शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

नेपाळमध्ये भारताची विशाल मदत मोहीम

By admin | Updated: April 27, 2015 00:48 IST

भूकंपानंतर नेपाळमध्ये मदत आणि बचाव अभियानाला गती देत भारताने रविवारी दोन डझनहून अधिक विमाने आणि हेलीकॉप्टरसह सुमारे १,००० प्रशिक्षित

नवी दिल्ली : भूकंपानंतर नेपाळमध्ये मदत आणि बचाव अभियानाला गती देत भारताने रविवारी दोन डझनहून अधिक विमाने आणि हेलीकॉप्टरसह सुमारे १,००० प्रशिक्षित कर्मचारी सेवेत दाखल केले आहेत. नेपाळमधील स्थिती ‘अत्यंत गंभीर’ असल्याचे भारताने म्हटले आहे.भूकंपानंतर नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. परदेशी नागरिकांसाठी सद्भावना व्हिसा सुविधा जारी करण्यात आली आहे. पीडितांना हवाई मार्गासह रस्ते मार्गाने काढण्यासाठी बसेस आणि रूग्णवाहिकांचीही मदत घेतली जात आहे. शनिवारी १,००० लोकांना हवाई मार्गे बाहेर काढण्यात आले.भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, नेपाळमधील स्थिती आणखी गंभीर बनू शकते. कारण येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे मदत कार्यात अनेक अडचणी येऊ शकतात. गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात गठीत आंतर-मंत्रालयीने पथक लवकरच नेपाळला रवाना होणार असून ते तेथील मदत आणि बचाव कार्यात समन्वय ठेवेल.जयशंकर पुढे म्हणाले की, नेपाळमध्ये लवकरात लवकर मदत आणि बचाव कार्य मोहिम राबविणे हा आमच्या अजेंड्यावरील प्रमुख मुद्दा आहे. नेपाळमधील स्थिती खूप गंभीर आहे. यावेळी गृह सचिव एल. सी. गोयल, संरक्षण सचिव आर. के. माथूर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख आर. के जैन आणि भारतीय हवामान विभागाचे प्रमुख एल. एस. राठोड हेही उपस्थित होते. गृहसचिवांनी सांगितले की, भूकंपोत्तर धक्क्यांनी आतापर्यंत भारतात ६२ जण मृत्युमुखी, तर २५९ जण जखमी झाले आहेत.