शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

हवा प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंमध्ये भारत दुस-या क्रमांकावर

By admin | Updated: February 15, 2017 08:38 IST

स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2017 ने यासंबंधी आकडेवारी जाहीर केली असून चीन पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर भारताचा क्रमांक आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - भारतातील हवा प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. हवा प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंमध्ये भारत दुस-या क्रमांकावर आहे. स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2017 ने यासंबंधी आकडेवारी जाहीर केली असून चीन पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर भारताचा क्रमांक आहे. भारतात गतवर्षी प्रदूषणामुळे तब्बल 2 लाख 54 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे फक्त चीन आणि भारतातील मृतांचा आकडा जगभरातल्या आकडेवारीच्या अर्ध्याहून जास्त आहे.
 
वाढत्या प्रदूषणामुळे ओझोन वायू निर्माण होत असून श्वसनेंदियांचे रोग जडत आहेत. गतवर्षी दिवाळीत दिल्ली आणि एनसीआर परिसरात पसरलेली प्रदूषणाची चादर यामुळे ही समस्या किती जठील झाली आहे याची प्रचिती आली होती. ओझोन वायूमुळे होणा-या मृत्यूंचा आकडा भारतात जास्त आहे. भारताचा हा आकडा बांगलादेशच्या 13  तर पाकिस्तानच्या 21 पट जास्त आहे. 
 
जगातील 92 टक्के लोकसंख्या ही अशुद्ध हवेत जगत असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. 'जगभरात हवा प्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे. या नव्या अहवालामुळे वेळेआधीच मृत्यू होण्यामध्ये हवा प्रदूषणाचा किती हात आहे हे लक्षात येतं', असं हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूटचे संचालक डॅन ग्रीनबॉम यांनी सांगितलं आहे.