शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
3
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
4
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
5
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
6
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
7
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
8
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
9
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
10
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
11
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
12
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
13
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
14
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
15
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!
16
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
17
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
18
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
19
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
20
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."

"शहिदांचा अपमान करणा-या नालायकांचे तुकडे केले पाहिजेत"

By admin | Updated: July 10, 2017 10:39 IST

"शहिदांचा अपमान करणा-या नेत्यांचे तुकडे तुकडे केले पाहिजेत. कोणताही गुन्हा दाखल न करता पाच मिनिटात त्यांना ठार केलं पाहिजे"

ऑनलाइन लोकमत
सिकर, दि. 10 - राजस्थान सरकारमध्ये मंत्री असणा-या राजकुमार रिणवा यांनी शहिदांसंबंधी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "शहिदांचा अपमान करणा-या नेत्यांचे तुकडे तुकडे केले पाहिजेत. कोणताही गुन्हा दाखल न करता पाच मिनिटात त्यांना ठार केलं पाहिजे", असं राजकुमार रिणवा बोलले आहेत. राजकुमार रिणवा यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यात नेत्यांचा नालायक असा उल्लेखही करुन टाकला आहे. 
 
आणखी वाचा
आझम खान पुन्हा बरळले, लष्करावर केला बलात्काराचा आरोप
बुरहान वानीचं उदात्तीकरण बंद करा, भारताचा पाकिस्तानला इशारा
 
राजकुमार रिणवा रविवारी सिकर जिल्ह्यामधील कोलिडा गावात शहिद केशर देव यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आले होते. यानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राजकुमार रिणवा यांनी वादग्रस्त वक्तव्य करत, काही नेत्यांना नालायक म्हणून टाकलं. शहिदांचा अपमान करणा-या नेत्यांना खडे बोल सुनावत राजकुमार रिणवा यांनी अशी वक्तव्य करणारे नेते नालायक असतात असं सांगितलं आहे.
 
इतकंच नाही, तर शहिदांविरोधात वक्तव्य करणा-या नेत्यांचे तुकडे केले पाहिजेत असंही यावेळी ते बोलले आहेत. "जवान 50 डिग्री ते 0 डिग्री सेल्सिअसमध्ये राहून आपल्या देशाची सुरक्षा करत असता. पण काही नेते त्यांच्याविरोधात वक्तव्य करत असतात. अशा नेत्यांचे तुकडे केले गेले पाहिजेत. यासाठी राज्यघटनेत तरतूदही असली पाहिजे. असं करणा-यांवर कोणता गुन्हा दाखल करु नका, पाच मिनिटात त्यांना ठार केलं पाहिजे.
आझम खान पुन्हा बरळले, लष्करावर केला बलात्काराचा आरोप
काही दिवसांपुर्वी समाजवादी पक्षाचे आझम खान यांनी लष्कराच्या जवानांवर गंभीर आरोप केला होता. आझम खान यांनी भारतीय जवानांवर बलात्काराचा आरोप केला होता. आझम खान यांचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये ते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत होते. ते बोलत होते की, "महिला दहशतवादी लष्कर जवानांचं गुप्तांग कापून सोबत घेऊन गेले आहेत. हात किंवा मुंडक न कापता शरिरातील ज्या भागासंबंधी त्यांची तक्रार होती तोच भाग कापून ते घेऊन गेले. त्यांनी एक मोठा संदेश दिला असून संपुर्ण हिंदुस्थानाला याची लाज वाटली पाहिजे. आपण जगाला काय चेहरा दाखवणार आहोत याचाही विचार केला पाहिजे"". 
 
 पक्षाने मात्र आझम खान यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली होती. ""नाजूक परिस्थिती असताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं असून आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो"", असं समाजवादी पक्षाच्या दिपक मिश्रा यांनी सांगितलं होतं. भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणा-या राजकारण्यांवर बहिष्कार टाकला पाहिजे असं म्हटलं होतं. तर भाजपाचे अजून एक प्रवक्ता जीव्हीएल नरसिम्हा यांनी आझम खान फुटीरवादी आणि दहशतवाद्यांसाठी बोलत असल्याचं म्हटलं होतं. नरसिम्हा यांनी सांगितल्यानुसार, अशा प्रकारची वक्तव्यं करण्यासाठी समाजवादी पक्षच आपल्या नेत्यांना उकसवत असतो.