शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

"शहिदांचा अपमान करणा-या नालायकांचे तुकडे केले पाहिजेत"

By admin | Updated: July 10, 2017 10:39 IST

"शहिदांचा अपमान करणा-या नेत्यांचे तुकडे तुकडे केले पाहिजेत. कोणताही गुन्हा दाखल न करता पाच मिनिटात त्यांना ठार केलं पाहिजे"

ऑनलाइन लोकमत
सिकर, दि. 10 - राजस्थान सरकारमध्ये मंत्री असणा-या राजकुमार रिणवा यांनी शहिदांसंबंधी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "शहिदांचा अपमान करणा-या नेत्यांचे तुकडे तुकडे केले पाहिजेत. कोणताही गुन्हा दाखल न करता पाच मिनिटात त्यांना ठार केलं पाहिजे", असं राजकुमार रिणवा बोलले आहेत. राजकुमार रिणवा यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यात नेत्यांचा नालायक असा उल्लेखही करुन टाकला आहे. 
 
आणखी वाचा
आझम खान पुन्हा बरळले, लष्करावर केला बलात्काराचा आरोप
बुरहान वानीचं उदात्तीकरण बंद करा, भारताचा पाकिस्तानला इशारा
 
राजकुमार रिणवा रविवारी सिकर जिल्ह्यामधील कोलिडा गावात शहिद केशर देव यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आले होते. यानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राजकुमार रिणवा यांनी वादग्रस्त वक्तव्य करत, काही नेत्यांना नालायक म्हणून टाकलं. शहिदांचा अपमान करणा-या नेत्यांना खडे बोल सुनावत राजकुमार रिणवा यांनी अशी वक्तव्य करणारे नेते नालायक असतात असं सांगितलं आहे.
 
इतकंच नाही, तर शहिदांविरोधात वक्तव्य करणा-या नेत्यांचे तुकडे केले पाहिजेत असंही यावेळी ते बोलले आहेत. "जवान 50 डिग्री ते 0 डिग्री सेल्सिअसमध्ये राहून आपल्या देशाची सुरक्षा करत असता. पण काही नेते त्यांच्याविरोधात वक्तव्य करत असतात. अशा नेत्यांचे तुकडे केले गेले पाहिजेत. यासाठी राज्यघटनेत तरतूदही असली पाहिजे. असं करणा-यांवर कोणता गुन्हा दाखल करु नका, पाच मिनिटात त्यांना ठार केलं पाहिजे.
आझम खान पुन्हा बरळले, लष्करावर केला बलात्काराचा आरोप
काही दिवसांपुर्वी समाजवादी पक्षाचे आझम खान यांनी लष्कराच्या जवानांवर गंभीर आरोप केला होता. आझम खान यांनी भारतीय जवानांवर बलात्काराचा आरोप केला होता. आझम खान यांचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये ते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत होते. ते बोलत होते की, "महिला दहशतवादी लष्कर जवानांचं गुप्तांग कापून सोबत घेऊन गेले आहेत. हात किंवा मुंडक न कापता शरिरातील ज्या भागासंबंधी त्यांची तक्रार होती तोच भाग कापून ते घेऊन गेले. त्यांनी एक मोठा संदेश दिला असून संपुर्ण हिंदुस्थानाला याची लाज वाटली पाहिजे. आपण जगाला काय चेहरा दाखवणार आहोत याचाही विचार केला पाहिजे"". 
 
 पक्षाने मात्र आझम खान यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली होती. ""नाजूक परिस्थिती असताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं असून आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो"", असं समाजवादी पक्षाच्या दिपक मिश्रा यांनी सांगितलं होतं. भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणा-या राजकारण्यांवर बहिष्कार टाकला पाहिजे असं म्हटलं होतं. तर भाजपाचे अजून एक प्रवक्ता जीव्हीएल नरसिम्हा यांनी आझम खान फुटीरवादी आणि दहशतवाद्यांसाठी बोलत असल्याचं म्हटलं होतं. नरसिम्हा यांनी सांगितल्यानुसार, अशा प्रकारची वक्तव्यं करण्यासाठी समाजवादी पक्षच आपल्या नेत्यांना उकसवत असतो.