शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

प्रदूषण नियंत्रणातील भारताची जबाबदारी वाढली

By admin | Updated: April 26, 2017 01:00 IST

जागतिक वसुंधरा दिवस २२ एप्रिल रोजी होता. गेल्या ४७ वर्षांपासून प्रदूषणापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी हा दिन पाळला जातो

नवी दिल्ली : जागतिक वसुंधरा दिवस २२ एप्रिल रोजी होता. गेल्या ४७ वर्षांपासून प्रदूषणापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी हा दिन पाळला जातो; परंतु प्रदूषण कमी न होता वाढत जात आहे. जलवायू प्रदूषणामुळे तर हे संकट आणखी भयावह होत आहे. परिस्थिती अशी बनली आहे की, स्वत:ला वाचवण्याच्या संघर्षाचे नावच वसुंधरा दिन झाले आहे. आम्ही आताच जागे झालो नाही, तर येणारा काळ सर्वनाशाचा असेल व त्याला फक्त आम्हीच जबाबदार असू. आज जगाचे सरासरी तापमान १.५ अंशाने वाढले आहे. दिल्लीतील एप्रिल महिन्यातील सरासरी तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षाही जास्त झाले आहे. वाढती औद्योगिक उत्पादने, कोणतेही बंधन नसलेली विकास कामे, इंधन व गॅसच्या वाढत्या वापरामुळे भारत कार्बन उत्सर्जनात जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हिमालय आणि हिमनद्या वितळत असल्यामुळे नैसर्गिक दुर्घटनांत वाढ होण्याची भीती आहे. कार्बन उत्सर्जनात अमेरिका पहिल्या, तर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. भारतात वाहनांची संख्या व कार्बन उत्सर्जनाचा वेग पाहता भारत अमेरिका व चीनच्या स्पर्धेत येऊ शकतो. पर्यावरण असंतुलनामुळे जलवायू परिवर्तन तर होतच आहे, शिवाय कृषी उत्पादन आणि आरोग्यावरही परिणाम होत आहे. भारतात २५ वर्षांपूर्वी आर्थिक उदारीकरण सुरू झाल्यापासून आर्थिक व औद्योगिक घडामोडींनी वेग घेतला आहे त्याचा परिणाम पर्यावरणावर झाला आहे. भारताने दोन आॅक्टोबर २०१६ रोजी जलवायू परिवर्तन करारावर स्वाक्षरी केली त्यामुळे त्याची जबाबदारी आता खूप वाढली आहे.