शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

स्लीपर कोचऐवजी चेअर कार, प्रभूंचा रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव

By admin | Updated: November 20, 2014 09:56 IST

१० तासांपेक्षा कमी अंतर असलेल्या रेल्वे प्रवासासाठी स्लीपर कोचऐवजी चेअर कारचा वापर करण्याचा प्रस्ताव प्रभूंनी मांडला असून यामुळे रेल्वेच्या प्रवासी क्षमतेमध्ये वाढ होईल असा दावा केला जात आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २० -  रेल्वेमधील वाढती प्रवासी संख्या आणि त्यातुलनेत कमी पडणारी आसन क्षमता यावर नवनियुक्त रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तोडगा काढला आहे. १० तासांपेक्षा कमी अंतर असलेल्या रेल्वे प्रवासासाठी स्लीपर कोचऐवजी चेअर कारचा वापर करण्याचा प्रस्ताव प्रभूंनी मांडला असून यामुळे रेल्वेच्या प्रवासी क्षमतेमध्ये वाढ होईल असा दावा केला जात आहे. 
रेल्वेच्या विकासासाठी सुरेश प्रभू कामाला लागले आहेत. प्रवासी क्षमता आणि त्यातुलेनत अपु-या पडणा-या गाड्या ही रेल्वे मंत्रालयासमोरील प्रमुख समस्या आहे. यावर तोडगा काढण्यासाठी प्रभू यांनी एक प्रस्ताव रेल्वे बोर्डासमोर मांडला आहे. यानुसार १० तासांपेक्षा कमी अंतर असलेल्या प्रवासामध्ये स्लीपरऐवजी चेअर कोच जोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये रात्रीच्या प्रवासातही हीच पद्धत अवलंबवावी त्यामुळे प्रवासी नेण्याची क्षमता वाढू शकेल असे प्रभूंचे म्हणणे आहे. सणासुदी आणि सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांच्या संख्येत अनेक पटींनी वाढ होते. अशा वेळी ही पद्धत जास्त उपयुक्त ठरेल. यासोबतच लहान अंतरावर धावणा-या एक्सप्रेस गाड्यांऐवजी तिथे जास्तीत जास्त डबल डेकर गाड्यांचा वापरही करावा असे  या प्रस्तावात म्हटले आहे. रेल्वे बोर्ड या प्रस्तावावर विचार करत असून सखोल अभ्यासानंतरच ते रेल्वे मंत्रालयाकडे त्यांचे मत मांडेल. 
 
या प्रस्तावातील प्रमुख अडचणी
> दिवसाच्या प्रवासात तब्बल १० तास बसून प्रवास करणे एखाद्यावेळी शक्य होईल, पण रात्रीच्या वेळी तब्बल १० तास बसून प्रवास करण्यास प्रवासी तयारी होतील का हा मोठा प्रश्न आहे. 
> सध्या लहान अंतरासाठी धावणा-या बहुसंख्य एक्सप्रेस गाड्यांमध्ये स्लीपर कोचऐवजी चेअर कारचा वापर केला जातो. आता १० तासांपेक्षा कमी अंतर असलेल्या प्रवासासाठी आणखी चेअर कार कुठून आणायच्या असा प्रश्न रेल्वे अधिका-यांसमोर निर्माण झाला आहे. 
> सर्वात मुख्य बाब म्हणजे प्रवासी संख्या वाढवण्याच्या नादात रेल्वेच्या तिजोरीला बसणारा फटका. स्लीपर कोचऐवजी चेअर कोच दिल्यास रेल्वेला भाडे कमी करावे लागेल. स्लीपरऐवजी चेअर कोच दिल्यास त्यामध्ये आणखी ३६ प्रवासी वाढतील. पण तिकीटाच्या दरांमधील तफावत पाहता रेल्वेला तोटाच होईल अशी भिती वर्तवली जात आहे.