शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

संस्कृतीने दिलेली स्वतंत्र ओळख म्हणजेच देशीवाद (२)

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

स्मरणसंचित संपणे हीच भाषा मृत होण्याची लक्षणे : गणेश देवी

स्मरणसंचित संपणे हीच भाषा मृत होण्याची लक्षणे : गणेश देवी
१९ व्या शतकात उदारीकरणाच्या सपाट्यात परंपरा वाईट आणि जुनाट असल्याचे वारे वाहिले. आधुनिकता म्हणजे चंगळवाद, उपभोग असा विचार लादला गेला आणि लोकांचे विचार व आवडीनिवडी बदलण्याचाच प्रयत्न झाला. यात दिग्भ्रमितता वाढली. जगातील सहा हजार भाषांपैकी चार हजार भाषा सध्या संपण्याच्या मार्गावर आहेत कारण त्या भाषांमध्ये भूतकाळ दर्शविणाऱ्या वाक्यांची विविधता नष्ट होते आहे. भाषेतून भूतकाळ समर्थपणे सांगता येत नाही आणि स्मरणसंचित सांभाळण्यात भाषा अपयशी ठरते तेव्हा ती मृतप्राय होते. भाषिक व्यवहार ठप्प पडले की त्या भाषेत जगणे कठीण होते आणि लोक जगण्यासाठी इतर भाषा आत्मसात करतात. त्यामुळेच भाषेला भूतकाळ सांभाळता आला पाहिजे, असे गणेशदेवी म्हणाले. परकीय आक्रमणानंतर वसाहतवादातून आलेले साहित्य असा समज झाला आणि दुसरीकडे राष्ट्र या संकल्पनेची निर्मिती या दोन जखमा झाल्या. राष्ट्र म्हणजे एक भाषा, एक धर्म, एक संस्कृती ही कल्पना युरोपात आली. त्याप्रमाणेच भारतातही एक भाषा लादण्याचा प्रयत्न झाला पण अखेर १४ भारतीय भाषांना राष्ट्रीय भाषा म्हणून जाहीर करावे लागले. वसाहतवादाचे साहित्य आणि राष्ट्र संकल्पनेच्या या दोन जखमातून बाहेर पडल्याशिवाय आपण सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकणार नाही. हा शोध सुरूच राहील, असे ते म्हणाले. रंगनाथ पठारे यांनी बीजभाषणातून देशीवाद आणि काही आव्हानांचा उहापोह करताना संपूर्ण चर्चेचे आयाम काय असू शकतात, याचे सूतोवाच केले. देशीवाद आधुनिकीकरणाला विरोध करणारा नाही पण देशी स्वरूप आत्मसात करणारा असावा, असे ते म्हणाले. प्रास्ताविक अक्षयकुमार काळे, स्वागतभाषण कृष्णा किंबहुने आणि संचालन कोमल ठाकरे यांनी केले. आभार शैलेंद्र लेंडे यांनी मानले. चर्चासत्रापूर्वी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी भालचंद्र नेमाडे यांचा सत्कार केला. याप्रसंगी गिरीश गांधी, प्रमोद मुनघाटे, श्याम धोंड प्रामुख्याने उपस्थित होते.