शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

इंदिरा गांधींचा पाकच्या अणुकेंद्रांवर हल्ल्याचा होता विचार

By admin | Updated: September 1, 2015 09:02 IST

१९८० मध्ये सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानच्या अणुभट्ट्यांवर लष्करी हल्ल्यांचा विचार केला होता. अमेरिकन गुप्तचर संघटना

वॉशिंग्टन : १९८० मध्ये सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानच्या अणुभट्ट्यांवर लष्करी हल्ल्यांचा विचार केला होता. अमेरिकन गुप्तचर संघटना सीआयएच्या एका गोपनीय दस्तावेजातून ही माहिती समोर आली आहे. अमेरिका ‘एफ-१६’ ही लढाऊ विमाने पाकिस्तानला देण्याच्या तयारीत असताना इंदिरा गांधी यांनी हल्ल्याचा विचार केला होता, असे सीआयएच्या ८ सप्टेंबर १९८१ रोजीच्या एका अहवालात म्हटले आहे. ‘पाकमधील आण्विक घडामोडींना भारताचे प्रत्युत्तर’ असे शीर्षक असलेल्या या १२ पानी अहवालाचा संपादित भाग गेल्या जूनमध्ये सीआयएच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला होता. त्यानुसार, अण्वस्त्र आघाडीवरील पाकच्या प्रगतीमुळे १९८१ मध्ये गांधींच्या नेतृत्वाखालील सरकार चिंताक्रांत झाले होते. पाक अणुबॉम्बपासून केवळ काही पावलेच दूर असल्याची त्यांची खात्री झाली होती व अमेरिकेचाही तोच अंदाज होता. पुढील दोन किंवा तीन महिन्यांत भारताची चिंता आणखी वाढल्यास पाकची अणुकेंद्रे उद्ध्वस्त करण्यासाठी लष्करी हल्ल्याचा निर्णय इंदिरा गांधींनी घ्यावा अशी स्थिती निर्माण होईल, असे यात म्हटले होते. सीआयच्या अहवालात म्हटले आहे की, पाकच्या अणुस्फोटाचा राष्ट्रीय सुरक्षेला धोका होणार नाही, असा निष्कर्ष काढून शांततापूर्ण अणुचाचणी कार्यक्रम सुरू केल्यामुळे क्षेत्रातील भारताच्या प्रतिमेचे नुकसान कमी केले जाऊ शकते, अशी भूमिका भारताने घेतल्याचे दिसते.अहवालात म्हटले आहे की, गांधी यांनी कदाचित पाकविरुद्ध लष्करी पर्याय न वापरण्याचा निर्णय घेतला असावा. पाकला एफ १६ लढाऊ विमाने देण्यावरून भारताची चिंता वाढल्यास गांधी यांच्यासाठी संभाव्य आपत्कालीन हल्ल्याची योजना अमलात आणण्यासाठीची स्थिती उत्पन्न होईल, असे वाटते; मात्र भारत थांबा आणि वाट पाहाचे धोरण अवलंबेल, असा आमचा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)