शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

महागाईने गाठला 5 महिन्यांचा नीचांक

By admin | Updated: June 14, 2017 15:59 IST

मे महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई निर्देशांक पाच महिन्यांच्या नीचांकी 2.17 टक्क्यांवर आला आहे. कारण भाजीपाल्याच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 14 -  किरकोळ बाजारातील महागाई दर 5 महिन्यांच्या नीचांकी स्थरावर आला आहे. सीपीआय अर्थात ग्राहक किंमत निर्देशांक 2.17 टक्क्यांवर पोहोचला आहे. भाजीपाल्याच्या-अन्नधान्याचे दर कमी झाल्याने मे महिन्यात किरकोळ बाजारातील महागाई दरात घट झाली आहे.  
 
याआधी एप्रिल महिन्यात हा दर 2.99 टक्के होता. मे महिन्यात महागाईचा दर एप्रिलमधील 2.99 टक्क्यांवरून कमी होऊन 2.17 टक्के झाला आहे. गेल्यावर्षीच्या मे महिन्यात महागाई दर 5.76 टक्के होता. गेल्या महिन्यात अन्नधान्याचा किरकोळ दर उणे 1.05 टक्क्यांवर आला. याशिवाय, फळे, कपडे, इंधन आणि घरांच्या किंमतीदेखील कमी झाल्या.
 
महागाई कमी झाल्यामुळे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या द्वैमासिक समीक्षेत रिझर्व्ह बँक व्याजदरात घट करण्याची शक्यता आहे. 
जून ते सप्टेंबर या काळात भारतात 70 टक्के पाऊस पडतो. जर पाऊस चांगला झाला तर भरघोस उत्पादनामुळे पुढच्या काळातही महागाईवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चलन समीक्षेत रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरणात कुठल्याही प्रकारचे बदल केले नव्हते. विशेष बाब म्हणजे महागाईच्या दरात झालेली घट ही रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या लक्ष्यापेक्षा कमी आहे. या काळात महागाईचा दर 4 टक्क्यांपर्यंत नियंत्रित करण्याचे निश्चित केले होते. 
 
 या काळात गेल्यावर्षीच्या तुलनेत अन्नधान्याच्या किमतीत 1.05 टक्के घट झाली आहे. तर एप्रिल महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. मार्चमध्ये औद्योगिक वृद्धीचा दर 2.7 टक्के होता. हा दर एप्रिलमध्ये वाढून 3.1 टक्के झाला आहे.