शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

‘उपवर’ एअर इंडियाला इंडिगोने घातली मागणी

By admin | Updated: June 30, 2017 00:30 IST

गेली १० वर्षे सतत तोट्यात असलेल्या आणि डोक्यावर ५२ हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर असलेल्या एअर इंडिया या देशाच्या राष्ट्रीय

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गेली १० वर्षे सतत तोट्यात असलेल्या आणि डोक्यावर ५२ हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर असलेल्या एअर इंडिया या देशाच्या राष्ट्रीय विमान कंपनीत आणखी पैसे न ओतता तिचे खासगीकरण करण्यास तत्त्वत: मंजुरी देताच ही कंपनी घेण्यास ग्राहक यायला सुरुवात झाली आहे. ‘इंडिगो’ या खासगी कंपनीने एअर इंडिया विकत घेण्यास आपल्याला स्वारस्य असल्याचे सरकारला औपचारिकपणे कळविले आहे.मध्यंतरी टाटा उद्योग समूहाने एअर इंडिया खरेदीच्या दृष्टीने प्राथमिक व अनौपचारिक चाचपणी सुरू केल्याचे वृत्त आले होते. परंतु खासगीकरणाचा निर्णय झाल्यानंतर त्यासाठी औपचारिक स्वारस्य प्रस्ताव देणारी ‘इंडिगो’ ही पहिलीच खासगी कंपनी आहे. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले की, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी एअर इंडियात स्वारस्य असल्याचे कळविले होते. परंतु सरकारने बोली मागविण्याआधीच औपचारिक स्वारस्य प्रस्ताव देणारी इंडिगो ही पहिली खासगी कंपनी आहे. एअर इंडियाला चांगले बाजारमूल्य आहे व ती घ्यायला अनेक ग्राहक पुढे येतील, असा विश्वास नागरी विमान वाहतूक सचिव आर. एन. चौबे यांनी व्यक्त केला. इंडिगो कंपनीने मात्र याविषयी काहीही भाष्य केले नाही. कंपनीचा प्रवक्ता म्हणाला की, सध्या आमचा मौनकाळ सुरू असल्याने आमच्याकडून काहीही प्रतिक्रिया नाही.नाव कायम राहणार? सरकारच ठेवू शकते तशी अट - खासगीकरण झाले तरी ‘एअर इंडिया’ हेच नाव कायम राहावे, अशी सरकारची इच्छा दिसते. राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले की, मालकी बदलली तरी एक ब्रँड म्हणून ‘एअर इंडिया’ हेच नाव नव्या मालकानेही कायम ठेवणे धंद्याच्या व भावनिकदृष्ट्याही श्रेयस्कर ठरेल.सचिव चौबे म्हणाले की, सरकार कदाचित सौदा करताना कंपनीचे नाव कायम ठेवण्याची अट घालण्याचा विचार करू शकेल.बदनामी थांबवा, अन्यथा कारवाई-एअर इंडियाच्या माजी कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांवर एअर इंडियाविरोधात बोलणे न थांबवल्यास त्यांचे निवृत्तीनंतरचे लाभ काढून घेण्यासारखे गंभीर परिणाम होतील, असा इशारा कंपनीने दिला आहे. कर्जाखाली दबलेल्या एअर इंडियाच्या खासगीकरणाचा निर्णय तत्त्वत: घेतला आहे. त्यामुळे कर्मचारी व सेवानिवृत्तांसमोर अनिश्चित भवितव्य उभे ठाकले आहे.कंपनीचे खासगीकरण झाल्यास मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली जातील, अशी धमकी सात कर्मचारी संघटनांनी सरकारला दिली आहे. एअर इंडियाचे खासगीकरण हा निर्णय सोपा नव्हता, पण नाइलाजाने सरकारला तो घ्यावा लागला. ही कंपनी बंद होणे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हितावह नाही व नीट चालविली तर ही कंपनी पुन्हा महान होऊ शकते.- अशोक गजपती राजू, नागरी विमान वाहतूकमंत्री