शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील शक्तीशाली भूकंप

By admin | Updated: April 28, 2015 00:00 IST

महाराष्ट्रातील कोयनेच्या खोऱ्यात ११ डिसेंबर १९६७ रोजी हा भूकंप झाला. त्याची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. त्यात १८0 लोक ठार झाले. २५ कि.मी.च्या पट्ट्यात भूकंपाने विनाश घडवून आणला होता. कोयना खोरे महाराष्ट्रातील सर्वाधिक भूकंपप्रवण असून तेथे सातत्याने भूकंप होत असतात. येथील सर्वांत ताजा भूकंप १४ एप्रिल २0१४ रोजी झाला ...

महाराष्ट्रातील कोयनेच्या खोऱ्यात ११ डिसेंबर १९६७ रोजी हा भूकंप झाला. त्याची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. त्यात १८0 लोक ठार झाले. २५ कि.मी.च्या पट्ट्यात भूकंपाने विनाश घडवून आणला होता. कोयना खोरे महाराष्ट्रातील सर्वाधिक भूकंपप्रवण असून तेथे सातत्याने भूकंप होत असतात. येथील सर्वांत ताजा भूकंप १४ एप्रिल २0१४ रोजी झाला होता.

२0 ऑक्टोबर १९९१ रोजी आलेल्या या भूकंपाचे केंद्र उत्तराखंडमधील गढवालमध्ये होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.८ इतकी होती. त्यात १ हजार लोक ठार झाले. १३00 गावांतील ४२ हजार घरे त्यात उद्ध्वस्त झाली. संपूर्ण उत्तराखंडमध्ये त्यामुळे विनाश झाला.

१२ जून १८९७ रोजी सायंकाळी ५.११ वा. आसाममध्ये भूकंप आला. त्याकाळी तंत्रज्ञान एवढे प्रगत नसल्यामुळे त्याचे केंद्र अज्ञात आहे. त्याची तीव्रता ८.१ रिश्टर स्केल इतकी होती. त्यात १५00 लोक ठार झाले. भारतातील आसामसह तिबेट आणि तत्कालीन ब्रह्मदेश (म्यानमार) या देशांना भूकंपाचा फटका बसला.

१५ ऑगस्ट १९५0 रोजी म्हणजेच ऐन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा भूकंप झाला. सायंकाळी ७.३९ वा. संपूर्ण आसाम आणि तिबेट या भूकंपाने हादरला. याचे केंद्र तिबेटमधील रिमाजवळ होते. त्याची तीव्रता ८.६ रिश्टर स्केल इतकी होती. त्यात १५२६ लोक ठार झाले. भूकंपानंतर लगेच आलेल्या पावसाने आसामात पूरस्थितीही निर्माण केली होती.

३0 सप्टेंबर १९९३ रोजी मध्यरात्री लातूरमध्ये भूकंप झाला. महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील किल्लारीजवळ त्याचे केंद्र होते. त्याची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल इतकी होती. तीव्रता तुलनेने कमी असली तरी नुकसान मात्र खूपच जास्त झाले. ९७४८ लोक ठार झाले. हजारो घरे उद्ध्वस्त झाली. लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यात ही हानी झाली. गणेश उत्सवाच्या समाप्तीच्या दिवशीच हा भूकंप झाला होता.

४ एप्रिल १९0५ रोजी सकाळी ६.१0 वा. आलेल्या या भूकंपात हिमाचल प्रदेशातील कांग्रा भाग उद्ध्वस्त झाला. याचे केंद्र हिमालयात होते. रिश्टर स्केलवर ७.८ इतकी त्याची तीव्रता होती. २0 हजार लोकांचा बळी घेणाऱ्या या भूकंपात १ लाखापेक्षा जास्त घरे उद्ध्वस्त झाली.

२६ जानेवारी २00१ रोजी सकाळी ८.५0 वा. गुजरातमध्ये भूकंप घडला होता. भारतभर प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना गुजरातवर ही आपत्ती कोसळली. कच्छमध्ये त्याचे केंद्र होते. २0 हजार लोक त्यात ठार झाले. हजारो घरे उद्ध्वस्त झाली. जनजीवन पूर्वपदावर यायला ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ लागला.

१५ जानेवारी १९३४ रोजी दुपारी २.१३ वा. झालेल्या या भूकंपाचे केंद्र हिमालयातील एव्हरेस्ट शिखराच्या दक्षिणेला होते. त्याची तीव्रता ८.७ रिश्टर स्केल इतकी होती. भारत आणि नेपाळ अशा दोन्ही देशांत त्याने विध्वंस घडविला. ३0 हजार लोक त्यात मरण पावले. भूकंपग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी महात्मा गांधी तेव्हा बिहारात गेले होते.

८ ऑक्टोबर २00५ रोजी सकाळी ८.५0 वा. झालेल्या या भूकंपाचे केंद्र पाकव्याप्त काश्मिरातील मुजफ्फराबादजवळ होते. त्याची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी होती. १३0000 लोक त्यात ठार झाले. भारतातील काश्मीरमध्ये जीवित हानीचे प्रमाण पाकच्या तुलनेत कमी होते. चीन अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान येथेही नुकसान झाले.

२६ डिसेंबर २00४ रोजी सकाळी ८.५0 वा. इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाजवळ खोल समुद्रात हा भूकंप झाला. त्याची रिश्टर स्केलवरील तीव्रता ९.१ ते ९.३ इतकी होती. भूकंपाने त्सुनामीचे तांडव निर्माण केले. भारतासह इंडोनेशिया थायलंड मालदीव आणि सोमालिया या देशांत मिळून २८३१0६ लोक यात ठार झाले. तसेच भयानक विध्वंस झाला. चेन्नईतील मरिना बीचवर त्सुनामीने विनाश घडवून आणला.