शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भारत-पाक चर्चा लांबणीवर

By admin | Updated: January 15, 2016 04:49 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबूलहून परतताना अचानक लाहोरला जाऊन भारत व पाकिस्तान यांच्यातील गेले वर्षभर ठप्प झालेला द्विपक्षीय संवाद पुन्हा सुरू होण्यासाठी तयार केलेली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबूलहून परतताना अचानक लाहोरला जाऊन भारत व पाकिस्तान यांच्यातील गेले वर्षभर ठप्प झालेला द्विपक्षीय संवाद पुन्हा सुरू होण्यासाठी तयार केलेली अनुकूल पृष्ठभूमी पठाणकोट हवाईदल तळावरील दहशतवादी हल्ल्यामुळे कलुषित होऊ न देण्याची प्रगल्भता गुरुवारी उभय देशांनी दाखविली. आधी ठरलेल्या कार्यक्रमानुसार भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर त्यांच्या पाकिस्तानी समकक्ष अधिकाऱ्याशी चर्चेसाठी शुक्रवारी इस्लामाबादला जाणार होते. परंतु पठाणकोट हल्ल्यामागील ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेच्या विरोधात पाकिस्तान सरकारने सुरू केलेल्या कारवाईचे ठोस फलित समोर येईपर्यंत तूर्तास ही बोलणी पुढे ढकलण्याचा निर्णय दोन्ही देशांनी परस्पर सहमतीने घेतला.शुक्रवारची नियोजित चर्चा पुढे ढकलण्यात आल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सकाळी प्रथम जाहीर केले. सायंकाळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही यास दुजोरा दिला व चर्चेचे नवे वेळापत्रक ठरविण्यासाठी दोन्ही देश परस्परांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले. एवढेच नव्हे, तर पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी विशेष तपासी पथक (एटीएस) पाठविण्याचा पाकिस्तानचा प्रस्तावही भारताने मान्य केला. पाकिस्तानच्या या तपासी पथकाला हरतऱ्हेचे सहकार्य देण्यात येईल, असेही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी स्पष्ट केले. मात्र ‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहर यास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याच्या पाकिस्तानी प्रसिद्धिमाध्यमांनी बुधवारी दिलेल्या दोन्ही सरकारांकडून दुजोरा न मिळाल्याने मसूदविषयीची अनिश्चितता कायम राहिली. किंबहुना मसूदला जेरबंद करण्यात पाकिस्तान कितपत गंभीर आहे, हे स्पष्ट न झाल्यानेच नियोजित चर्चेसाठी आणखी थोडे दिवस थांबण्याचे भारताने ठरविले असावे, असे माहीतगार सूत्रांना वाटते.परराष्ट्र सचिव जयशंकर व पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी एकमेकांशी बोलले. उभय देशांतील चर्चेचा कार्यक्रम ‘अगदी नजीकच्या भविष्यात’ निश्चित केला जाईल, असे त्यांनी ठरविले. (लोकमत न्यूज नेटवर्क)शुक्रवारची नियोजित चर्चा पुढे ढकलण्यात आल्याचे पाकिस्तानने गुरुवारी सकाळी प्रथम जाहीर केले. सायंकाळी भारतानेही यास दुजोरा दिला.टोकाची भूमिका टाळलीपठाणकोट हल्ल्यात हात असल्याच्या संशयावरून पाकिस्तानने ‘जैश-ए-महंमद’ या दहशतवादी संघटनेच्या डझनभर लोकांना स्थानबद्ध केल्याचे भारताने स्वागत केले आहे. प्रत्यक्ष कारवाई हवी असल्यामुळे पोकळ निवेदने उपयोगाची नाहीत यावर भारताने भर दिला होता. त्यानंतर जैश-ए-महंमदवर झालेली कारवाई ही ‘महत्त्वाचे आणि सकारात्मक पहिले पाऊल’ असल्याचे भारताने म्हटले. पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानी घटक सहभागी नाहीत, असे म्हणत या वेळी पाकिस्तानने अंग झटकले नाही. तसेच भारताने आपल्या बाजूने चर्चा रद्दही केली नाही. यापूर्वी या दोन्ही देशांकडून ज्या गोष्टी घडल्या त्या या वेळी टाळल्या गेल्या.पाकची कारवाई सकारात्मकपरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘‘पठाणकोट तळावरील हल्ल्यासंदर्भात पाकिस्तान सरकारने बुधवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्या हल्ल्याशी संबंधित असलेल्या दहशतवादी तत्त्वांच्या चौकशीत ‘महत्त्वाची प्रगती’ झाली असल्याचे कळविण्यात आले आहे.’’ जैश-ए-महंमदविरोधात करण्यात आलेली कारवाई हे सकारात्मक पहिले पाऊल आहे. जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अजहर याला स्थानबद्ध करण्यात आल्याचे वृत्त बुधवारी पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिले व तेच भारतीय प्रसारमाध्यमांनीही दिले; मात्र हे वृत्त खोटे ठरले. परंतु भारताने चर्चेचा मुद्दा या स्थानबद्धतेशी जोडला नाही.पाकिस्तान एअरलाइन्सच्या कार्यालयाची नासधूसनवी दिल्ली : बाराखंबा मार्गावरील पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (पीआयए) कार्यालयावर गुरुवारी उजव्या संघटनेच्या एका गटाने हल्ला केला. दुपारी ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. पोलीस उपायुक्त (नवी दिल्ली) जतीन नरवाल यांनी या घटनेला दुजोरा देत योग्य कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. गेल्या वर्षी एका इसमाने दिल्लीतील केरळ हाउसमध्ये गोमांस वाढले जात असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर खळबळ उडाली होती. राजकीय पातळीवरही या प्रकरणाची चर्चा झाली होती. त्याच व्यक्तीशी संबंधित काही लोकांनी पीआयएच्या कार्यालयात धुडगूस घातल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले.