शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

प्रदूषण नियंत्रणातील भारताची जबाबदारी वाढली

By admin | Updated: April 26, 2017 01:00 IST

जागतिक वसुंधरा दिवस २२ एप्रिल रोजी होता. गेल्या ४७ वर्षांपासून प्रदूषणापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी हा दिन पाळला जातो

नवी दिल्ली : जागतिक वसुंधरा दिवस २२ एप्रिल रोजी होता. गेल्या ४७ वर्षांपासून प्रदूषणापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी हा दिन पाळला जातो; परंतु प्रदूषण कमी न होता वाढत जात आहे. जलवायू प्रदूषणामुळे तर हे संकट आणखी भयावह होत आहे. परिस्थिती अशी बनली आहे की, स्वत:ला वाचवण्याच्या संघर्षाचे नावच वसुंधरा दिन झाले आहे. आम्ही आताच जागे झालो नाही, तर येणारा काळ सर्वनाशाचा असेल व त्याला फक्त आम्हीच जबाबदार असू. आज जगाचे सरासरी तापमान १.५ अंशाने वाढले आहे. दिल्लीतील एप्रिल महिन्यातील सरासरी तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षाही जास्त झाले आहे. वाढती औद्योगिक उत्पादने, कोणतेही बंधन नसलेली विकास कामे, इंधन व गॅसच्या वाढत्या वापरामुळे भारत कार्बन उत्सर्जनात जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हिमालय आणि हिमनद्या वितळत असल्यामुळे नैसर्गिक दुर्घटनांत वाढ होण्याची भीती आहे. कार्बन उत्सर्जनात अमेरिका पहिल्या, तर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. भारतात वाहनांची संख्या व कार्बन उत्सर्जनाचा वेग पाहता भारत अमेरिका व चीनच्या स्पर्धेत येऊ शकतो. पर्यावरण असंतुलनामुळे जलवायू परिवर्तन तर होतच आहे, शिवाय कृषी उत्पादन आणि आरोग्यावरही परिणाम होत आहे. भारतात २५ वर्षांपूर्वी आर्थिक उदारीकरण सुरू झाल्यापासून आर्थिक व औद्योगिक घडामोडींनी वेग घेतला आहे त्याचा परिणाम पर्यावरणावर झाला आहे. भारताने दोन आॅक्टोबर २०१६ रोजी जलवायू परिवर्तन करारावर स्वाक्षरी केली त्यामुळे त्याची जबाबदारी आता खूप वाढली आहे.