शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

महागाईने गाठला 5 महिन्यांचा नीचांक

By admin | Updated: June 14, 2017 15:59 IST

मे महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई निर्देशांक पाच महिन्यांच्या नीचांकी 2.17 टक्क्यांवर आला आहे. कारण भाजीपाल्याच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 14 -  किरकोळ बाजारातील महागाई दर 5 महिन्यांच्या नीचांकी स्थरावर आला आहे. सीपीआय अर्थात ग्राहक किंमत निर्देशांक 2.17 टक्क्यांवर पोहोचला आहे. भाजीपाल्याच्या-अन्नधान्याचे दर कमी झाल्याने मे महिन्यात किरकोळ बाजारातील महागाई दरात घट झाली आहे.  
 
याआधी एप्रिल महिन्यात हा दर 2.99 टक्के होता. मे महिन्यात महागाईचा दर एप्रिलमधील 2.99 टक्क्यांवरून कमी होऊन 2.17 टक्के झाला आहे. गेल्यावर्षीच्या मे महिन्यात महागाई दर 5.76 टक्के होता. गेल्या महिन्यात अन्नधान्याचा किरकोळ दर उणे 1.05 टक्क्यांवर आला. याशिवाय, फळे, कपडे, इंधन आणि घरांच्या किंमतीदेखील कमी झाल्या.
 
महागाई कमी झाल्यामुळे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या द्वैमासिक समीक्षेत रिझर्व्ह बँक व्याजदरात घट करण्याची शक्यता आहे. 
जून ते सप्टेंबर या काळात भारतात 70 टक्के पाऊस पडतो. जर पाऊस चांगला झाला तर भरघोस उत्पादनामुळे पुढच्या काळातही महागाईवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चलन समीक्षेत रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरणात कुठल्याही प्रकारचे बदल केले नव्हते. विशेष बाब म्हणजे महागाईच्या दरात झालेली घट ही रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या लक्ष्यापेक्षा कमी आहे. या काळात महागाईचा दर 4 टक्क्यांपर्यंत नियंत्रित करण्याचे निश्चित केले होते. 
 
 या काळात गेल्यावर्षीच्या तुलनेत अन्नधान्याच्या किमतीत 1.05 टक्के घट झाली आहे. तर एप्रिल महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. मार्चमध्ये औद्योगिक वृद्धीचा दर 2.7 टक्के होता. हा दर एप्रिलमध्ये वाढून 3.1 टक्के झाला आहे.