शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

सरकारची महागाईवरून होणार कोंडी !

By admin | Updated: July 7, 2014 04:17 IST

नव्या सरकार पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सोमवारी होत असताना सरकार आणि काँग्रेस यांच्यामध्ये विरोधीपक्ष नेतेपदावरून तणाव निर्माण झाला आहे.

फराज अहमद, नवी दिल्ली नव्या सरकार पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सोमवारी होत असताना सरकार आणि काँग्रेस यांच्यामध्ये विरोधीपक्ष नेतेपदावरून तणाव निर्माण झाला आहे. सरकारने काँग्रेसला सर्वांत मोठा गट म्हणून विरोधी पक्षाचा दर्जा देण्यास नकार दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर महागाईच्या मुद्द्यावर संसदेत सरकारची पुरती कोंडी करण्याचा चंग काँग्रेससह सर्व विरोधकांनी बांधला आहे. संसदीय कामकाज मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी प्रारंभी विरोधीपक्ष नेतेपदासाठी निर्णय लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यावर सोपवला. परंतु त्यांच्याकडे पुन्हा विचारणा केली असता त्यांनी काँग्रेसविरुद्ध बाह्णा सरसावल्याचे दिसून आले.काँग्रेस नेते शकील अहमद यांनी विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला न मिळाल्यास सभागृहात कामकाज होऊ दिले जाणार नाही, असा इशारा दिला. यासंदर्भात नायडू यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, त्यांनी अडथळा निर्माण केल्यास सभागृह कसे चालवायचे आम्हाला माहीत आहे. हा जनतेचा फैसला आहे आणि घटनेशी संबंधित विषय आहे. अध्यक्षांच्या निर्णयाचे पालन केले जाईल, असेही ते म्हणाले. संसदेच्या अधिवेशनात महागाईच्या मुद्यावर मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने महागाई हा कळीचा प्रचार मुद्दा बनवला होताÞ आता याच महागाईवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली आहे. सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी महागाई, रेल्वे भाडेवाढ, तामीळ मच्छीमारांच्या समस्या, संघर्षरत इराकमध्ये फसलेले भारतीय अशा अनेक मुद्यांवर चर्चेची मागणी केली आहे. हे अधिवेशन १४ आॅगस्टर्पयत चालेल. त्यात १६८ तास कामकाज होणे अपेक्षित आहे.