शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
6
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
7
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
9
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
10
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
11
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
12
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
13
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
14
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
15
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
16
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
17
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
18
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
19
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
20
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

भारत-पाक युद्ध असंभव!

By admin | Updated: October 23, 2016 01:21 IST

नियंत्रण रेषेवरील तणाव वाढला असतानाही भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर नाहीत. दोन्ही देश युद्धाच्या शक्यतेबाबत अधिक सावध आहेत, असे जम्मू

न्यूयॉर्क : नियंत्रण रेषेवरील तणाव वाढला असतानाही भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर नाहीत. दोन्ही देश युद्धाच्या शक्यतेबाबत अधिक सावध आहेत, असे जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी येथे सांगितले. ‘भारत आणि पाकिस्तान : एक उपखंडीय प्रकरण’ या विषयावरील संमेलनात ते बोलत होते. उपखंडावर युद्धाचे ढग घोंगावत असल्याचे मानणाऱ्यांपैकी मी नाही. आमच्या काही वृत्तवाहिन्या दोन्ही देश युद्धाच्या शक्यतेबाबत सावध असल्याचे पाहू इच्छितात. मला वाटते की, भारत व पाकमधील सरकारे त्याहून कितीतरी अधिक सावध आहेत, असे ते म्हणाले. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या संमेलनाचे आयोजन केले. पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष जन. परवेझ मुशर्रफ हेदेखील या संमेलनात भाषण करणार होते. मात्र, सुरक्षा कारणांमुळे त्यांनी भाषण रद्द केले. अब्दुल्ला यांनी एक तासाच्या चर्चेदरम्यान काश्मीर, भारताचे लक्ष्यभेदी हल्ले, हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुऱ्हाण वनी, पाकसोबतचा तणाव, काश्मिरी पंडितांची स्थिती तसेच कलम ३७० सह विविध विषयांना हात घातला. (वृत्तसंस्था)...तर दबाव वाढला असता!उरी हल्ल्यानंतर आपण काय केले हे भारत सरकारने अत्यंत सावधपणे सांगितले. लक्ष्यभेदी हल्ला (सर्जिकल स्ट्राईक) नियंत्रण रेषेजवळ करण्यात आलेली दहशतवादविरोधी मोहीम होती, असे भारताने जगाला सांगितले. आपले लष्कर ताबा रेषेपलीकडे पाकव्याप्त काश्मिरात किती दूरपर्यंत गेले आणि या हल्ल्यात किती लोक ठार झाले याची माहिती सरकारने दिली नाही. भारत सरकारने याची माहिती दिली असती तरी पाकचे नवाज शरीफ यांच्यावर प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याचा मोठा दबाव असता. भारत व पाकमधील वाढलेल्या तणावामुळे खोऱ्यात निराशा पसरते. उभय देशांतील संबंधातील तणावाचा इतर कोणत्याही राज्यावर जम्मू आणि काश्मीरएवढा परिणाम होत नाही. काश्मीर ही राजकीय समस्या असून, त्यावर राजकीय तोडगाच काढला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.