शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

गांधींऐवजी नेहरुंना मारायला हवं होतं - भाजपा नेत्याचा वादग्रस्त लेख

By admin | Updated: October 24, 2014 13:26 IST

नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांच्याऐवजी जवाहरलाल नेहरु यांची हत्या करायला हवी होती असे वादग्रस्त विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केरळमधील 'केसरी' या मासिकात करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत 
तिरुअनंतपुरम, दि. २४ - नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांच्याऐवजी जवाहरलाल नेहरु यांची हत्या करायला हवी होती असे वादग्रस्त विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केरळमधील 'केसरी' या मासिकात करण्यात आला आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्याने लिहीलेल्या या वादग्रस्त लेखावर केरळ काँग्रेसने आक्षेप घेतला असून केरळ सरकारने याप्रकरणी चौकशीचे आदेशही दिले आहेत. 
केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 'केसरी' मासिक हे मुखपत्र असून १७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या या मासिकामध्ये जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दात टीका करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत चलागौडी येथील भाजपाचे उमेदवार बी. गोपाळकृष्णन यांनी हा लेख लिहीला आहे. नेहरुंच्या स्वार्थीवृत्तीमुळेच देशाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला असून महात्मा गांधी यांच्या हत्येचेही हेच कारण होते. जर इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी निष्पक्षपणे फाळणीपूर्वीचा इतिहास व नथुराम गोडसे यांचे विचार याचा अभ्यास केला तर गोडसे यांनी चुकीचे 'टार्गेट' निवडले याची विद्यार्थ्यांना जाणीव होईल असे गोपाळकृष्णन यांनी म्हटले आहे. 
जागतिक नेता होण्यासाठी नेहरुंना गांधीजी हवे होते, त्यांचे नाव, टोपी व खादी या तिन्ही गोष्टी नेहरुंना हव्या होत्या. गोडसे नेहरुंपेक्षा चांगले होते. हत्येपूर्वी गोडसेंनी गांधीजींना नमस्कार केला होता. नेहरुजी तर समोर नमस्कार करायचे व मग पाठीत खंजीर खुपसायचे असे बेजबाबदार विधान गोपाळकृष्णन यांनी केले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण लेखात गोडसे हे संघाशी संबंधीत नव्हते असे वारंवार म्हटले आहे.  
दरम्यान, केरळमधील काँग्रेस नेत्यांनी लेखाविषयी आक्षेप घेतला आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून हिंदूत्वाचा मुद्दा पुढे केला जात आहे. एकीकडे  केंद्र सरकार नेहरुंची १२५ वी जयंती साजरी करण्यासाठी समिती नेमते व दुसरीकडे संघाच्या मुखपत्रात नेहरुंवर टीका केली जाते. मोदींनी हे सर्वप्रकार रोखायला हवे अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.