शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

असहिष्णुता वाद चिघळला

By admin | Updated: November 3, 2015 04:03 IST

रालोआ सरकारविरुद्ध असहिष्णुतेवर व्याख्यान देण्याचे नाटक न करता काँग्रेसने १९८४ च्या शीखविरोधी दंगलींबद्दल शरमेने मान झुकवायला हवी, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

पूर्णिया : रालोआ सरकारविरुद्ध असहिष्णुतेवर व्याख्यान देण्याचे नाटक न करता काँग्रेसने १९८४ च्या शीखविरोधी दंगलींबद्दल शरमेने मान झुकवायला हवी, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काँग्रेसला लक्ष्य बनविले.आज २ नोव्हेंबर आहे. तुम्हाला १९८४ आठवते काय? इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी देशभरात उफाळलेल्या दंगलींमध्ये लाखो शिखांची कत्तल झाली. काँग्रेस असहिष्णुतेवर व्याख्यान देत आहे. आज तोच दिवस आहे, असे सांगत त्यांनी ‘डूब मरो, डूब मरो’ असा टोला काँग्रेसला मारला. शीख पीडितांचे डोळे अद्यापही सुकले नाहीत. त्यांच्या जखमा अजून भरल्या नसताना तुम्ही २ नोव्हेंबर रोजी ‘ड्रामेबाजी’ करीत आहात, असे ते बिहारमधील पूर्णिया परिसरात निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना म्हणाले. काँग्रेसच्या नेतृत्वाने असहिष्णुतेच्या मुद्यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन निवेदन देण्याची तयारी केली असताना मोदींनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार संधिसाधू असल्याचा आरोप करताना त्यांनी २०११ मध्ये मुस्लिमांवर झालेल्या गोळीबाराचा उल्लेख केला. नितीशकुमार यांनी पीडितांबद्दल सहानुभूतीचा एकही शब्द व्यक्त केला नाही. पुणे- मुंबई स्फोटांचे धागेदोरे महाआघाडीच्या नेत्यांपर्यंतपुणे- मुंबई बॉम्बस्फोटांचे धागेदोरे बिहारच्या महाआघाडीतील नेत्यांपर्यंत पोहोचले आहेत. एका दलित महिला पोलीस अधिकाऱ्याने याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला असता तिला बिहार सोडायला भाग पाडण्यात आले असा आरोप मोदींनी दरभंगा येथील प्रचारसभेत केला. या स्फोटांच्या वेळी ‘दरभंगा मोड्युल’ या शब्दांचा वापर झाला होता. याकडे मोदींनी लक्ष वेधले. सर्वात हीन पंतप्रधानपंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात छोटे आणि हीन पंतप्रधान असल्याचा आरोप राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी टिष्ट्वटरवर केला आहे. आपण पंतप्रधान बनलो यावर मोदींचा विश्वासच बसत नाही. अशा प्रकारच्या लोकांच्या हातात देशाची राज्यघटना सुरक्षित नाही, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)राहुल गांधी : ‘दाल रोटी’ मत खाओपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यांनी भाववाढ कमी करण्याचे वचन दिले होते. ७० रुपये किलो असलेली तूरडाळ आता २०० रुपये किलोवर गेली आहे. एकेकाळी लोक म्हणायचे, ‘दाल रोटी खाओ प्रभू के गुण गाओ’ आता दाल रोटी मत खाओ प्रभू के गुण गाओ असे लोकांनी म्हणावे अशी मोदींची इच्छा आहे. रालोआची ही पाच वर्षे लवकर संपून जातील आणि काँग्रेस सत्तेवर येईल, असा विश्वास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहारमधील अर्णिया येथे प्रचारसभेला संबोधित करताना व्यक्त केला.व्ही.के. सिंग यांना टोलाकुणी कुत्र्यावर दगड भिरकावल्यास त्यासाठी सरकारला जबाबदार धरता येत नाही, असे विधान केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी केले होते. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, फरिदाबाद येथील समाजकंटकांनी दलिताच्या घराला लावलेल्या आगीत दोन मुले होरपळून मृत्युमुखी पडली. त्या दोन मुलांना कुत्र्याची उपमा देता येणार नाही. ही मुले भारताचे नागरिक आणि देशाचे भविष्य होती.