शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांसाठी तत्काळ निधी द्या!

By admin | Updated: June 26, 2015 02:36 IST

गतिवर्धक सिंचन लाभ योजनेअंतर्गत (एआयबीपी) मंजूर करण्यात आलेल्या सहा सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारतर्फे मंजूर करण्यात

नवी दिल्ली : गतिवर्धक सिंचन लाभ योजनेअंतर्गत (एआयबीपी) मंजूर करण्यात आलेल्या सहा सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारतर्फे मंजूर करण्यात आलेला निधी तत्काळ जारी करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.राज्याचे जलसंसाधन मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदी यांना या मागणीचे पत्र सादर केले. महाराष्ट्रातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. त्यांच्यासाठी फारच कमी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. किमान १३ प्रकल्पांना वन आणि पर्यावरण विभागाकडून हिरवा कंदील मिळायचा आहे, असे महाजन यांनी सांगितले.ते म्हणाले, केंद्रीय जल संसाधन मंत्र्यांनी २०१४-१५ मध्ये तरळी, धोम बालकावाडी, वाघूर, अपर पैनगंगा, लोअर दुधना आणि बेंबडा सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली होती. या प्रकल्पांना केंद्राकडून एकूण ३१६.४६ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार होते. परंतु मार्च २०१५ मध्ये केवळ ९.५० कोटी रुपये देण्यात आले. उर्वरित ३०६.९६ कोटी रुपये केंद्राकडून अद्याप मिळायचे आहेत. पुरेशा निधीअभावी हे प्रकल्प प्रभावित होत आहेत. त्यामुळे केंद्राने बाकीचा निधी लवकरात लवकर जारी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.राज्य सरकारने २०१४-१५ दरम्यान एआयबीपी अंतर्गत १९ मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राकडे एकूण १६२२ कोटी रुपयांची मदत मागितली होती. परंतु त्यापैकी केवळ सहा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे आणि उर्वरित १३ सिंचन प्रकल्प वन विभागाच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. या प्रकल्पांत नागपूरचा कन्हान नदी सिंचन प्रकल्प, पेंच सिंचन प्रकल्प, अमरावतीचा भीमडी लघु सिंचन तलाव, वर्धा येथील बराज लिफ्ट सिंचन प्रकल्प आणि यवतमाळच्या खर्डा येथील प्रस्तावित लघु सिंचन तलाव प्रकल्पाचा समावेश आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली. (प्रतिनिधी)