शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाच पाकिस्तानी सैनिक ठार

By admin | Updated: June 1, 2017 16:45 IST

जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 1 - जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भीमबेर आणि बट्टल सेक्टरमध्ये करण्यात आलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाच पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत, तर सहा ते सात सैनिक जखमी झाले आहेत. भारताने केलेल्या कारवाईनंतर भेदरलेल्या पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त जे पी सिंह यांच्याशी संपर्क साधला आहे. 
 
राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रणं रेषेवर असणा-या चौक्यांवर पाकिस्तानने गुरुवारी मोर्टारने हल्ला करत, गोळीबारी करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. हल्ल्यात जनरल इंजिनिअरिंग रिझर्व्ह फोर्सचा एक कर्मचारी मारला गेला, तर दोघेजण जखमी झाले होते. जखमींमध्ये बीएसएफचा एक जवानही सामील होता. यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. 
 
लष्कराचे प्रवक्ता लेफ्टनंत कर्नल मनीष मेहता यांनी सांगितलं की, "पाकिस्तानी लष्कराने सकाळी साडे सात वाजता राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर मोर्टारने हल्ला करत गोळीबारदेखील केला". पाकिस्तानी सैनिकांनी सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील कृष्णाघाटी सेक्टरमध्येही गोळाबार केला असल्याचं त्यांनी सांगितलं. नियंत्रण रेषेवर बालनोई आणि मानकोट सेक्टरमध्येही गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. 
 
यावर्षी मे महिन्यात पाकिस्तानी सैन्यांनी केलेल्या फायरिंगचा फटका 12 हजार लोकांना बसल्याचं कळत आहे. 17 मे रोजी पाकिस्तानी सैन्यांनी राजौरी जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर हल्ला केला होता. 15-16 मे रोजी राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराने सेनेच्या रहिवासी ठिकाणांवर तोफा डागल्या होत्या. तसंच 13 मे रोजी पाकिस्तानने रहिवासी परिसर आणि मुख्य चौक्यांवर केलेल्या हल्ल्यात दोन सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर तिघे जखमी झाले होते.