका सैैनिकांना देण्यात येणारे गणवेश, बुटांचे जोड, टोपी, कमरपट्टा आदी गोष्टींच्या पुरवठ्यावरही होणार आहे. त्यामुळे सैैनिकांवर पुढील काळात कदाचित स्वत:च्या पैैशाने गणवेश खरेदी करायचीही पाळी येऊ शकेल.दहा दिवस चालणाºया अल्पमुदतीच्या युद्धासाठी आवश्यक असलेला दारूगोळा व संरक्षणविषयक अन्य सामुग्री यांचा पुरेसा साठा करण्यासाठी लष्कराने तीन योजना आखल्या आहेत. त्याकरिता हजारो कोटी रुपयांची गरज आहे. मात्र या योजनांसाठी केंद्र सरकार अतिरिक्त निधी द्यायला तयार नसल्याने लष्कराला आता विविध गोष्टींना कात्री लावून हे पैैसे उभारावे लागत आहेत. केंद्र सरकारने २०१८-१९च्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण खर्चासाठी केलेली तरतूदही पुरेशी नाही.लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, आपत्कालीन परिस्थितीची गरज लक्षात घेऊन दारूगोळा व संरक्षणविषयक सामग्रीचा साठा करण्यावर लष्कराने याआधीच ५ हजार कोटी रुपये खर्च केले असून, यंदा आणखी ६७३९.८३ कोटी रुपयांची गरज आहे. या योजनांसाठी २१,७३९.८३ कोटी रुपये इतका एकूण खर्च येणार असून, केंद्राकडून त्यासाठी काहीही मदत मिळणार नाही. त्यामुळे दारूगोळा कारखान्यांकडून करण्यात येणाºया खरेदीत मार्चपासून ५० टक्के कपात करण्यात आली. त्याद्वारे दरवर्षी ३ हजार ५०० कोटी रुपये वाचविण्यात येतील व त्यामध्ये लष्कर स्वत:च्या पदरच्या चार हजार कोटी रुपयांची भर घालेल. अशा प्रकारे तीन वर्षात २४ हजार कोटी रुपयांची रक्कम या योजनांसाठी उभी केली जाईल.दारूगोळा बनविणार भारतीय कंपन्याउरी येथे २०१६ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने आपल्याकडील दारुगोळा व शस्त्रसामुग्रीचा आढावा घेतला. दहा दिवसांच्या अल्पमुदतीच्या युद्धासाठी ४६ प्रकारचा दारूगोळा, रणगाडे, लष्करी वाहनांचे सुटे भाग यांचा पुरेसा साठा करणे आवश्यक असल्याचे या आढाव्यातून दिसून आले. आता आठ प्रकारचा दारूगोळा भारतीय कंपन्यांकडूनच बनवून घेण्याची दहा वर्षे मुदतीची योजना केंद्राने आखली असून त्यावर दरवर्षी १७०० कोटी रुपये खर्च केले जातील.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान