शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक युद्ध असंभव!

By admin | Updated: October 23, 2016 01:21 IST

नियंत्रण रेषेवरील तणाव वाढला असतानाही भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर नाहीत. दोन्ही देश युद्धाच्या शक्यतेबाबत अधिक सावध आहेत, असे जम्मू

न्यूयॉर्क : नियंत्रण रेषेवरील तणाव वाढला असतानाही भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर नाहीत. दोन्ही देश युद्धाच्या शक्यतेबाबत अधिक सावध आहेत, असे जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी येथे सांगितले. ‘भारत आणि पाकिस्तान : एक उपखंडीय प्रकरण’ या विषयावरील संमेलनात ते बोलत होते. उपखंडावर युद्धाचे ढग घोंगावत असल्याचे मानणाऱ्यांपैकी मी नाही. आमच्या काही वृत्तवाहिन्या दोन्ही देश युद्धाच्या शक्यतेबाबत सावध असल्याचे पाहू इच्छितात. मला वाटते की, भारत व पाकमधील सरकारे त्याहून कितीतरी अधिक सावध आहेत, असे ते म्हणाले. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या संमेलनाचे आयोजन केले. पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष जन. परवेझ मुशर्रफ हेदेखील या संमेलनात भाषण करणार होते. मात्र, सुरक्षा कारणांमुळे त्यांनी भाषण रद्द केले. अब्दुल्ला यांनी एक तासाच्या चर्चेदरम्यान काश्मीर, भारताचे लक्ष्यभेदी हल्ले, हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुऱ्हाण वनी, पाकसोबतचा तणाव, काश्मिरी पंडितांची स्थिती तसेच कलम ३७० सह विविध विषयांना हात घातला. (वृत्तसंस्था)...तर दबाव वाढला असता!उरी हल्ल्यानंतर आपण काय केले हे भारत सरकारने अत्यंत सावधपणे सांगितले. लक्ष्यभेदी हल्ला (सर्जिकल स्ट्राईक) नियंत्रण रेषेजवळ करण्यात आलेली दहशतवादविरोधी मोहीम होती, असे भारताने जगाला सांगितले. आपले लष्कर ताबा रेषेपलीकडे पाकव्याप्त काश्मिरात किती दूरपर्यंत गेले आणि या हल्ल्यात किती लोक ठार झाले याची माहिती सरकारने दिली नाही. भारत सरकारने याची माहिती दिली असती तरी पाकचे नवाज शरीफ यांच्यावर प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याचा मोठा दबाव असता. भारत व पाकमधील वाढलेल्या तणावामुळे खोऱ्यात निराशा पसरते. उभय देशांतील संबंधातील तणावाचा इतर कोणत्याही राज्यावर जम्मू आणि काश्मीरएवढा परिणाम होत नाही. काश्मीर ही राजकीय समस्या असून, त्यावर राजकीय तोडगाच काढला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.