शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

सैैनिकांवर येणार स्वखर्चाने गणवेश खरेदी करण्याची पाळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:22 IST

दारूगोळा व इतर आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी केंद्राने अतिरिक्त निधी न दिल्याने लष्कराने दारूगोळा कारखान्यांमधून होणाऱ्या खरेदीला मोठी कात्री लावली आहे. त्याचा फटका सैैनिकांना देण्यात येणारे गणवेश, बुटांचे जोड, टोपी, कमरपट्टा आदी गोष्टींच्या पुरवठ्यावरही होणार आहे.

नवी दिल्ली : दारूगोळा व इतर आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी केंद्राने अतिरिक्त निधी न दिल्याने लष्कराने दारूगोळा कारखान्यांमधून होणाऱ्या खरेदीला मोठी कात्री लावली आहे. त्याचा फटका सैैनिकांना देण्यात येणारे गणवेश, बुटांचे जोड, टोपी, कमरपट्टा आदी गोष्टींच्या पुरवठ्यावरही होणार आहे. त्यामुळे सैैनिकांवर पुढील काळात कदाचित स्वत:च्या पैैशाने गणवेश खरेदी करायचीही पाळी येऊ शकेल.दहा दिवस चालणाºया अल्पमुदतीच्या युद्धासाठी आवश्यक असलेला दारूगोळा व संरक्षणविषयक अन्य सामुग्री यांचा पुरेसा साठा करण्यासाठी लष्कराने तीन योजना आखल्या आहेत. त्याकरिता हजारो कोटी रुपयांची गरज आहे. मात्र या योजनांसाठी केंद्र सरकार अतिरिक्त निधी द्यायला तयार नसल्याने लष्कराला आता विविध गोष्टींना कात्री लावून हे पैैसे उभारावे लागत आहेत. केंद्र सरकारने २०१८-१९च्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण खर्चासाठी केलेली तरतूदही पुरेशी नाही.लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, आपत्कालीन परिस्थितीची गरज लक्षात घेऊन दारूगोळा व संरक्षणविषयक सामग्रीचा साठा करण्यावर लष्कराने याआधीच ५ हजार कोटी रुपये खर्च केले असून, यंदा आणखी ६७३९.८३ कोटी रुपयांची गरज आहे. या योजनांसाठी २१,७३९.८३ कोटी रुपये इतका एकूण खर्च येणार असून, केंद्राकडून त्यासाठी काहीही मदत मिळणार नाही. त्यामुळे दारूगोळा कारखान्यांकडून करण्यात येणाºया खरेदीत मार्चपासून ५० टक्के कपात करण्यात आली. त्याद्वारे दरवर्षी ३ हजार ५०० कोटी रुपये वाचविण्यात येतील व त्यामध्ये लष्कर स्वत:च्या पदरच्या चार हजार कोटी रुपयांची भर घालेल. अशा प्रकारे तीन वर्षात २४ हजार कोटी रुपयांची रक्कम या योजनांसाठी उभी केली जाईल.दारूगोळा बनविणार भारतीय कंपन्याउरी येथे २०१६ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने आपल्याकडील दारुगोळा व शस्त्रसामुग्रीचा आढावा घेतला. दहा दिवसांच्या अल्पमुदतीच्या युद्धासाठी ४६ प्रकारचा दारूगोळा, रणगाडे, लष्करी वाहनांचे सुटे भाग यांचा पुरेसा साठा करणे आवश्यक असल्याचे या आढाव्यातून दिसून आले. आता आठ प्रकारचा दारूगोळा भारतीय कंपन्यांकडूनच बनवून घेण्याची दहा वर्षे मुदतीची योजना केंद्राने आखली असून त्यावर दरवर्षी १७०० कोटी रुपये खर्च केले जातील.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान