शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर

By admin | Updated: January 25, 2015 02:17 IST

व्हाइट हाउसने बराक ओबामा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेने जगातील दोन सर्वांत मोठ्या लोकशाही देशांतील संबंध एका नव्या उंचीवर झेप घेतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

व्यापक संदेश : व्हाइट हाउसच्या मते निमंत्रणाने उभय बाजूंना नवचैतन्यवॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्षांचा ऐतिहासिक दुसरा भारत दौरा ‘पारडे बदलणारा’ असल्याचे संबोधत व्हाइट हाउसने बराक ओबामा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेने जगातील दोन सर्वांत मोठ्या लोकशाही देशांतील संबंध एका नव्या उंचीवर झेप घेतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.व्हाइट हाउसमधील दक्षिण आशियाचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे वरिष्ठ संचालक फिल रीनेर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ‘राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा व तेथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणे, यामुळे निश्चितच दोन्ही देशांतील संबंध एका नव्या उंचीवर असतील. माझ्या दृष्टीने ही एक महत्त्वाची संधी आहे आणि दोन्ही देशांतील संबंधांसाठी ‘खूप फलदायी’ संधी म्हणून याची नोंद होईल. राष्ट्राध्यक्षांनी या नात्यासाठी खूप वेळ दिला असून, ते आमच्यातील भागीदारीला एक नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.’ रीनर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत भारत व दक्षिण आशियाई प्रकरणातील प्रमुख जाणकार आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या तीन दिवसीय भारत दौऱ्यात संरक्षण व सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा आणि हवामान बदल तसेच अणू सहकार्य यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रगती झालेली दिसेल, असा विश्वासही रीनर यांनी व्यक्त केला. अंतराळ सहकार्य, कर्करोग संशोधन तसेच बौद्धिक संपदा यांसारख्या क्षेत्रांतही द्विपक्षीय सहकार्य वाढीला वाव आहे. फिल रीनर यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्षांनी मोदींचे प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुथ अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून या संधीचा लाभ केवळ प्रतीकात्मक पद्धतीने न घेता तो वास्तववादी असला पाहिजे असा स्पष्ट संदेश देण्यात. यामुळे या प्रतीकात्मक सन्मानाचा स्वीकार करण्याचा अर्थच या संधीचा एक व्यापक वास्तववादी संधी म्हणून वापर करणे हा असल्याचे स्पष्ट झाले.ओबामा-मोदी यांच्यात गेल्या ३० सप्टेंबर रोजी झालेल्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांत नवचैतन्य संचारले आहे. वरिष्ठ पातळीवरच सकारात्मक घडत असून, धोरणात्मक भागीदारीसह यात सुधार होत आहे. ओबामांना प्रजासत्ताक दिनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी मोदींच्या आमंत्रणामुळे अमेरिकेत व्यापक संदेश गेल्याचेही रीनर म्हणाले.