शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

भारत-पाक युद्ध असंभव!

By admin | Updated: October 23, 2016 01:21 IST

नियंत्रण रेषेवरील तणाव वाढला असतानाही भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर नाहीत. दोन्ही देश युद्धाच्या शक्यतेबाबत अधिक सावध आहेत, असे जम्मू

न्यूयॉर्क : नियंत्रण रेषेवरील तणाव वाढला असतानाही भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर नाहीत. दोन्ही देश युद्धाच्या शक्यतेबाबत अधिक सावध आहेत, असे जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी येथे सांगितले. ‘भारत आणि पाकिस्तान : एक उपखंडीय प्रकरण’ या विषयावरील संमेलनात ते बोलत होते. उपखंडावर युद्धाचे ढग घोंगावत असल्याचे मानणाऱ्यांपैकी मी नाही. आमच्या काही वृत्तवाहिन्या दोन्ही देश युद्धाच्या शक्यतेबाबत सावध असल्याचे पाहू इच्छितात. मला वाटते की, भारत व पाकमधील सरकारे त्याहून कितीतरी अधिक सावध आहेत, असे ते म्हणाले. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या संमेलनाचे आयोजन केले. पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष जन. परवेझ मुशर्रफ हेदेखील या संमेलनात भाषण करणार होते. मात्र, सुरक्षा कारणांमुळे त्यांनी भाषण रद्द केले. अब्दुल्ला यांनी एक तासाच्या चर्चेदरम्यान काश्मीर, भारताचे लक्ष्यभेदी हल्ले, हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुऱ्हाण वनी, पाकसोबतचा तणाव, काश्मिरी पंडितांची स्थिती तसेच कलम ३७० सह विविध विषयांना हात घातला. (वृत्तसंस्था)...तर दबाव वाढला असता!उरी हल्ल्यानंतर आपण काय केले हे भारत सरकारने अत्यंत सावधपणे सांगितले. लक्ष्यभेदी हल्ला (सर्जिकल स्ट्राईक) नियंत्रण रेषेजवळ करण्यात आलेली दहशतवादविरोधी मोहीम होती, असे भारताने जगाला सांगितले. आपले लष्कर ताबा रेषेपलीकडे पाकव्याप्त काश्मिरात किती दूरपर्यंत गेले आणि या हल्ल्यात किती लोक ठार झाले याची माहिती सरकारने दिली नाही. भारत सरकारने याची माहिती दिली असती तरी पाकचे नवाज शरीफ यांच्यावर प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याचा मोठा दबाव असता. भारत व पाकमधील वाढलेल्या तणावामुळे खोऱ्यात निराशा पसरते. उभय देशांतील संबंधातील तणावाचा इतर कोणत्याही राज्यावर जम्मू आणि काश्मीरएवढा परिणाम होत नाही. काश्मीर ही राजकीय समस्या असून, त्यावर राजकीय तोडगाच काढला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.