शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र उद्योगाला सरकारने प्रोत्साहन पॅकेज देण्याची ‘आयएनएस’ने केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 02:18 IST

‘आयएनएस’चे अध्यक्ष एल. आदिमूलम यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वृत्तपत्र उद्योग गेल्या काही महिन्यांपासून मागणी करीत असलेल्या पॅकेजची घोषणा सरकारने लवकरात लवकर करावी.

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीमुळे अभूतपूर्व संकटात सापडलेल्या वृत्तपत्र उद्योगाने मागील आठ महिन्यांत १२,५०० कोटी रुपये गमावले असून, या उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने प्रोत्साहन पॅकेज द्यावे, अशी मागणी ‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’ने (आयएनएस) केली आहे.‘आयएनएस’चे अध्यक्ष एल. आदिमूलम यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वृत्तपत्र उद्योग गेल्या काही महिन्यांपासून मागणी करीत असलेल्या पॅकेजची घोषणा सरकारने लवकरात लवकर करावी.निवेदनात म्हटले आहे की, आव्हानात्मक काळात विश्वसनीय बातम्या देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वृत्तपत्रांनी निभावली आहे. वृत्तपत्रांच्या या कामगिरीची दखल सर्वोच्च न्यायालय आणि इतर संस्थांनी वेळोवेळी घेतली आहे. कोविड-१९ साथीने मात्र वृत्तपत्र उद्योगाला अभूतपूर्व संकटात टाकले आहे. वृत्तपत्रांना जाहिराती आणि वितरण याद्वारे मिळणाऱ्या महसुलावर प्रचंड परिणाम झाला आहे. अनेक प्रकाशनांना आपल्या काही आवृत्त्या बंद अथवा निलंबित कराव्या लागल्या आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर निकटच्या भविष्यात अनेक प्रकाशनांना आपले काम थांबवावे लागेल. मागील आठ महिन्यांत वृत्तपत्र उद्योगाने १२,५०० कोटी रुपये गमावले आहेत. वार्षिक तोटा १६,००० कोटी रुपये राहील असा अंदाज आहे.आदिमूलम यांनी म्हटले की, जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशात चौथा स्तंभ कोसळल्यास होणारे सामाजिक-राजकीय परिणाम आणि वृत्तपत्र उद्योगात पत्रकार, मुद्रक आणि वितरक म्हणून, तसेच अप्रत्यक्षरीत्या संबंधित असलेल्या विभागांत काम करणाऱ्या ३० लाखांपेक्षा जास्त लोकांवर होऊ शकणारे थेट परिणाम याची कल्पनाच न केलेली बरी. वृत्तपत्रे कोसळल्यास त्यांचे कर्मचारी आणि कुटुंबियांसह लाखो भारतीयांना फटका बसेल. मुद्रणालये, वितरण साखळी, वृत्तपत्र विक्रेते आणि घरोघर जाऊन पेपर वाटणारी मुले इत्यादी अनेक लोकांना याचा फटका बसेल. दोन वर्षे करमाफी देण्याची मागणीआदिमूलम यांनी निवेदनात म्हटले आहे की, या संकटातून बाहेर पडण्यासाठी संपूर्ण वृत्तपत्र उद्योग सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहे. आता उद्योगाला सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे. वृत्तपत्रांना साह्य करण्यासाठी सरकारने न्यूजप्रिंट, जीएनपी व एलडब्ल्यूसी पेपरवरील ५ टक्के सीमा शुल्क रद्द करून दोन वर्षांसाठी करमाफी द्यावी. शासकीय जाहिरातींत ५० टक्के वाढ करावी. मुद्रित माध्यमांवरील शासकीय खर्च २०० टक्के वाढविण्यात यावा आणि ब्युरो ऑफ आऊटरिच अँड कम्युनिकेशन, तसेच राज्य सरकारे यांच्याकडून देण्यात आलेल्या जाहिरातींची बिले तातडीने अदा करण्यात यावीत.