शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

प्रदूषण नियंत्रणातील भारताची जबाबदारी वाढली

By admin | Updated: April 26, 2017 01:00 IST

जागतिक वसुंधरा दिवस २२ एप्रिल रोजी होता. गेल्या ४७ वर्षांपासून प्रदूषणापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी हा दिन पाळला जातो

नवी दिल्ली : जागतिक वसुंधरा दिवस २२ एप्रिल रोजी होता. गेल्या ४७ वर्षांपासून प्रदूषणापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी हा दिन पाळला जातो; परंतु प्रदूषण कमी न होता वाढत जात आहे. जलवायू प्रदूषणामुळे तर हे संकट आणखी भयावह होत आहे. परिस्थिती अशी बनली आहे की, स्वत:ला वाचवण्याच्या संघर्षाचे नावच वसुंधरा दिन झाले आहे. आम्ही आताच जागे झालो नाही, तर येणारा काळ सर्वनाशाचा असेल व त्याला फक्त आम्हीच जबाबदार असू. आज जगाचे सरासरी तापमान १.५ अंशाने वाढले आहे. दिल्लीतील एप्रिल महिन्यातील सरासरी तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षाही जास्त झाले आहे. वाढती औद्योगिक उत्पादने, कोणतेही बंधन नसलेली विकास कामे, इंधन व गॅसच्या वाढत्या वापरामुळे भारत कार्बन उत्सर्जनात जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हिमालय आणि हिमनद्या वितळत असल्यामुळे नैसर्गिक दुर्घटनांत वाढ होण्याची भीती आहे. कार्बन उत्सर्जनात अमेरिका पहिल्या, तर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. भारतात वाहनांची संख्या व कार्बन उत्सर्जनाचा वेग पाहता भारत अमेरिका व चीनच्या स्पर्धेत येऊ शकतो. पर्यावरण असंतुलनामुळे जलवायू परिवर्तन तर होतच आहे, शिवाय कृषी उत्पादन आणि आरोग्यावरही परिणाम होत आहे. भारतात २५ वर्षांपूर्वी आर्थिक उदारीकरण सुरू झाल्यापासून आर्थिक व औद्योगिक घडामोडींनी वेग घेतला आहे त्याचा परिणाम पर्यावरणावर झाला आहे. भारताने दोन आॅक्टोबर २०१६ रोजी जलवायू परिवर्तन करारावर स्वाक्षरी केली त्यामुळे त्याची जबाबदारी आता खूप वाढली आहे.