शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

वृत्तपत्र उद्योगाला सरकारने प्रोत्साहन पॅकेज देण्याची ‘आयएनएस’ने केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 02:18 IST

‘आयएनएस’चे अध्यक्ष एल. आदिमूलम यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वृत्तपत्र उद्योग गेल्या काही महिन्यांपासून मागणी करीत असलेल्या पॅकेजची घोषणा सरकारने लवकरात लवकर करावी.

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीमुळे अभूतपूर्व संकटात सापडलेल्या वृत्तपत्र उद्योगाने मागील आठ महिन्यांत १२,५०० कोटी रुपये गमावले असून, या उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने प्रोत्साहन पॅकेज द्यावे, अशी मागणी ‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’ने (आयएनएस) केली आहे.‘आयएनएस’चे अध्यक्ष एल. आदिमूलम यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वृत्तपत्र उद्योग गेल्या काही महिन्यांपासून मागणी करीत असलेल्या पॅकेजची घोषणा सरकारने लवकरात लवकर करावी.निवेदनात म्हटले आहे की, आव्हानात्मक काळात विश्वसनीय बातम्या देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वृत्तपत्रांनी निभावली आहे. वृत्तपत्रांच्या या कामगिरीची दखल सर्वोच्च न्यायालय आणि इतर संस्थांनी वेळोवेळी घेतली आहे. कोविड-१९ साथीने मात्र वृत्तपत्र उद्योगाला अभूतपूर्व संकटात टाकले आहे. वृत्तपत्रांना जाहिराती आणि वितरण याद्वारे मिळणाऱ्या महसुलावर प्रचंड परिणाम झाला आहे. अनेक प्रकाशनांना आपल्या काही आवृत्त्या बंद अथवा निलंबित कराव्या लागल्या आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर निकटच्या भविष्यात अनेक प्रकाशनांना आपले काम थांबवावे लागेल. मागील आठ महिन्यांत वृत्तपत्र उद्योगाने १२,५०० कोटी रुपये गमावले आहेत. वार्षिक तोटा १६,००० कोटी रुपये राहील असा अंदाज आहे.आदिमूलम यांनी म्हटले की, जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशात चौथा स्तंभ कोसळल्यास होणारे सामाजिक-राजकीय परिणाम आणि वृत्तपत्र उद्योगात पत्रकार, मुद्रक आणि वितरक म्हणून, तसेच अप्रत्यक्षरीत्या संबंधित असलेल्या विभागांत काम करणाऱ्या ३० लाखांपेक्षा जास्त लोकांवर होऊ शकणारे थेट परिणाम याची कल्पनाच न केलेली बरी. वृत्तपत्रे कोसळल्यास त्यांचे कर्मचारी आणि कुटुंबियांसह लाखो भारतीयांना फटका बसेल. मुद्रणालये, वितरण साखळी, वृत्तपत्र विक्रेते आणि घरोघर जाऊन पेपर वाटणारी मुले इत्यादी अनेक लोकांना याचा फटका बसेल. दोन वर्षे करमाफी देण्याची मागणीआदिमूलम यांनी निवेदनात म्हटले आहे की, या संकटातून बाहेर पडण्यासाठी संपूर्ण वृत्तपत्र उद्योग सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहे. आता उद्योगाला सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे. वृत्तपत्रांना साह्य करण्यासाठी सरकारने न्यूजप्रिंट, जीएनपी व एलडब्ल्यूसी पेपरवरील ५ टक्के सीमा शुल्क रद्द करून दोन वर्षांसाठी करमाफी द्यावी. शासकीय जाहिरातींत ५० टक्के वाढ करावी. मुद्रित माध्यमांवरील शासकीय खर्च २०० टक्के वाढविण्यात यावा आणि ब्युरो ऑफ आऊटरिच अँड कम्युनिकेशन, तसेच राज्य सरकारे यांच्याकडून देण्यात आलेल्या जाहिरातींची बिले तातडीने अदा करण्यात यावीत.