शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

आळशी देशांच्या यादीत भारताचा नंबर

By admin | Updated: July 14, 2017 12:26 IST

भारतीय लोक दिवसाला जास्तीत जास्त 4297 पावलं चालतात

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - चालत जाणार की गाडीने ? असा पर्याय दिला तर अनेकांचं उत्तर गाडी असेल यात काही वाद नाही. अंतर कमी असो वा जास्त अनेकजण चालण्याचा आळस करताना दिसतात. आणि आता तर भारतीय आळशी असल्याचं अधिकृतपणे सिद्ध झालं आहे. 46 देशांत करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये आळशी देशांच्या यादीत भारतानेही आपली नोंद करुन घेतली आहे. भारत या यादीमध्ये 39व्या क्रमांकावर आहे. भारतीय लोक दिवसाला जास्तीत जास्त 4297 पावलं चालतात. 
 
आणखी वाचा
वजन कमी करण्यासाठी चालणे हा उत्तम व्यायाम
 
स्टॅटफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा सर्व्हे केला आहे. जगभरातील 46 देशांमधील सात लाख लोकांना या सर्व्हेत समाविष्ट करण्यात आलं होतं. सर्व्हेत सहभागी झालेल्यांची पावलं मोजण्यासाठी किंवा दिवसाला ते किती चालतात याची नोंद ठेवण्यासाठी स्मार्टफोनमध्ये स्टेप काऊंटर्स अॅप इन्स्टॉल करण्यात आलं होतं. 
 
एका दैनिकात हा सर्व्हे छापण्यात आला आहे. सर्व्हेनुसार चीनमधील नागरिक सर्वात कमी आळशी आहेत. त्यामध्ये विशिष्ट करुन हाँगकाँगमधील लोक जास्तच उत्साही आहेत. येथे लोक दिवसाला किमान 6880 पावलं चालतात. 
 
इंडोनेशिया सर्वात आळशी देश ठरला आहे. दिवसाला किमान 3513 पावलं चालणं आवश्यक असतात. मात्र येथील लोक त्याच्या अर्धी पावलंही चालत नाहीत. जगभरातील किमान आकडा 4961 पावलं इतका आहे. अमेरिकन नागरिक दिवसाला किमान 4774 पावलं चालतात. हाँगकाँग, चीन, युक्रेन आणि जपान यांनी यादीत वरील स्थान पटकावलं असून या देशांमधील नागरिक दिवसाला किमान सहा हजार पावलं चालतात. तर मलेशिया, सौदी अरेबिया आणि इंडोनेशिया यादीमध्ये सर्वात खाली असून येथील नागरिक दिवसाला फक्त 3900 पावलं चालतात. 
 
सर्व्हेतून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त चालतात. भारतीय महिला दिवसाला किमान 3684 पावलं चालतात, तर पुरुषांच्या बाबतीत ही संख्या 4608 आहे. महिला आणि पुरुष दोघांच्या बाबतीत एक गोष्ट मात्र समान आहे, ती म्हणजे जास्तीत जास्त चालण्याने कमी लठ्ठपणा येतो. मात्र महिलांनी आपल्या चालणं बंद केल्यास किंवा कमी केल्यास लठ्ठपणा अतिवेगाने वाढतो. महिलांच्या बाबतीत याचं प्रमाण 232 टक्के आहे. तर पुरुषांच्या बाबतीत 67 टक्के आहे.