शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

"शहिदांचा अपमान करणा-या नालायकांचे तुकडे केले पाहिजेत"

By admin | Updated: July 10, 2017 10:39 IST

"शहिदांचा अपमान करणा-या नेत्यांचे तुकडे तुकडे केले पाहिजेत. कोणताही गुन्हा दाखल न करता पाच मिनिटात त्यांना ठार केलं पाहिजे"

ऑनलाइन लोकमत
सिकर, दि. 10 - राजस्थान सरकारमध्ये मंत्री असणा-या राजकुमार रिणवा यांनी शहिदांसंबंधी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "शहिदांचा अपमान करणा-या नेत्यांचे तुकडे तुकडे केले पाहिजेत. कोणताही गुन्हा दाखल न करता पाच मिनिटात त्यांना ठार केलं पाहिजे", असं राजकुमार रिणवा बोलले आहेत. राजकुमार रिणवा यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यात नेत्यांचा नालायक असा उल्लेखही करुन टाकला आहे. 
 
आणखी वाचा
आझम खान पुन्हा बरळले, लष्करावर केला बलात्काराचा आरोप
बुरहान वानीचं उदात्तीकरण बंद करा, भारताचा पाकिस्तानला इशारा
 
राजकुमार रिणवा रविवारी सिकर जिल्ह्यामधील कोलिडा गावात शहिद केशर देव यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आले होते. यानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राजकुमार रिणवा यांनी वादग्रस्त वक्तव्य करत, काही नेत्यांना नालायक म्हणून टाकलं. शहिदांचा अपमान करणा-या नेत्यांना खडे बोल सुनावत राजकुमार रिणवा यांनी अशी वक्तव्य करणारे नेते नालायक असतात असं सांगितलं आहे.
 
इतकंच नाही, तर शहिदांविरोधात वक्तव्य करणा-या नेत्यांचे तुकडे केले पाहिजेत असंही यावेळी ते बोलले आहेत. "जवान 50 डिग्री ते 0 डिग्री सेल्सिअसमध्ये राहून आपल्या देशाची सुरक्षा करत असता. पण काही नेते त्यांच्याविरोधात वक्तव्य करत असतात. अशा नेत्यांचे तुकडे केले गेले पाहिजेत. यासाठी राज्यघटनेत तरतूदही असली पाहिजे. असं करणा-यांवर कोणता गुन्हा दाखल करु नका, पाच मिनिटात त्यांना ठार केलं पाहिजे.
आझम खान पुन्हा बरळले, लष्करावर केला बलात्काराचा आरोप
काही दिवसांपुर्वी समाजवादी पक्षाचे आझम खान यांनी लष्कराच्या जवानांवर गंभीर आरोप केला होता. आझम खान यांनी भारतीय जवानांवर बलात्काराचा आरोप केला होता. आझम खान यांचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये ते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत होते. ते बोलत होते की, "महिला दहशतवादी लष्कर जवानांचं गुप्तांग कापून सोबत घेऊन गेले आहेत. हात किंवा मुंडक न कापता शरिरातील ज्या भागासंबंधी त्यांची तक्रार होती तोच भाग कापून ते घेऊन गेले. त्यांनी एक मोठा संदेश दिला असून संपुर्ण हिंदुस्थानाला याची लाज वाटली पाहिजे. आपण जगाला काय चेहरा दाखवणार आहोत याचाही विचार केला पाहिजे"". 
 
 पक्षाने मात्र आझम खान यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली होती. ""नाजूक परिस्थिती असताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं असून आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो"", असं समाजवादी पक्षाच्या दिपक मिश्रा यांनी सांगितलं होतं. भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणा-या राजकारण्यांवर बहिष्कार टाकला पाहिजे असं म्हटलं होतं. तर भाजपाचे अजून एक प्रवक्ता जीव्हीएल नरसिम्हा यांनी आझम खान फुटीरवादी आणि दहशतवाद्यांसाठी बोलत असल्याचं म्हटलं होतं. नरसिम्हा यांनी सांगितल्यानुसार, अशा प्रकारची वक्तव्यं करण्यासाठी समाजवादी पक्षच आपल्या नेत्यांना उकसवत असतो.