शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भारताच्या अण्वस्त्र प्लस हिंदुत्वामुळे बिथरला पाकिस्तान

By admin | Updated: April 1, 2017 15:47 IST

हिंदुत्वाचा अजेंडा असलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर असल्याने पाकिस्तान जास्त चिंतित असल्याचे डॉन दैनिकाने निवृत्त पाकिस्तानी जनरलच्या हवाल्याने म्हटले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. 1 - अणवस्त्राचा पहिला वापर न करण्याच्या आपल्या धोरणावर फेरविचार करण्याचे भारताने संकेत देताच पाकिस्तानी राज्यकर्ते टेंन्शनमध्ये आले आहेत. हिंदुत्वाचा अजेंडा असलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर असल्याने पाकिस्तान जास्त चिंतित असल्याचे डॉन दैनिकाने निवृत्त पाकिस्तानी जनरलच्या हवाल्याने म्हटले आहे. भारताकडून देण्यात आलेले संकेत हा डिवचण्याचा, चिथावणीचा भाग असल्याचे एहसान उल हक या निवृत्त जनरलने सांगितले. ते अजूनही पाकिस्तानच्या अणवस्त्र कार्यक्रमाशी संबंधित आहेत. 
 
मॅसाच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील भारतीय वंशाचे तज्ञ विपिन नारंग यांनी वॉशिंग्टनमध्ये एका सेमिनारमध्ये बोलताना भारताच्या अणवस्त्र वापरा संबंधीच्या  धोरणात बदल झाल्याचे म्हटले होते. पहिला अणवस्त्राचा वापर न करण्याच्या आपल्या मूळ धोरणापासून भारत दूर गेला आहे. पाकिस्तान अणवस्त्र हल्ला करु शकतो असे भारताला वाटले तर, भारत पाकिस्तानला संधी न देता अणवस्त्रांचा वापर करेल असे त्यांनी म्हटले होते. 
 
भारताचा हा हल्ला पारंपारिक पद्धतीचा नसेल असे नारंग यांनी म्हटले होते. अणवस्त्राचा पहिला वापर न करण्याच्या भारताच्या धोरणाबद्दल सुरुवातीपासूनच आम्हाला संशय आहे असे एहसान उल हक यांनी सांगितले. भारत असे संकेत देऊन एकप्रकारे पाकिस्तानच्या अणवस्त्र कार्यक्रमाच्या विश्वासार्हतेला  आव्हान देत आहे असे हक यांनी सांगितले.  "लर्निंग टू लाईव्ह विथ द बॉम्ब, पाकिस्तान 1998-2016" या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना हक यांनी भारताच्या अणवस्त्र धोरणाबद्दल ही विधान केली.