शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र उद्योगाला सरकारने प्रोत्साहन पॅकेज देण्याची ‘आयएनएस’ने केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 02:18 IST

‘आयएनएस’चे अध्यक्ष एल. आदिमूलम यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वृत्तपत्र उद्योग गेल्या काही महिन्यांपासून मागणी करीत असलेल्या पॅकेजची घोषणा सरकारने लवकरात लवकर करावी.

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीमुळे अभूतपूर्व संकटात सापडलेल्या वृत्तपत्र उद्योगाने मागील आठ महिन्यांत १२,५०० कोटी रुपये गमावले असून, या उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने प्रोत्साहन पॅकेज द्यावे, अशी मागणी ‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’ने (आयएनएस) केली आहे.‘आयएनएस’चे अध्यक्ष एल. आदिमूलम यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वृत्तपत्र उद्योग गेल्या काही महिन्यांपासून मागणी करीत असलेल्या पॅकेजची घोषणा सरकारने लवकरात लवकर करावी.निवेदनात म्हटले आहे की, आव्हानात्मक काळात विश्वसनीय बातम्या देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वृत्तपत्रांनी निभावली आहे. वृत्तपत्रांच्या या कामगिरीची दखल सर्वोच्च न्यायालय आणि इतर संस्थांनी वेळोवेळी घेतली आहे. कोविड-१९ साथीने मात्र वृत्तपत्र उद्योगाला अभूतपूर्व संकटात टाकले आहे. वृत्तपत्रांना जाहिराती आणि वितरण याद्वारे मिळणाऱ्या महसुलावर प्रचंड परिणाम झाला आहे. अनेक प्रकाशनांना आपल्या काही आवृत्त्या बंद अथवा निलंबित कराव्या लागल्या आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर निकटच्या भविष्यात अनेक प्रकाशनांना आपले काम थांबवावे लागेल. मागील आठ महिन्यांत वृत्तपत्र उद्योगाने १२,५०० कोटी रुपये गमावले आहेत. वार्षिक तोटा १६,००० कोटी रुपये राहील असा अंदाज आहे.आदिमूलम यांनी म्हटले की, जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशात चौथा स्तंभ कोसळल्यास होणारे सामाजिक-राजकीय परिणाम आणि वृत्तपत्र उद्योगात पत्रकार, मुद्रक आणि वितरक म्हणून, तसेच अप्रत्यक्षरीत्या संबंधित असलेल्या विभागांत काम करणाऱ्या ३० लाखांपेक्षा जास्त लोकांवर होऊ शकणारे थेट परिणाम याची कल्पनाच न केलेली बरी. वृत्तपत्रे कोसळल्यास त्यांचे कर्मचारी आणि कुटुंबियांसह लाखो भारतीयांना फटका बसेल. मुद्रणालये, वितरण साखळी, वृत्तपत्र विक्रेते आणि घरोघर जाऊन पेपर वाटणारी मुले इत्यादी अनेक लोकांना याचा फटका बसेल. दोन वर्षे करमाफी देण्याची मागणीआदिमूलम यांनी निवेदनात म्हटले आहे की, या संकटातून बाहेर पडण्यासाठी संपूर्ण वृत्तपत्र उद्योग सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहे. आता उद्योगाला सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे. वृत्तपत्रांना साह्य करण्यासाठी सरकारने न्यूजप्रिंट, जीएनपी व एलडब्ल्यूसी पेपरवरील ५ टक्के सीमा शुल्क रद्द करून दोन वर्षांसाठी करमाफी द्यावी. शासकीय जाहिरातींत ५० टक्के वाढ करावी. मुद्रित माध्यमांवरील शासकीय खर्च २०० टक्के वाढविण्यात यावा आणि ब्युरो ऑफ आऊटरिच अँड कम्युनिकेशन, तसेच राज्य सरकारे यांच्याकडून देण्यात आलेल्या जाहिरातींची बिले तातडीने अदा करण्यात यावीत.