शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

एनआयटी प्रकरणी चौकशीचे आदेश

By admin | Updated: April 8, 2016 03:04 IST

गेल्या आठवड्यात वर्ल्ड टी-२० चषक क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजकडून पराभव झाल्यानंतर श्रीनगर येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (एनआयटी) विद्यार्थ्यांच्या दोन

श्रीनगर/नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात वर्ल्ड टी-२० चषक क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजकडून पराभव झाल्यानंतर श्रीनगर येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (एनआयटी) विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेल्या संघर्षाची कालबद्ध चौकशी करण्याचे आदेश जम्मू-काश्मीर सरकारने गुरुवारी दिले. चौकशीचे आदेश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांनी दिली. श्रीनगरचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी चौकशी करून,१५ दिवसांत अहवाल सादर करतील.एफआयआर दाखलतेथील हिंसाचाराच्या संदर्भात पोलिसांनी गुरुवारी दोन एफआयआर दाखल केले. १ एप्रिलला काश्मिरी आणि बिगर-काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या संघर्षाच्या संदर्भात अज्ञात लोकांविरुद्ध पहिला एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दुसरा एफआयआर ५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांनी केलेल्या तोडफोडीच्या संदर्भात आहे. दोन्ही एफआयआरमध्ये कुणाचेही नाव नाही.जम्मूत बंदश्रीनगरच्या एनआयटी येथे निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी जम्मूमध्ये उस्फूर्त बंद पाळण्यात आला. जम्मू-काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टी आणि अन्य संघटनांनी आयोजित केलेल्या या बंदमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. वकिलांनीही निदर्शने करून लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.एनआयटी अन्यत्र हलवाएनआयटी काश्मिरातून अन्यत्र हलवा आणि विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा या मागणीसाठी राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्या दिवशीही तीव्र निदर्शने केली. (वृत्तसंस्था)>परीक्षेची मुभाश्रीनगरच्या एनआयटीतील विद्यार्थ्यांना नंतर परीक्षेला बसण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. मंत्रालयाच्या तीन सदस्यीय पथकाने परिस्थितीची पाहणी आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.जे विद्यार्थी पुढच्या आठवड्यात होणाऱ्या परीक्षेला बसू इच्छितात त्यांना त्या परीक्षेत बसता येईल. परंतु जे विद्यार्थी आताच्या परीक्षेला बसण्यास इच्छुक नाहीत त्यांच्यासाठी नव्याने परीक्षा घेण्यात येतील. > राहुल यांची टीकापीडीपी-भाजपाचे सरकार एनआयटीतील विद्यार्थ्यांविरुद्ध ‘निर्दयी’ बळाचा वापर करीत आहे. विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मी निषेध करतो, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.