शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

भारत -चीन सीमा वाद का ताणला जातोय?

By admin | Updated: July 12, 2017 04:14 IST

भारत आणि चीनने भूतकाळात अनेकदा सीमेसंबंधी मुद्दे सोडविलेले आहेत.

सिंगापूर : भारत आणि चीनने भूतकाळात अनेकदा सीमेसंबंधी मुद्दे सोडविलेले आहेत. पण यावेळेस हा प्रश्न का सोडवू शकत नाहीत याचे कोणतेही कारण सांगता येणार नाही, असे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी बोलून दाखवले. ‘इंडिया -आसियान अँड द चेंजिंग जियोपॉलिटिक्स’विषयावर व्याख्यान देताना जयशंकर म्हणाले की, ही सीमा अतिशय दूरपर्यंत पसरलेली आहे.. जमिनी स्तरावर सीमेबाबत सहमती झालेली नाही. त्यामुळे असे मतभेद होऊ शकतात. हे मतभेद यंदाच प्रथम झाले नसून, यापूर्वीही ते झाले होते. भूतान, भारत आणि चीन यांच्या सीमेजवळ डोकलाम भागात चिनी सैन्याने रस्त्याचे काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तीन आठवड्यांपासून या भागात दोन देशात तणाव निर्माण झाला आहे. भूतान या भागाला डोकलाम म्हणून ओळखते. या भागाचे भारतीय नाव डोका ला असून चीन याला डोंगलांग म्हणते. भारत आणि चीन यांच्यात जम्मू - काश्मीर ते अरुणाचल प्रदेशपर्यंत ३,४८८ किमी लांब सीमा आहे. यातील २२० किमीचे क्षेत्र सिक्किममध्ये येते. जयशंकर म्हणाले की, भारत -चीन संबंधात सुधारणा झाल्यास याचा असियान आणि आशिया प्रशांत क्षेत्र आणि जागतिक पातळीवरही थेट परिणाम होईल. दोन महाशक्ती असून त्यांच्यात काही मुद्यावरुन वाद असू शकतात. या देशांना दीर्घ इतिहास आहे. अलिकडच्या काळातील इतिहास मात्र खडतर आहे. भारत-चीन संबंध एका उंचीपर्यंत पोहचलेले असल्यामुळे यातून फार काही गंभीर प्रश्न निर्माण होईल, असे वाटत नाही. >भारतात होत असलेल्या परिवर्तनाचाही जयशंकर यांनी आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, पायाभूत सुविधा वाढविल्या जात आहेत. भारतातील अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. व्यापार करणे अधिक सोपे करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या व्याख्यानाचे आयोजन ली कुआन यिऊ स्कूल आॅफ पब्लिक पॉलिसी आणि भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने केले होते.