शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

"शहिदांचा अपमान करणा-या नालायकांचे तुकडे केले पाहिजेत"

By admin | Updated: July 10, 2017 10:39 IST

"शहिदांचा अपमान करणा-या नेत्यांचे तुकडे तुकडे केले पाहिजेत. कोणताही गुन्हा दाखल न करता पाच मिनिटात त्यांना ठार केलं पाहिजे"

ऑनलाइन लोकमत
सिकर, दि. 10 - राजस्थान सरकारमध्ये मंत्री असणा-या राजकुमार रिणवा यांनी शहिदांसंबंधी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "शहिदांचा अपमान करणा-या नेत्यांचे तुकडे तुकडे केले पाहिजेत. कोणताही गुन्हा दाखल न करता पाच मिनिटात त्यांना ठार केलं पाहिजे", असं राजकुमार रिणवा बोलले आहेत. राजकुमार रिणवा यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यात नेत्यांचा नालायक असा उल्लेखही करुन टाकला आहे. 
 
आणखी वाचा
आझम खान पुन्हा बरळले, लष्करावर केला बलात्काराचा आरोप
बुरहान वानीचं उदात्तीकरण बंद करा, भारताचा पाकिस्तानला इशारा
 
राजकुमार रिणवा रविवारी सिकर जिल्ह्यामधील कोलिडा गावात शहिद केशर देव यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आले होते. यानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राजकुमार रिणवा यांनी वादग्रस्त वक्तव्य करत, काही नेत्यांना नालायक म्हणून टाकलं. शहिदांचा अपमान करणा-या नेत्यांना खडे बोल सुनावत राजकुमार रिणवा यांनी अशी वक्तव्य करणारे नेते नालायक असतात असं सांगितलं आहे.
 
इतकंच नाही, तर शहिदांविरोधात वक्तव्य करणा-या नेत्यांचे तुकडे केले पाहिजेत असंही यावेळी ते बोलले आहेत. "जवान 50 डिग्री ते 0 डिग्री सेल्सिअसमध्ये राहून आपल्या देशाची सुरक्षा करत असता. पण काही नेते त्यांच्याविरोधात वक्तव्य करत असतात. अशा नेत्यांचे तुकडे केले गेले पाहिजेत. यासाठी राज्यघटनेत तरतूदही असली पाहिजे. असं करणा-यांवर कोणता गुन्हा दाखल करु नका, पाच मिनिटात त्यांना ठार केलं पाहिजे.
आझम खान पुन्हा बरळले, लष्करावर केला बलात्काराचा आरोप
काही दिवसांपुर्वी समाजवादी पक्षाचे आझम खान यांनी लष्कराच्या जवानांवर गंभीर आरोप केला होता. आझम खान यांनी भारतीय जवानांवर बलात्काराचा आरोप केला होता. आझम खान यांचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये ते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत होते. ते बोलत होते की, "महिला दहशतवादी लष्कर जवानांचं गुप्तांग कापून सोबत घेऊन गेले आहेत. हात किंवा मुंडक न कापता शरिरातील ज्या भागासंबंधी त्यांची तक्रार होती तोच भाग कापून ते घेऊन गेले. त्यांनी एक मोठा संदेश दिला असून संपुर्ण हिंदुस्थानाला याची लाज वाटली पाहिजे. आपण जगाला काय चेहरा दाखवणार आहोत याचाही विचार केला पाहिजे"". 
 
 पक्षाने मात्र आझम खान यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली होती. ""नाजूक परिस्थिती असताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं असून आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो"", असं समाजवादी पक्षाच्या दिपक मिश्रा यांनी सांगितलं होतं. भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणा-या राजकारण्यांवर बहिष्कार टाकला पाहिजे असं म्हटलं होतं. तर भाजपाचे अजून एक प्रवक्ता जीव्हीएल नरसिम्हा यांनी आझम खान फुटीरवादी आणि दहशतवाद्यांसाठी बोलत असल्याचं म्हटलं होतं. नरसिम्हा यांनी सांगितल्यानुसार, अशा प्रकारची वक्तव्यं करण्यासाठी समाजवादी पक्षच आपल्या नेत्यांना उकसवत असतो.